Skip to main content

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख प्रा.जय कराडे यांना २०२२ सालचा उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार प्रदान



कोल्हापूर :- प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख प्रा.जय कराडे यांना लोकशासन न्यूज नेटवर्क कडून उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार २०२२ ने सन्मानित करण्यात आले. सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन प्रा.कराडे यांचा सत्कार करण्यात आला.

सातारा जिल्ह्यातील सुप्रसिद्ध कास पठार याठिकाणी लोकशासन न्यूज चा दुसरा वर्धापनदिन सोहळा संपन्न झाला.यावेळी न्युज 1 इंडिया चॅनेल चे निवासी संपादक आनंद गायकवाड व प्राईम्स एफ एक्स कंपनी च्या सर्वेसर्वा रूपाली चव्हाण यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. या प्रसंगी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी आनंद गायकवाड यांनी सर्व पत्रकारांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी मुंबई, ठाणे, कल्याण, नाशिक, पुणे, रायगड, लातुर, अमरावती, वाशिम, कोल्हापूर, सातारा, सांगली आदी जिल्ह्यातील पत्रकार कार्यक्रमस्थळी उपस्थित होते. प्रा.कराडे, रुपाली चव्हाण, धम्मशील सावंत, राजेंद्र वाटाणे, विनोद ढेरे, किशोर सोनकांबळे व अजय कल्याणे यांनी मनोगते व्यक्त केली.

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख प्रा. जय कराडे यांनी पश्चिम महाराष्ट्रात सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रात व कोरोनाकाळात विशेष उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल लोकशासन न्यूज नेटवर्क, महाराष्ट्रच्या वतीने सन्मानित करण्यात आले. यावेळी सुत्रसंचालन पत्रकार मिलिंदा पवार यांनी तर आभार कार्यकारी संपादक मिलिंद लोहार यांनी व्यक्त केले.

प्रा. जय कराडे यांना पत्रकारिता क्षेत्रातील उत्कृष्ट पुरस्कार प्रदान करण्यात आल्याबद्दल प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे, संघटनेचे राज्य, विभाग, जिल्हा व तालुका पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.

Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...