Skip to main content

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे लातूर जिल्हाध्यक्ष लहुकुमार शिंदे यांची हिंदी चित्रपटात दमदार कामगिरी


लातूर : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे लातूर जिल्हाध्यक्ष लहुकुमार शिंदे यांची हिंदी चित्रपटात पंडितजींची उत्कृष्ट भूमिका साकारली असून दमदार कामगिरीला सुरुवात झाल्याने प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या सर्व पत्रकारांनी लहुकुमार शिंदे यांचे अभिनंदन केले आहे.

मानवी मन अतिशय संवेदनशील आहे अशा संवेदनशील मनाला प्रेमाची किनार लाभली तर जीवन सुंदर बनते आणि जीवन जगण्याची उत्कंठा वाढते.

प्रेम ही भावनाच हृदयापासून उत्पन्न होते व हृदयापर्यंत पोहोचते मग ते आईचे प्रेम असो, भावाचे प्रेम असो, किंवा प्रेयसीचे प्रेम असो. जे चिरकाळ टिकते तेच प्रेम असते. अशा आशयाचा "तू ही मेरी जान" (love story) हा हिंदी चित्रपट (short movi) लहान थोर व प्रौढ व वृद्धांनी पहावा असाच आहे.

या चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक के मनोज असून निर्माता संजय प्रजापती आहेत. सहदिग्दर्शक रवी कुमार तर संगीत अजय राजा यांनी दिले आहे.

मेन हिरोच्या भूमिकेत संजय कुमार असून पंडितजीच्या भूमिकेत प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे लातूर जिल्हाध्यक्ष व सुवर्णयुगचे मुख्य संपादक लहूकुमार आहेत. मेन व्हीलन (राखा) च्या भूमिकेत विजयकुमार आहेत.

लहुकुमार शिंदे यांच्या दमदार कामगिरीमुळे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष, राज्य,विभागीय, जिल्हा व तालुका पदाधिकारी व मित्र परिवाराकडून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...