कायदा हे सामाजिक बदल घडवून आणण्याचे साधन आहे सा. न्या. वि. स. विभाग बार्टी आयोजित संविधान साक्षरता अभियाना प्रसंगी ॲड.सचिन भीमराव दारवंडे यांचे प्रतिपादन..*
नांदेड प्रतिनिधी:-
सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था ( बार्टी ),पुणे समतादूत प्रकल्पच्या वतीने संविधान साक्षरता अभियान अंर्तगत अस्पृश्यता निवारण - अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याची गरज या विषयावर नांदेड जिल्ह्यातील समतादूत दिपाली हाडोळे यांनी ऑनलाईन झुम एप द्वारे प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमचे प्रमुख व्याख्याता मा. ॲड.सचिन भीमराव दारवंडे यांनी आपले मत व्यक्त करताना असे म्हटले की , कायदा हे सामाजिक बदल घडवून आणण्याचे साधन आहे. कायाद्यामुळेच समाजातील अनिष्ठ रूढी परंपरा जसे बाल विवाह, सती प्रथा, यांचे प्रमाण खूप कमी झाले आहे
समाजात समता प्रस्थापित करण्यासाठी भारतीय संविधानातील अनेक कलमाचा अगदी थोडक्यात व समजले असे आपल्या व्याख्यांनातून उतबोधीत केले .
समाजात समता प्रस्थापित करण्यासाठी अनुसूचित जाती जमाती कायद्याची अंमलबजावणी कायद्याने कडक करने किती गरजेचे आहे.
युवकांनी जातीयतेच्या भींती तोडुन समतेचा स्विकार करून देशाच्या प्रगतीस हातभार लावावा
या बदल सखोल असे मार्गदर्शन केले व उपस्थितांच्या प्रश्नांची उत्तरे दिली कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ. सुजाता पोहरे जिल्हा प्रकल्प अधिकारी नांदेड ह्या होत्या तर कार्यक्रमाचे सुञसंचलन तथा आभार समतादूत हाडोळे दिपाली यांनी केले या कार्यक्रमासाठी जिल्ह्या भरातुन व इतर राज्यातुन बार्टीचे समतादुत, प्राध्यापक, ,शिक्षक, विद्यार्थी प्रेक्षक मोठ्या संख्येने ऑनलाईन उपस्थित होत
Comments
Post a Comment