Skip to main content

कृष्णप्रिय ज्येष्ठ नागरिक संघ कराटे वर्गातील चिमुकले व मॉर्निंग वॉक ग्रुपच्या वतीने शहरात स्वच्छता अभियान

 

तालुका क्रिडा अधिकारी उटांवरुन हाकतात शेळ्या...

किनवट तालुका प्रतिनिधी : प्रभारी तालुका क्रीडा अधिकारी व प्रशासनाच्या दुर्लक्षपणामुळे क्रीडा संकुलाची दुरावस्था झाली असून त्याच ठिकाणी घाणीचे साम्राज्य् पसरले असल्याचे लक्षात घेवून किनवट येथील क्रिष्णप्रीय जेष्ठ् नागरीक संघ व कराटे वर्गाच्या चिमुकल्यांनी व मॉर्निग वॉक ग्रुपने 20 मे रोजी क्रीडा संकुलाच्या 11 व्या वर्धापनदिनानिमित्य् स्व्च्छता अभियान राबविल्याने शहरवासीयांनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे.

20 मे रोजी क्रीडा संकुलाचा 11 वा वर्धापनदिन असतांना या परिसरात तालुका क्रीडा अधिकारी व संबंधीत अधिकाऱ्याने कुठलीही दखल न घेतल्याने शहरातील विकासप्रेमी तीन संघटनानी एकत्र येवून क्रीडा संकुल परिसरात स्व्च्छता अभियान राबविले यात प्रामुख्याने नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, जेष्ठ् नागरीक संघटनेचे डॉ. अशोक चिन्नावार, सेवानिवृत्त् पोस्ट् मास्तर् नार्लावार, उद्योजक बि.ए.कोंडे, दिलबर बदाने, उमाकांत नार्लावार, अशोक जयस्वाल, माजी उपनगराध्यक्ष राजु उप्प्लवार, कराटे मास्तर् तथा,सौ लक्ष्मीबाई  येशिमोड सेवाभावी संस्थांनी किनवट अध्यक्ष संदीप येशीमोड, ॲङ दिलीप काळे, ॲङ सुनिल येरेकर, संजय धोबे, रामदेव शर्मा, लोखंडे, सुरेश कावळे, मुंडे काका, अश्विन पवार, गिरिश वट्टमवार जेष्ठ् नागरीक संघटना व मॉर्निग ग्रुप आणि कराटे वर्गाचे विद्यार्थी या स्वच्छता अभियानात सहभागी झाले होते.

क्रीडा संकुलाच्या दुरावस्थेला जबाबदार कोण? 

किनवट येथे शासनाच्यावतीने 10 वर्षापुर्वी किनवट गोकुंदा मार्गावरील विस्तीरण जागेवर क्रीडा संकुल बांधण्यात आले बंधीस्त् हॉलमध्ये विविध खेळासह बॅटमॅटन हॉल निर्माण केला आणि समोरील भव्य् मैदानात सकाळी फिरण्यासाठी व विविध खेळ खेळण्यासाठी विद्यार्थ्यांसह नागरीक येत असतात पण या क्रीडा संकुलासाठी शासनाचा निधी उपलब्ध् असतांना प्रभारी तालुका क्रीडा अधिकारी नांदेडला बसून येथील कारभार पहातात. देखरेखीसाठी दोन पहारेकरीही या ठिकाणी कार्यरत आहे एक पहारेकरी हजेरी लावून कामे करतो पण दुसरा पाहरेकरी दोन महिण्यापासुन बेपत्ता असून कामावर असला तर या ठिकाणी खेळासाठी येणाऱ्यावर अरेरावी करतो पण त्याच्यावर नियंत्रण ठेवले जात नाही परिणामी या परिसरात घाणीचे साम्राज्य् पसरले आहे व गाडवांचा मुक्तसंचार असल्याने घाणीचे साम्राज्य् पसरले आहे या गाडवांचा बंदोबस्त् कोण करणार हा प्रश्नही एैरणीवर आला आहे. विविध साहित्य् खरेदीसाठी काही महिण्यापूर्वी आले दोन लाख रूपये साहित्य् खरेदी केली पण आज त्या ठिकाणी लोखंडी अलमारी आहे बाकी साहित्य् कुठे बेपत्ता झाले या बेपत्ता होण्यासाठी जाबाबदार कोण? हा प्रश्नच् असून बॅटमॅटनचे दुरावस्था झाली असून त्या ठिकाणचे स्टाईल्स् उखडून गेले त्याठिकाणी खेळाडू ला दुखापत होण्याची शक्यता नाकारता येत नाही या क्रीडा संकुलाचे सचिव तहसीलदार असून किमान त्यांनी दुरावस्था झालेल्या क्रीडा संकुलाकडे तातडीने लक्ष देवून या क्रीडा संकुलाच्या झालेली दुरावस्था तातडीने दूर करावी व या ठिकाणी असलेल्या पाहरेकरी यांना समज दयावी किंवा हाकलपट्टी करावे असे अपेक्षाही क्रीडाप्रेमींनी व्यक्त् केली आहे.

Comments

Popular posts from this blog

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे आणण

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे माजी ता

.. महाराष्ट्रातील निवडणुका बॅलेट पेपरवर होणार; निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची माहिती

 महाराष्ट्र:- देशातील लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे जाहीर करण्यात आला असून महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे या कालावधीत एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता शनिवारपासून लागू झाली आहे. महाराष्ट्रात यंदाची निवडणूक विविध मुद्द्यांनी गाजणार आहे. यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दाही महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. राजकीय नेत्यांना आपली ताकद दाखवून देण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील सर्व ४८ मतदारसंघांत समाजातील तरुणांनी शेकडो उमेदवारी अर्ज दाखल करावेत, असं आवाहन केलं आहे. उमेदवारांची संख्या प्रचंड प्रमाणात असेल तर ईव्हीएमवर निवडणुका घेणं कठीण होणार आहे. अशातच आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ईव्हीएमच्या क्षमतेबाबत माहिती दिली आहे. ईव्हीएमसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना एस. चोक्कलिंगम म्हणाले की, "एका मतदारसंघात ४०० उमेदवारांहून अधिक उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यास आपल्याला बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी ला