Skip to main content

चिंतनाच्या पातळीवर परिपूर्ण असलेली कविता म्हाणजे" व्यक्त अव्यक्त" कवितासंग्रह....


      नांदेड :दि :

        अंतर्मनातून आलेले शब्द कवितेच्या प्रांतात आपली नवी ओळख निर्माण करतात.तसेच

 चिंतनाच्या पातळीवर परिपूर्ण असलेली कविता हीच साहित्याची खरी ओळख असते.कवी जनक यांची कविता आणि त्यांचे शब्द नवी ओळख निर्माण करणारे असल्याचे  प्रतिपादन महाराष्ट्रातील प्रसिद्ध साहित्यिक, विचारवंत देवीदास फुलारी यांनी केले.

   हाळदा गावचे भूमिपुत्र आणि नवोदित कवी जनक जगदीश कुलकर्णी यांच्या "व्यक्त -अव्यक्त"या कविता संग्रहाचे प्रकाशन नुकतेच नांदेड येथील ताज पाटील च्या सभागृहात संपन्न झाले.त्यावेळी ते अध्यक्षपदावरून बोलत होते बोलत होते.

         कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कंधार -लोहा विधानसभेचे आमदार आणि हाळदा गावचे भूमिपुत्र श्यामसुंदर शिंदे,समाजसेविका सौ. आशाताई शिंदे,स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील इंग्रजी विभागाचे प्रमुख,विचारवंत प्रा.डॉ. दिलीप चव्हाण, लेखक,कवी आणि शिक्षण विस्तार अधिकारी व्यंकटेश चौधरी,राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षक आणि कवी शिवा कांबळे,साहित्यिक प्रा. धाराशिव शिराळे,रोहित शिंदे, जेष्ठ पत्रकार धोंडोपंत विष्णुपुरीकर,  भार्गव राजे, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक, संभाजी आलेवाड,  वैजनाथ हंगरगे, उर्दु घराचे व्यवस्थापक प्राचार्य सुजात अली, प्राचार्य हिराप्रकाश बोड्डावार,  उपप्राचार्य डॉ. शिवाजी सोनटक्के, यशवंतराव शिंदे, डॉ. अंजली दिग्रसकर, संतोष लोंढे, प्रा. अजित बुरपल्ले, विश्वनाथ देशमुख,  रुकमाजी चव्हाण, संदीप पांडे, सिमंत पांडे, प्रकाशक संजय सुरनर आदींची उपस्थिती होती.

      पुढे बोलताना देवीदास फुलारी म्हणाले की,जनक कुलकर्णी यांच्या कवितेला वैश्विक अधिष्ठान असून त्यांच्या कवितेला सामाजिक मूल्ये असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

         प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना

 कंधार लोहा विधानसभा मतदार संघाचे आमदार शामसुंदर शिंदे म्हणाले की लेखक आणि कवींनी महाराष्ट्राला एक नवा विचार दिला असून आमच्या गावचा जनक कुलकर्णी यांनी साहित्य प्रांतात  असलेली भरारी निश्चितच आमच्या गावासाठी अभिमानाची बाब असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.

          यावेळी प्रसिद्ध समाज सेविका आशाताई शिंदे यांनी जनकच्या साहित्यकृतीचे कौतुक केले. प्रसिद्ध विचारवंत प्रा. डॉ. दिलीप चव्हाण यांनी मराठी साहित्यातील अनेक पैलूचा धांडोळा घेत जनकच्या साहित्यकृतीचे कौतुक केले.साहित्य हे जगण्याला प्रेरणा देते. कमी वयात जनक कुलकर्णी यांनी साहित्यवर्तुळात केलेले पदार्पण निश्चितच प्रेरणादायी असून त्यांच्या प्रत्येक कवितेतून मानवी मनाच्या भावभावनांचा समर्पक असे मूल्ये असल्याचे मत शिक्षण विस्तार अधिकारी आणि कवी व्यंकटेश चौधरी यांनी मांडले. साहित्याच्या माध्यमातून समाज प्रबोधन आणि परिवर्तनाची नवी दिशा मिळत असून जनक कुलकर्णी यांच्या कवितेतून परिवर्तनाचा आणि प्रबोधनाचा विचार असल्याचे मत राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त  शिक्षक तथा कवी शिवा कांबळे यांनी मांडले.

         कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन  डॉ. अनुराधा पत्की यांनी केले तर आभार पंकजा कुलकर्णी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री पुरुषोत्तम हळदेकर,  दत्तात्रय कुलकर्णी, श्रीनिवास पवळे, अभिजीत हळदेकर, विश्वेश कुलकर्णी, श्रद्धा झंवर, अभिषेक भुरे, ज्योती गायकवाड, विठ्ठल मोरे, ख्वाजा सिद्दिकी, मारोती गौलोर, माधव पटने, आदित्य देशमुख, अभय कुलकर्णी, आकाश कुलकर्णी, आदेश हंगरगे, सुदेश हंगरगे, यांनी परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

आदिवासी विकास समिती मराठवाडा अध्यक्ष पदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती

 किनवट: राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती, आज दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी किनवट येथील गोकुंदा शासकीय विश्रामगृह येथे दैनिक वीर शिरोमणी वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे राज्य कार्याध्यक्ष शंकरसिंह ठाकुर सर तसेच दैनिक सा.नंदगिरीचा कानोसा या वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे मराठवाडा अध्यक्ष मारोती शिकारे सर नांदेड जिल्हाअध्यक्ष विनायक कामठेकर सर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक घेऊन राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली यावेळी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय जी सूर्यवंशी सर यांनी निवड जाहीर झाल्याबरोबर फोन वर अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या शुभेच्छांचा स्वीकार करत ट्रायबल सेवा न्यूज चॅनेल चे संपादक प्रणय कोवे  यांनी नांदेड जिल्हाअध्यक्ष पदावरून मराठवाडा अध्यक्ष या पदावर नियुक्ती केल्याबद्दल सरांचे मनःपूर्वक आभार मानले  प्रणय कोवे हे गेल्या अनेक वर्षापासू...

१० वर्षीय अरफात मलीक चव्हाण ने ठेवला आयुष्यातील पहिला रोजा

  किनवट प्रतिनिधि : इस्लाम धर्मात पवित्र रमजान या महिन्याला अनन्य महत्व प्राप्त आहेया महिन्यात सर्वच मुस्लिम बांधव यांच्यावर वयाच्या दहाव्या वर्षा पासून रोजा (उपवास) फर्ज (सक्तीचें) असतात.लहानपासून मोठ्यापर्यत या महिन्यांमध्ये 30 दिवस रोजा धरत असतात. पालकांचे पाहून लहान मुलांनाही रोजा धरण्याची लालसा निर्माण होते. त्यामुळे लहान चिमुकले ही मोठ्यांचे अनुकरण करीत रोजा (उपवास) धरतात.अशाच प्रकारे किनवट येथील मलीक चव्हाण यांचा 10 वर्षाचा मुलगा अरफात चव्हाण यांनी आपल्या जीवनातील पहिला रोजा सोमवारी 10 मार्च रोजी पूर्ण केला.मुस्लिम समाजात पवित्र असणाऱ्या या महिन्यात संपूर्ण महिनाभर दिवसभर पाणी न पिता उपवास ठेवला जातो.यावर्षी रोजा (उपवास) सकाळी 5.10 वाजता सुरू होत असून संध्याकाळी 6.28 ला रोजा सोडण्याची वेळ आहे.13 तासा पेक्षा जास्त वेळचा उपवास असल्याने या उष्णतेचा मोठ्या माणसांनादेखील खूप त्रस होतो.त्यात या चिमुकल्याने पहिला रौजा ठैवून आपल्या आयुष्याची सुरुवात एक चांगल्या प्रकारे व्हावी या हेतूने उपवास ठैेवला.त्यामुळे अरफात मलिक चव्हाण यांचे सर्व्र कौतुक होत आहे.