Skip to main content

डॉ. आंबेडकरांचा पुर्णाकृती पुतळा बसवण्याची व पुतळा परिसराचे सुशोभीकरण करण्याची मागणी फुले शाहु आंबेडकरी संघटना आक्रमक

 




किनवट,दि.८ : शहरातील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा नवीन पूर्णाकृती पुतळा उभारून परिसराचे सुशोभिकरण करावे अन्यथा पंधरा दिवसानंतर समस्त आंबेडकरवादी नागरिकांच्या वतीने  आंदोलन करण्याचा इशारा नगर परिषदेच्या मुख्याधिकार्‍यांना निवेदनाद्वारे आज(ता.८) देण्यात आला आहे.

     निवेदनात नमूद केले आहे की, शहरातील मुख्य मार्गावर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धाकृती पुतळा आहे. परंतु, मागील अनेक वर्षापासून या पुतळ्याचे सुशोभीकरण केले नसल्याने पुतळ्यासह परिसराची अवस्था बिकट बनली आहे. पुतळ्याच्या सभोवताली अतिक्रमण वाढले असून आवाराच्या भिंतीला तसेच पुतळ्याच्या पायथ्याला भेगा पडल्या आहेत.आंबेडकर अनुयायी दरवर्षी अशाच अवस्थेत या ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपाचे कार्यक्रम साजरे करत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा व परिसराचे सुशोभीकरण करावे यासाठी आंबेडकरवादी नागरिकांच्या वतीने यापूर्वी अनेक वेळा पाठपुरावा केल्यानंतर नगरपरिषदेने नवीन पुतळा उभारणी संदर्भात सभागृहात ठराव पास केला, मात्र, ठरावाच्या अनुषंगाने कित्येक वर्षे लोटली, तरी कार्यवाही झाली नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा नवीन पूर्णाकृती पुतळा उभारून सुशोभीकरण करण्यास नगरपालिका जाणीवपूर्वक टाळाटाळ करत असून या पुतळ्याकडे नगरपालिका जातीय द्वेषभावनेतून दुर्लक्ष करत असल्याचा आरोप निवेदनात केला आहे. नगरपरिषदेने पंधरा दिवसात नवीन पुतळा उभारण्या संदर्भात कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी अशी समस्त आंबेडकरवादी नागरिकांची मागणी आहे. या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास नागरिकांच्या वतीने नगरपालिके विरोधात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात दिला आहे. निवेदनावर राहुल कापसे, अ‍ॅड.सम्राट सर्पे, अभय नगराळे, सम्राट कावळे, दया पाटील, मारुती मुनेश्वर, राहुल गिमेकर, सचिन कावळे, निखील कावळे, विशाल हलवले सुबोध परेकर यांच्यासह अनेकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.




Comments

Popular posts from this blog

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे आणण

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे माजी ता

.. महाराष्ट्रातील निवडणुका बॅलेट पेपरवर होणार; निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची माहिती

 महाराष्ट्र:- देशातील लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे जाहीर करण्यात आला असून महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे या कालावधीत एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता शनिवारपासून लागू झाली आहे. महाराष्ट्रात यंदाची निवडणूक विविध मुद्द्यांनी गाजणार आहे. यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दाही महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. राजकीय नेत्यांना आपली ताकद दाखवून देण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील सर्व ४८ मतदारसंघांत समाजातील तरुणांनी शेकडो उमेदवारी अर्ज दाखल करावेत, असं आवाहन केलं आहे. उमेदवारांची संख्या प्रचंड प्रमाणात असेल तर ईव्हीएमवर निवडणुका घेणं कठीण होणार आहे. अशातच आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ईव्हीएमच्या क्षमतेबाबत माहिती दिली आहे. ईव्हीएमसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना एस. चोक्कलिंगम म्हणाले की, "एका मतदारसंघात ४०० उमेदवारांहून अधिक उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यास आपल्याला बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी ला