Skip to main content

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या भंडारा जिल्हा कार्यालयाचे शानदार उद्घाटन पत्रकारांनी संघटित लढा देण्याची गरज-राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे



भंडारा : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, महाराष्ट्र राज्य या संघाच्या भंडारा जिल्हा कार्यालयाचे नुकतेच साकोली येथे शानदार उद्घाटन पार पडले. प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे यांच्या हस्ते या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे राज्य उपाध्यक्ष पंकज वानखडे उपस्थित होते. 

 याप्रसंगी संघाचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे म्हणाले की, 'पत्रकारावर अन्याय होत असेल तर अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी सर्व पत्रकारांनी एकत्र येण्याची गरज आहे तसेच पत्रकारांना शासनाच्या विविध योजनेचा लाभ मिळावा म्हणून पत्रकारांनी एकत्रित येऊन लढा उभारावा असेही आवाहन केले. राज्य उपाध्यक्ष पंकज वानखेडे यांनी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे कार्य संपूर्ण महाराष्ट्रात प्रगतीपथावर असून पत्रकारांच्या हितासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन अध्यक्षस्थानावरून त्यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व निवेदन प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे भंडारा जिल्हा अध्यक्ष आशिष चेडगे यांनी केले. तर आभार मनीषा काशीवार यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महिला युवती अध्यक्ष रोहिणी रणदिवे, लाखांदूर तालुका अध्यक्ष प्रा. प्रेमानंद हटवार, साकोली तालुका सचिव मनीषा काशिवार, सहसचिव चेतक हत्तीमारे, कोषाध्यक्ष सौरभ गोस्वामी, साकोली तालुका प्रसिद्धीप्रमुख पत्रकार निकिता कुंभरे,  पत्रकार रवींद्र घरत, देवेंद्र रहांगडाले, पत्रकार मदन लांडगे, पत्रकार ऋग्वेद येवले, पत्रकार शेखर इसापुरे, पत्रकार रवी भोंगाने, सचिव ताराचंद कापगते, प्रसिद्धी प्रमुख शेखर इसापुरे, कोषाध्यक्ष रवींद्र घरत, पत्रकार मनोज राजघाट, पत्रकार संजय गजघाट आदी पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले.

Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रका...