किनवट :-
बळीराम पाटील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात
स्वतंत्र भारताच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त
वाणिज्य विभागाच्या वतीने आयटी क्षेत्रातील संधी या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. एस. के.बेंबरेकर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जाधव सेवा संगणकांचे संचालक, विठ्ठल राठोड, मीनाक्षी पदमावार, संस्था समन्वयक प्रा. राजकुमार नेम्मानीवार, मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. पंजाब शेरे, वाणिज्य विभागाच्या प्रा. डॉ. शुंभागी दिवे विचारमंचावर उपस्थित होते. जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना म्हणाले, आयटी क्षेत्रात वाणिज्य विभागाच्या विद्यार्थ्यांना नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. आयटी क्षेत्रातील प्रगतीशील उपक्रम कसे आहेत. याक्षेत्रातील प्रगतीसाठी करावे लागणारे कार्य प्रात्यक्षिक दाखवून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अॅबकसच्या विविध पध्दतीने समजावून सांगितले.विषयज्ञानाचे महत्त्व पटवून दिले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डाॅ.शुभांगी दिवे, वाणिज्य विभागप्रमुख प्रा. आम्रपाली हटकर यांनी सूत्रसंचालन केले. आभार प्रा. सुबोध गायकवाड यांनी मानले.
Comments
Post a Comment