Skip to main content

स्वा. सै.टिपु सुलतान यांच्या बाबत अपशब्द वापरल्या बद्दल देवेंद्र फडणवीस यांच्यावर कारवाई करावी.... अन्यथा आंदोलन टिपु सुलतान ब्रिगेडचा इशारा

 


✍🏽 राजेश पाटील प्रतिनिधी:

किनवट : राज्याचे विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रजासत्ताक दिनी देशाचे पहिले स्वातंत्र्यसैनिक शहीद टिपु सुलतान यांच्या विषयी अपशब्द वापरुन त्यांचा अपमान केला. यांबद्दल देवेंद्र फडणवीस यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी टिपू सुलतान ब्रिगेड किनवट तर्फे उपविभागीय कार्यालय किनवट येथे निवेदन देऊन करण्यात आली.
        निवेदन मध्ये म्हटले आहे की, मुंबई येथील मालाड मध्ये बांधन्यात आलेल्या मैदानास टिपु सुलतान यांचे नाव देण्यात आले. खरेतर अगोदर पासुनच त्या मैदानाचे टिपु सुलतान हे नाव होते. परंतु भाजप व त्यांच्या सहयोगी संघटनांनी जाणून-बुजून देशाचे पहिले स्वातंत्र्य सैनिक व इंग्रजां विरोध लढता लढता वीरमरण पत्करणारे एकमेव राजा टिपू सुलतान यांच्या नावावरून वाद सुरू केला. टिपू सुलतान यांच्याबद्दल अवमानकारक भाषेचा वापर करण्यात आला.
        राज्यघटनेमध्ये राणी लक्ष्मीबाई यांच्या सोबतच टिपू सुलतान यांचा फोटो लावलेला आहे. महामहीम राष्ट्रपती रामनाथ गोविंद साहेबांनी कर्नाटक विधानसभेत टिपुसुलतान यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले आहेत. या सर्वांचा देवेंद्र फडणवीस भाजप व त्यांच्या सहयोगी संघटनांना विसर पडलेला आहे. जाणून-बुजून वाद निर्माण करून महाराष्ट्र आणि संपूर्ण देशातील वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न या माध्यमातून हे लोक करीत आहेत.
        देवेंद्र फडणवीस यांनी टिपू सुलतान यांच्या विषयी क्रूरकर्मा हिंदूंवर अत्याचार करणारा अशा शब्दांचा वापर केलेला आहे. हा भारतीय राज्यघटनेचा माननीय राष्ट्रपती महोदयांच्या सुद्धा अवमान आहे. याचा अर्थ असा होतो की भाजप आणि त्याच्या सहयोगी संघटनांना देशाची राज्यघटना मान्य नाही. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी टिपू सुलतान ब्रिगेड किनवट तर्फे करण्यात आली आहे तसेच आदोंलना चा इशारा देण्यात आला आहे
          निवेदनावर टिपू सुलतान ब्रिगेड नांदेड जिल्हाध्यक्ष सय्यद नदीम, किनवट तालुका अध्यक्ष शेख शाकीर, शेख शब्बार एकबाल खान, आमिर खान, अजमल शेख, शेख साहिल, शेख जुबेर, शेख शाकिर, शेख सफदर, सय्यद नदीम, तोसिफ खान, शेख मुनीर भाई, मोहम्मद अलाउद्दीन यांच्या स्वाक्षरा आहेत.
          तसेच या निवेदनाला पत्रकार सेवा संघाने देखील पाठिंबा दिला आहे असे पत्रकार सेवा संघाचे तालुकाध्यक्ष आशिष शेळके, सचिव नासिर तगाले व राज्य सरचिटणीस आनंद भालेराव यांनी सांगितले.




Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

आदिवासी विकास समिती मराठवाडा अध्यक्ष पदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती

 किनवट: राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती, आज दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी किनवट येथील गोकुंदा शासकीय विश्रामगृह येथे दैनिक वीर शिरोमणी वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे राज्य कार्याध्यक्ष शंकरसिंह ठाकुर सर तसेच दैनिक सा.नंदगिरीचा कानोसा या वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे मराठवाडा अध्यक्ष मारोती शिकारे सर नांदेड जिल्हाअध्यक्ष विनायक कामठेकर सर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक घेऊन राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली यावेळी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय जी सूर्यवंशी सर यांनी निवड जाहीर झाल्याबरोबर फोन वर अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या शुभेच्छांचा स्वीकार करत ट्रायबल सेवा न्यूज चॅनेल चे संपादक प्रणय कोवे  यांनी नांदेड जिल्हाअध्यक्ष पदावरून मराठवाडा अध्यक्ष या पदावर नियुक्ती केल्याबद्दल सरांचे मनःपूर्वक आभार मानले  प्रणय कोवे हे गेल्या अनेक वर्षापासू...

१० वर्षीय अरफात मलीक चव्हाण ने ठेवला आयुष्यातील पहिला रोजा

  किनवट प्रतिनिधि : इस्लाम धर्मात पवित्र रमजान या महिन्याला अनन्य महत्व प्राप्त आहेया महिन्यात सर्वच मुस्लिम बांधव यांच्यावर वयाच्या दहाव्या वर्षा पासून रोजा (उपवास) फर्ज (सक्तीचें) असतात.लहानपासून मोठ्यापर्यत या महिन्यांमध्ये 30 दिवस रोजा धरत असतात. पालकांचे पाहून लहान मुलांनाही रोजा धरण्याची लालसा निर्माण होते. त्यामुळे लहान चिमुकले ही मोठ्यांचे अनुकरण करीत रोजा (उपवास) धरतात.अशाच प्रकारे किनवट येथील मलीक चव्हाण यांचा 10 वर्षाचा मुलगा अरफात चव्हाण यांनी आपल्या जीवनातील पहिला रोजा सोमवारी 10 मार्च रोजी पूर्ण केला.मुस्लिम समाजात पवित्र असणाऱ्या या महिन्यात संपूर्ण महिनाभर दिवसभर पाणी न पिता उपवास ठेवला जातो.यावर्षी रोजा (उपवास) सकाळी 5.10 वाजता सुरू होत असून संध्याकाळी 6.28 ला रोजा सोडण्याची वेळ आहे.13 तासा पेक्षा जास्त वेळचा उपवास असल्याने या उष्णतेचा मोठ्या माणसांनादेखील खूप त्रस होतो.त्यात या चिमुकल्याने पहिला रौजा ठैवून आपल्या आयुष्याची सुरुवात एक चांगल्या प्रकारे व्हावी या हेतूने उपवास ठैेवला.त्यामुळे अरफात मलिक चव्हाण यांचे सर्व्र कौतुक होत आहे.