Skip to main content

टिपु सुलतान यांच्या विषयी अपशब्द काढुन सामाजिक भावना दुखावल्या बद्दल फडणवीसवर कारवाई करा टिपु सुलतान ब्रिगेडची मुख्यमंञ्याकडे मागणी


 


उमरी/ सय्यद नदीम. राज्याचे विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रजासत्ताक दिनी देशाचे पहिले स्वातंत्र्यसैनिक शहीद टिपू सुलतान यांच्या विषयी अपशब्द वापरून त्यांचा अपमान केला.या प्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी टिपु सुलतान ब्रिगेडच्या वतीने तहसिलदारांमार्फत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे .

 मुंबई येथील मालाडमध्ये बांधण्यात आलेल्या मैदानास टिपू सुलतान यांचे नाव देण्यात आले.  खरेतर अगोदरपासूनच त्या मैदानाचे टिपू सुलतान हे नाव होते. परंतु भाजप व त्याच्या सहयोगी संघटनांनी जाणून बुजून देशाचे पहिले स्वातंत्र्य सैनिक व इंग्रजा विरोध लढता-लढता वीर मरण पत्करणारे एकमेव राजा टिपू सुलतान यांच्या नावावरून वाद सुरू केला.  टिपू सुलतान यांच्या बद्दल अवमानकारक भाषेचा वापर करण्यात आला. राज्यघटनेमध्ये राणी लक्ष्मीबाई यांच्यासोबतच टिपू सुलतान यांचा फोटो लावलेला आहे. महामहिम राष्ट्रपती रामनाथ कोविंद साहेबांनी कर्नाटक विधानसभेत टिपू सुलतान यांच्या बद्दल गौरवोद्गार काढले आहेत. या सर्वांचा देवेंद्र फडणवीस, भाजप व त्याच्या सहयोगी संघटनांना विसर पडलेला आहे. जाणून बुजून वाद निर्माण करून महाराष्ट्र आणि संपूर्ण देशातील वातावरण दुषित करण्याचा प्रयत्न या माध्यमातून हे लोक करीत आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी टिपू सुलतान यांच्या विषयी क्रूरकर्मा, हिंदू वर अत्याचार करणारा अशा अपशब्दांचा वापर केलेला आहे. हा भारतीय राज्यघटनेचा, मा. राष्ट्रपती महोदयांचा सुद्धा अपमान आहे. याचा अर्थ असा होतो की भाजप आणि त्याच्या सहयोगी संघटनांना देशाची राज्यघटना मान्य नाही. आम्ही सर्व राज्यघटनेवर, राष्ट्रीय एकात्मता आणि अखंडतेवर विश्वास ठेवणारे महाराष्ट्रातील सर्व सुजाण नागरिक असले कृत्य नागरिक कधीच खपवून घेणार नाहीत. आम्ही अशा देश  विघातकी कृत्याचा जाहीर निषेध करतो.

टिपू सुलतान ब्रिगेड महाराष्ट्रच्या वतीने  देवेंद्र फडणवीस यांचा जाहिर निषेध करतो यांच्यावर स्वातंत्र्य सैनिकांचा आणि राज्यघटनेच्या अवमान केल्याबद्दल, देशात अशांतता व समाजात दुही निर्माण करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली यावेळी टिपु सुलतान ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष डाॅ.जहिरुद्दीन पठाण,जिल्हा संघटक फय्याज पठाण,मुफ्ती अज्जिमुल्ला कासमी, तालुका अध्यक्ष सय्यद फेरोज पटेल,रयत महाराष्ट्र कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रईस पठाण, विद्यार्थी ब्रिगेडचे अध्यक्ष सय्यद सुलेमान, शेख फारुख,सय्यद आनसार पटेल,अजहर बेग, मोगल आवेज बेग, शे.रियाज,शे.शारेख,तल्हा खुरेशी,शे.मसुद,शे.खाजा ,मुसेब पटेल, अरबाज खाँन,सय्यद मोहसीन, हाफेज सय्यद अहेमद,काजी मुबीनसाब, यांच्यासह  टिपु सुलतान प्रेमी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे आणण

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे माजी ता

.. महाराष्ट्रातील निवडणुका बॅलेट पेपरवर होणार; निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची माहिती

 महाराष्ट्र:- देशातील लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे जाहीर करण्यात आला असून महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे या कालावधीत एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता शनिवारपासून लागू झाली आहे. महाराष्ट्रात यंदाची निवडणूक विविध मुद्द्यांनी गाजणार आहे. यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दाही महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. राजकीय नेत्यांना आपली ताकद दाखवून देण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील सर्व ४८ मतदारसंघांत समाजातील तरुणांनी शेकडो उमेदवारी अर्ज दाखल करावेत, असं आवाहन केलं आहे. उमेदवारांची संख्या प्रचंड प्रमाणात असेल तर ईव्हीएमवर निवडणुका घेणं कठीण होणार आहे. अशातच आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ईव्हीएमच्या क्षमतेबाबत माहिती दिली आहे. ईव्हीएमसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना एस. चोक्कलिंगम म्हणाले की, "एका मतदारसंघात ४०० उमेदवारांहून अधिक उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यास आपल्याला बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी ला