Skip to main content

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने लातूर जिल्हाध्यक्ष लहुकुमार शिंदे यांचा सन्मान

 



लातूर : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे लातूर जिल्हाध्यक्ष लहुकुमार शिंदे यांची हिंदी चित्रपटात पंडितजींची उत्कृष्ट भूमिका साकारली असून दमदार कामगिरीला सुरुवात झाल्याने व विविध कार्यकारी सहकारी सोसायटी खंडाळाच्या नवनिर्वाचित संचालक मंडळावर बिनविरोध निवड झाल्याने प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, महाराष्ट्र राज्य जिल्हा शाखा लातूरच्या वतीने नुकताच यथोचित सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे, राज्य महिला अध्यक्षा डॉ. सुधाताई कांबळे, मराठवाडा अध्यक्ष विष्णू अष्टीकर, लातूर जिल्हा महिला अध्यक्षा वैशालीताई पाटील, लातूर जिल्हा संघटक संजय राजुळे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख संतोष सोनवणे, लातूर जिल्हा उपाध्यक्ष महादेव पोलदासे, ॲड.उदय दाभाडे, सामाजिक कार्यकर्ते दिपक करडखेले आदी पदाधिकारी उपस्थित होते. तसेच प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष सोमनाथ खंडागळे, महिला जिल्हाध्यक्षा आशाताई चांदणे, जिल्हा उपाध्यक्ष विजयाताई कर्णवर, जिल्हा सचिव प्रमिला जाधव, माढा तालुका अध्यक्ष कुंदन वजाळे, माढा तालुका उपाध्यक्ष सिद्धनाथ सावंत, करमाळा तालुका सचिव हर्षवर्धन गाडे, रमेश हणमंते, उत्तम फड, उषाताई भालेराव, प्रतिक्षा पिटले, आबासाहेब झिंजारे, सुरज मद्देवाद आदी पदाधिकारी उपस्थित होते.

प्रेम ही भावनाच हृदयापासून उत्पन्न होते व हृदयापर्यंत पोहोचते मग ते आईचे प्रेम असो, भावाचे प्रेम असो, किंवा प्रेयसीचे प्रेम असो. जे चिरकाळ टिकते तेच प्रेम असते. अशा आशयाचा "तू ही मेरी जान" (love story) हा हिंदी चित्रपट (short movi) लहान थोर व प्रौढ व वृद्धांनी पहावा असाच आहे.

मेन हिरोच्या भूमिकेत संजय कुमार असून पंडितजीच्या भूमिकेत प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे लातूर जिल्हाध्यक्ष व सुवर्णयुगचे मुख्य संपादक लहूकुमार शिंदे आहेत. मेन व्हीलन (राखा) च्या भूमिकेत विजयकुमार आहेत.

लहूकुमार शिंदे यांच्या पंडितजी च्या भूमिकेमुळे पत्रकार काकासाहेब घुटे, मासूम खान, ॲड अरविंद रेड्डी, दिनेश कांबळे, अविनाश पिटले संजय इटकर आदी मित्र परिवाराकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...