ता. प्र. किनवट:-
साहित्यिक हा संवेदनशील असतो.आपल्या प्रतिमा सामर्थ्याने उत्तम साहित्य निर्माण करतो. साहित्यातून सामाजिक वास्तव मांडणी करीत असतो. साहित्य हे मंनोरजनासाठी नसते तर ते वैचारिक, बोध देणारे असते. असे मत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड आणि बळीराम पाटील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,किनवट यांच्या संयुक्त विद्यमाने, स्वतंत्र भारताच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मराठी विभागाच्या वतीने आयोजित 'समकालीन मराठी साहित्य :स्वरूप आणि प्रेरणा ' या विषयावर एकदिवसीय आभासी राष्ट्रीय चर्चासत्राच्या उदघाटन प्रसंगी जोगेंद्रसिंह बिसेन - प्र. कुलगुरु स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ ,नांदेड यांनी व्यक्त केले. प्रारंभी थोर स्वतंत्र सेनानी, पूज्य वंदनीय स्वामी रामानंद तीर्थ, थोर समाजसुधारक,गोरबंजाराकार, स्मृतीशेष बळीराम पाटील, स्मृतीशेष उत्तमराव राठोड यांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन करण्यात आले.शब्द सुमनाने व सांस्कृतिक विभागाच्या वतीने स्वागतगीत सादर करुन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.पुढे बोलतांना डॉ. जोगेंद्रसिह बिसेन सर म्हणाले कि, समकालीन मराठी साहित्य हे नवेमूल्य समाजव्यवस्थेत पेरत आले आहे. समाजातील जगणं साहित्यिकांनी मांडले आहे. साहित्य अनेविध प्रवाहातून जात असते.लेखक हा समाजाला जागे करुन नव -नवे विचार मांडत असतो.' समकालीन मराठी साहित्य :स्वरूप आणि प्रेरणा ' या विषयावर अत्यंत महत्त्वाचे राष्ट्रीय चर्चासत्र येते होत आहे.या चर्चासत्रास खुप महत्त्व आहे. एका उत्तम विषयावर चर्चा होत आहे. असे मत व्यक्त करुन राष्ट्रीय चर्चासत्राचे उदघाटन झाल्याचे जाहीर केले. याप्रसंगी विचारमंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा किनवट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रफुल्ल राठोड,
,नारायणराव सिडाम उपाध्यक्ष किशिस,प्राचार्य डॉ. एस. के. बेंबरेकर, संस्था समन्वयक प्रा. राजकुमार नेम्मानीवार, डॉ. जी. बी. लांब, उपप्राचार्य डॉ. गजानन वानखेडे,पर्यवेक्षक प्रा. अनिल पाटील,
विचारमंचावर उपस्थित होते.प्रमुख अतिथी म्हणून
डॉ. पृथ्वीराज तौर,नांदेड यांनी समकालीन साहित्य समजून घेतांना नवे प्रश्न उपस्थित केले. बीजभाषण डॉ. केदार काळवणे, कळब यांनी 'समकालीन मराठी साहित्य:स्वरुप आणि प्रेरणा 'या संदर्भाने विविध प्रहवा विषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय समारोप प्रफुल्ल राठोड, अध्यक्ष किशिसं,किनवट यांनी केले. आपल्या अध्यक्षीय भाषणातून त्यांनी माय बोली मराठी भाषेचा वापर करावे. वाचन संस्कृती वाढवावे.मराठी भाषा जीवंत राहवावी यासाठी सर्वांनीच मराठी भाषेचा अधिक प्रमाणात वापर करावे. असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय चर्चासत्राचे समन्वयक तथा मराठी विभागप्रमुख प्रा.डाॅ.पंजाब शेरे यांनी केले.
सूंत्रसंचालन प्रा. प्रल्हाद जाधव तर आभार डॉ. सुरेंद्र शिंदे यांनी मानले.याप्रसंगी महाविद्यालयातील बहुसंख्येने शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी, आभासी पध्दतीने जोडले होते.कार्यम्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. योगेश सोमवंशी डॉ. आनंद भालेराव, प्रा. ममता जोनपेल्लीवार, प्रा. आम्रपाली हटकर, डॉ. शुभांगी दिवे,डाॅ.प्रज्ञा घोडवाडीकर, डॉ. विजया खामनकर,प्रा.दयानंद वाघमारे, यांनी सहकार्य केले.
Comments
Post a Comment