Skip to main content

डॉ. आंबेडकरांचा पुर्णाकृती पुतळा बसवण्याची व पुतळा परिसराचे सुशोभीकरण करण्याची मागणी फुले शाहु आंबेडकरी संघटना आक्रमक

 




किनवट,दि.८ : शहरातील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा नवीन पूर्णाकृती पुतळा उभारून परिसराचे सुशोभिकरण करावे अन्यथा पंधरा दिवसानंतर समस्त आंबेडकरवादी नागरिकांच्या वतीने  आंदोलन करण्याचा इशारा नगर परिषदेच्या मुख्याधिकार्‍यांना निवेदनाद्वारे आज(ता.८) देण्यात आला आहे.

     निवेदनात नमूद केले आहे की, शहरातील मुख्य मार्गावर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धाकृती पुतळा आहे. परंतु, मागील अनेक वर्षापासून या पुतळ्याचे सुशोभीकरण केले नसल्याने पुतळ्यासह परिसराची अवस्था बिकट बनली आहे. पुतळ्याच्या सभोवताली अतिक्रमण वाढले असून आवाराच्या भिंतीला तसेच पुतळ्याच्या पायथ्याला भेगा पडल्या आहेत.आंबेडकर अनुयायी दरवर्षी अशाच अवस्थेत या ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपाचे कार्यक्रम साजरे करत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा व परिसराचे सुशोभीकरण करावे यासाठी आंबेडकरवादी नागरिकांच्या वतीने यापूर्वी अनेक वेळा पाठपुरावा केल्यानंतर नगरपरिषदेने नवीन पुतळा उभारणी संदर्भात सभागृहात ठराव पास केला, मात्र, ठरावाच्या अनुषंगाने कित्येक वर्षे लोटली, तरी कार्यवाही झाली नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा नवीन पूर्णाकृती पुतळा उभारून सुशोभीकरण करण्यास नगरपालिका जाणीवपूर्वक टाळाटाळ करत असून या पुतळ्याकडे नगरपालिका जातीय द्वेषभावनेतून दुर्लक्ष करत असल्याचा आरोप निवेदनात केला आहे. नगरपरिषदेने पंधरा दिवसात नवीन पुतळा उभारण्या संदर्भात कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी अशी समस्त आंबेडकरवादी नागरिकांची मागणी आहे. या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास नागरिकांच्या वतीने नगरपालिके विरोधात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात दिला आहे. निवेदनावर राहुल कापसे, अ‍ॅड.सम्राट सर्पे, अभय नगराळे, सम्राट कावळे, दया पाटील, मारुती मुनेश्वर, राहुल गिमेकर, सचिन कावळे, निखील कावळे, विशाल हलवले सुबोध परेकर यांच्यासह अनेकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.




Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...