Skip to main content

स्वतंत्र भारताच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त बळीराम पाटील महाविद्यालयतर्फे राष्ट्रीय चर्चासत्र


 ता. प्र. किनवट:-

साहित्यिक हा संवेदनशील असतो.आपल्या प्रतिमा सामर्थ्याने उत्तम साहित्य निर्माण करतो. साहित्यातून सामाजिक वास्तव मांडणी करीत असतो. साहित्य हे मंनोरजनासाठी नसते तर ते वैचारिक, बोध  देणारे असते. असे मत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड आणि बळीराम पाटील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,किनवट यांच्या संयुक्त विद्यमाने, स्वतंत्र भारताच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मराठी विभागाच्या वतीने आयोजित 'समकालीन मराठी साहित्य :स्वरूप आणि प्रेरणा ' या विषयावर एकदिवसीय आभासी राष्ट्रीय चर्चासत्राच्या उदघाटन प्रसंगी जोगेंद्रसिंह बिसेन - प्र. कुलगुरु स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ ,नांदेड यांनी  व्यक्त केले. प्रारंभी थोर स्वतंत्र सेनानी, पूज्य वंदनीय स्वामी रामानंद तीर्थ, थोर समाजसुधारक,गोरबंजाराकार, स्मृतीशेष बळीराम पाटील, स्मृतीशेष उत्तमराव राठोड यांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन करण्यात आले.शब्द सुमनाने व सांस्कृतिक विभागाच्या वतीने स्वागतगीत सादर करुन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.पुढे बोलतांना डॉ. जोगेंद्रसिह बिसेन सर म्हणाले कि, समकालीन मराठी साहित्य हे नवेमूल्य समाजव्यवस्थेत पेरत आले आहे. समाजातील जगणं साहित्यिकांनी मांडले आहे. साहित्य अनेविध प्रवाहातून जात असते.लेखक हा समाजाला जागे करुन नव -नवे विचार मांडत असतो.' समकालीन मराठी साहित्य :स्वरूप आणि प्रेरणा ' या विषयावर अत्यंत महत्त्वाचे राष्ट्रीय चर्चासत्र येते होत आहे.या चर्चासत्रास खुप महत्त्व आहे. एका उत्तम विषयावर चर्चा होत आहे. असे मत व्यक्त करुन राष्ट्रीय चर्चासत्राचे उदघाटन झाल्याचे जाहीर केले. याप्रसंगी विचारमंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा किनवट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रफुल्ल राठोड, 


,नारायणराव सिडाम उपाध्यक्ष किशिस,प्राचार्य डॉ. एस. के. बेंबरेकर, संस्था समन्वयक प्रा. राजकुमार नेम्मानीवार, डॉ. जी. बी. लांब, उपप्राचार्य डॉ. गजानन वानखेडे,पर्यवेक्षक प्रा. अनिल पाटील, 

विचारमंचावर उपस्थित होते.प्रमुख अतिथी म्हणून 

डॉ. पृथ्वीराज तौर,नांदेड यांनी समकालीन साहित्य समजून घेतांना नवे प्रश्न उपस्थित केले. बीजभाषण डॉ. केदार काळवणे, कळब यांनी 'समकालीन मराठी साहित्य:स्वरुप आणि प्रेरणा 'या संदर्भाने विविध प्रहवा विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. 

अध्यक्षीय समारोप प्रफुल्ल राठोड, अध्यक्ष किशिसं,किनवट यांनी केले. आपल्या अध्यक्षीय भाषणातून त्यांनी माय बोली मराठी भाषेचा वापर करावे. वाचन संस्कृती वाढवावे.मराठी भाषा जीवंत राहवावी यासाठी सर्वांनीच मराठी भाषेचा अधिक प्रमाणात वापर करावे. असे मत व्यक्त केले.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय चर्चासत्राचे समन्वयक तथा मराठी विभागप्रमुख प्रा.डाॅ.पंजाब शेरे यांनी केले. 

सूंत्रसंचालन प्रा. प्रल्हाद जाधव तर आभार डॉ. सुरेंद्र शिंदे यांनी मानले.याप्रसंगी महाविद्यालयातील बहुसंख्येने शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी, आभासी पध्दतीने जोडले होते.कार्यम्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. योगेश सोमवंशी डॉ. आनंद भालेराव, प्रा. ममता जोनपेल्लीवार, प्रा. आम्रपाली हटकर, डॉ. शुभांगी दिवे,डाॅ.प्रज्ञा घोडवाडीकर, डॉ. विजया खामनकर,प्रा.दयानंद वाघमारे, यांनी सहकार्य केले.

Comments

Popular posts from this blog

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे आणण

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे माजी ता

.. महाराष्ट्रातील निवडणुका बॅलेट पेपरवर होणार; निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची माहिती

 महाराष्ट्र:- देशातील लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे जाहीर करण्यात आला असून महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे या कालावधीत एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता शनिवारपासून लागू झाली आहे. महाराष्ट्रात यंदाची निवडणूक विविध मुद्द्यांनी गाजणार आहे. यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दाही महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. राजकीय नेत्यांना आपली ताकद दाखवून देण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील सर्व ४८ मतदारसंघांत समाजातील तरुणांनी शेकडो उमेदवारी अर्ज दाखल करावेत, असं आवाहन केलं आहे. उमेदवारांची संख्या प्रचंड प्रमाणात असेल तर ईव्हीएमवर निवडणुका घेणं कठीण होणार आहे. अशातच आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ईव्हीएमच्या क्षमतेबाबत माहिती दिली आहे. ईव्हीएमसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना एस. चोक्कलिंगम म्हणाले की, "एका मतदारसंघात ४०० उमेदवारांहून अधिक उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यास आपल्याला बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी ला