Skip to main content

श्रीनिवास नेम्मानिवार यांच्या वाढदिवसानिमित्त समजोपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले



 किनवट ता. प्र दि ३० भाजपा शहराध्यक्ष श्रीनिवास नेम्मानिवार यांच्या वाढदिवसा निमित्त किनवट शहरात समाजोपयोगी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये भाजप च्या ज्येष्ठ पदाधिका-यांसह अनेक कार्यकर्त्यांनी उस्फुर्त सहभाग नोंदवुन कार्यक्रम यशस्वी केले.

माजी उपनगराध्यक्ष श्रीनिवास नेम्मानिवार यांच्या वाढदिवसा निमित्त प्रभाग क्रमांक २ मध्ये भाजपा तर्फे ई-सेवा केंद्राची स्थापना करण्यात आली ज्या मध्ये नागरीकांना विविध दाखला सुविधा ना नफा ना तोटा या तत्वावर पुरवली जाणार असुन ज्याचे संचलन भाजपा कार्यकर्ता व विद्यार्थी परिषद चे विद्यार्थी करणार आहेत ज्यामध्ये सद्य स्थितीत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्वकांक्षी योजना असलेली ई-श्रम कार्य ची नोंदणी मुख्यत्वे केली जाणार आहे ज्यामध्ये भविष्यात आधार दुरुस्ती केंद्र, मतदान कार्ड नोंदणी केंद्र यांच्या सह विविध नागरी दाखल्यांच्या सुविधा पुरवल्या जाणार आहेत.

या निमित्त दिनांक २९ रोजी आयोजित कार्यक्रामाव्दारे बोलतांना भाजपाच्या ज्येष्ठ सदस्यांनी सांगितले कि भाजपा हा एक विचार आहे ज्यामध्ये लोककल्याण हा महत्वाचा भाग असुन भाजपा मध्ये नेतृत्व करण्याची किंवा नेतृत्वाची आवश्यकता नसते तर जो विचार आहे तो जरी कार्यकर्त्याने अंगीकारला तर भाजपा हि निरंतर चालत असते त्यामुळे कार्यलर्त्यांनी इतर कोणत्याही शुल्लक गोष्टीचा विचार न करता लोकांच्या हितामध्ये निरंतर काम करत रहावे असे मार्ग दर्शन विविध ज्येष्ठ पदाधिका-यांकडुन मिळाले तर आयोजित कार्यक्रमाध्ये भाजपा किसान आघाडी चे प्रदेश सरचिटणिस सुधाकर भोयर, भाजपाचे ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष बाबुराव केंद्रे, नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, तालुका अध्यक्ष संदिप केंद्रे, ज्येष्ठ सदस्य राघु मामा, अजय चाडावार यांची मंचावर उपस्थिती होती. तर कार्यक्रमात अशोक चिन्नावार, संतोष चनमनवार, सतीश बिराजदार,  युवा आघाडीचे उमाकांत कराळे, वि.हिं.प चे  शिवराज चाडावार, सुनिल मच्छेवार,  शिवा आंधळे, पंकज माडपेल्लीवार,  नरेंद्र सिरमनवार, शिवा क्यातमवार, राजेंद्र भातनासे,  बाबू उटलावार, गजानन शिवनकर, जगदीश तिरमनवार, निखील कावळे, सतिष नेम्मानिवार, बालाजी धोत्रे,   गौरव इटकेपेल्लीवार, संतोष सिरमनवार, संतोष मरसकोल्हे, राहूल दग्गुलवार, आकाश भंडारे, देवराव कोम्मरवार, सुनिल मच्छेवार, संजय धोबे, साई नार्लावार, साई नेम्मानिवार, , गौरव इटकेपेल्लीवार, साई येलेश्वरवार, सम्राट सर्पे, दिनेश नगरुलवार यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्वास कोल्हारिकर यांनी केले तर आभार प्रदर्शन बाळकृष्ण कदम यांनी केले.  कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता जयराज वर्मा, वैभव सिरमनवार, नरसिंग तक्कलवार आदींनी परिश्रम घेतले.

तर कार्यक्रमात रजनीकांत राईचंवार, विनायक ठोंबरे, विकास जाधव, अंकुश पेन्शनवर, शिवा तोटावार, राजू कलकुंटलावार यांना  ई श्राम कार्डचे वाटप करण्यात आले. तर शहरात विविध ठीकाणी श्रीनिवास नेम्मानिवार यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला तर त्यांच्या प्रतिष्ठानवर प्रत्यक्ष भेटुन शुभेच्छा देणा-यांची रिघ लागली होती.

Comments

Popular posts from this blog

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे आणण

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे माजी ता

.. महाराष्ट्रातील निवडणुका बॅलेट पेपरवर होणार; निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची माहिती

 महाराष्ट्र:- देशातील लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे जाहीर करण्यात आला असून महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे या कालावधीत एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता शनिवारपासून लागू झाली आहे. महाराष्ट्रात यंदाची निवडणूक विविध मुद्द्यांनी गाजणार आहे. यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दाही महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. राजकीय नेत्यांना आपली ताकद दाखवून देण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील सर्व ४८ मतदारसंघांत समाजातील तरुणांनी शेकडो उमेदवारी अर्ज दाखल करावेत, असं आवाहन केलं आहे. उमेदवारांची संख्या प्रचंड प्रमाणात असेल तर ईव्हीएमवर निवडणुका घेणं कठीण होणार आहे. अशातच आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ईव्हीएमच्या क्षमतेबाबत माहिती दिली आहे. ईव्हीएमसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना एस. चोक्कलिंगम म्हणाले की, "एका मतदारसंघात ४०० उमेदवारांहून अधिक उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यास आपल्याला बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी ला