Skip to main content

कायदा हे सामाजिक बदल घडवून आणण्याचे साधन आहे सा. न्या. वि. स. विभाग बार्टी आयोजित संविधान साक्षरता अभियाना प्रसंगी ॲड.सचिन भीमराव दारवंडे यांचे प्रतिपादन..*

 



नांदेड प्रतिनिधी:-


  सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था ( बार्टी ),पुणे समतादूत प्रकल्पच्या वतीने संविधान साक्षरता अभियान अंर्तगत  अस्पृश्यता निवारण - अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याची गरज या विषयावर नांदेड जिल्ह्यातील  समतादूत  दिपाली हाडोळे यांनी ऑनलाईन झुम एप द्वारे प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

        या कार्यक्रमचे प्रमुख व्याख्याता मा. ॲड.सचिन  भीमराव दारवंडे यांनी आपले मत व्यक्त करताना असे म्हटले की , कायदा हे सामाजिक बदल घडवून आणण्याचे साधन आहे. कायाद्यामुळेच समाजातील अनिष्ठ रूढी परंपरा जसे बाल विवाह, सती प्रथा, यांचे प्रमाण खूप कमी झाले आहे 

समाजात समता प्रस्थापित करण्यासाठी  भारतीय   संविधानातील अनेक कलमाचा अगदी थोडक्यात व समजले असे आपल्या व्याख्यांनातून उतबोधीत केले .

   समाजात समता प्रस्थापित  करण्यासाठी अनुसूचित जाती जमाती कायद्याची अंमलबजावणी कायद्याने कडक करने किती गरजेचे आहे.

युवकांनी जातीयतेच्या भींती तोडुन समतेचा स्विकार करून देशाच्या प्रगतीस हातभार लावावा

 या बदल सखोल असे मार्गदर्शन केले व उपस्थितांच्या प्रश्नांची उत्तरे दिली   कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ. सुजाता पोहरे  जिल्हा प्रकल्प अधिकारी नांदेड ह्या होत्या तर कार्यक्रमाचे सुञसंचलन तथा आभार  समतादूत हाडोळे दिपाली यांनी केले या कार्यक्रमासाठी  जिल्ह्या भरातुन व इतर राज्यातुन बार्टीचे  समतादुत, प्राध्यापक, ,शिक्षक, विद्यार्थी प्रेक्षक मोठ्या संख्येने ऑनलाईन उपस्थित होत

Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...