Skip to main content

'बळीराम पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने एक दिवसीय आभासी राष्ट्रीय चर्चासत्र '



ता. प्र. किनवट:-

  स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ ,नांदेड व बळीराम पाटील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,किनवट यांच्या संयुक्त विद्यमाने स्वतंत्र भारताच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मराठी विभागाच्या वतीने 'समकालीन मराठी साहित्य :स्वरूप आणि प्रेरणा 'या विषयावर एकदिवसीय आभासी राष्ट्रीय चर्चासत्र दिनांक 20 जानेवारी 2022रोजी सकाळी ठीक अकरा वाजता आयोजित करण्यात आले आहे. या राष्ट्रीय चर्चासत्राचे अध्यक्ष तथा किनवट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रफुल्ल राठोड,उदघाटक जोगेंद्रसिंह बिसेन प्र-कुलगुरु स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड

बीजभाषण प्रसिद्ध विचारवंत डॉ. केदार काळवणे, कळंब, प्रा. डॉ. पृथ्वीराज तौर, भाषा वाडमय व संस्कृती अभ्यास संकुल तथा सदस्य मराठी भाषा सल्लागार समिती, महाराष्ट्र शासन, प्रसिद्ध विचारवंत डॉ.प्रल्हाद लुलेकर, ,प्रसिद्ध नाट्यलेखक प्रकाश त्रिभुवन,डाॅ.गणेश चंदनशिवे,प्रमुख,लोककला विभाग, मुंबई विद्यापीठ मुंबई ,

प्रा. डॉ.विनोंद कुमरे, डॉ. उर्मिला चाकूरकर, डॉ. गणेश मोहिते, डॉ. अरुण कुलकर्णी, डॉ. शंकर विभुते डॉ. संतोष हंकारे,हे 'समकालीन मराठी साहित्य :स्वरूप आणि प्रेरणा 'या विषयावर मार्गदर्शन करतील.समारोपीय समारोप कार्यक्रमाचे अध्यक्ष नारायणराव सिडाम ,उपाध्यक्ष किशिस, तर प्रमुख उपस्थिती 

गंगारेड्डी बैनमवार, उपाध्यक्ष किशिस, 

शंकरराव चाडावार, सचिव,किशिस, जसवंतसिंग सोखी, कोषाध्यक्ष किशिस या मान्यवरांच्या उपस्थितीत राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. हे चर्चासत्र चारसत्रामध्ये होईल.साहित्यप्रेमी रशिकांनी सहभागी होऊन सहकार्य करावे असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. एस. के. बेंबरेकर, उपप्राचार्य डॉ. गजानन वानखेडे, संस्था समन्वयक प्रा राजकुमार नेम्मानीवार, पर्यवेक्षक प्रा. अनिल पाटील, मराठी विभागप्रमुख तथा राष्ट्रीय चर्चासत्र समन्वय प्रा. डॉ. पंजाब शेरे, तात्रिक सहाय्यक प्रा. डॉ. योगेश सोमवंशी यांनी कळविले आहे.

Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

आदिवासी विकास समिती मराठवाडा अध्यक्ष पदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती

 किनवट: राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती, आज दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी किनवट येथील गोकुंदा शासकीय विश्रामगृह येथे दैनिक वीर शिरोमणी वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे राज्य कार्याध्यक्ष शंकरसिंह ठाकुर सर तसेच दैनिक सा.नंदगिरीचा कानोसा या वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे मराठवाडा अध्यक्ष मारोती शिकारे सर नांदेड जिल्हाअध्यक्ष विनायक कामठेकर सर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक घेऊन राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली यावेळी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय जी सूर्यवंशी सर यांनी निवड जाहीर झाल्याबरोबर फोन वर अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या शुभेच्छांचा स्वीकार करत ट्रायबल सेवा न्यूज चॅनेल चे संपादक प्रणय कोवे  यांनी नांदेड जिल्हाअध्यक्ष पदावरून मराठवाडा अध्यक्ष या पदावर नियुक्ती केल्याबद्दल सरांचे मनःपूर्वक आभार मानले  प्रणय कोवे हे गेल्या अनेक वर्षापासू...

१० वर्षीय अरफात मलीक चव्हाण ने ठेवला आयुष्यातील पहिला रोजा

  किनवट प्रतिनिधि : इस्लाम धर्मात पवित्र रमजान या महिन्याला अनन्य महत्व प्राप्त आहेया महिन्यात सर्वच मुस्लिम बांधव यांच्यावर वयाच्या दहाव्या वर्षा पासून रोजा (उपवास) फर्ज (सक्तीचें) असतात.लहानपासून मोठ्यापर्यत या महिन्यांमध्ये 30 दिवस रोजा धरत असतात. पालकांचे पाहून लहान मुलांनाही रोजा धरण्याची लालसा निर्माण होते. त्यामुळे लहान चिमुकले ही मोठ्यांचे अनुकरण करीत रोजा (उपवास) धरतात.अशाच प्रकारे किनवट येथील मलीक चव्हाण यांचा 10 वर्षाचा मुलगा अरफात चव्हाण यांनी आपल्या जीवनातील पहिला रोजा सोमवारी 10 मार्च रोजी पूर्ण केला.मुस्लिम समाजात पवित्र असणाऱ्या या महिन्यात संपूर्ण महिनाभर दिवसभर पाणी न पिता उपवास ठेवला जातो.यावर्षी रोजा (उपवास) सकाळी 5.10 वाजता सुरू होत असून संध्याकाळी 6.28 ला रोजा सोडण्याची वेळ आहे.13 तासा पेक्षा जास्त वेळचा उपवास असल्याने या उष्णतेचा मोठ्या माणसांनादेखील खूप त्रस होतो.त्यात या चिमुकल्याने पहिला रौजा ठैवून आपल्या आयुष्याची सुरुवात एक चांगल्या प्रकारे व्हावी या हेतूने उपवास ठैेवला.त्यामुळे अरफात मलिक चव्हाण यांचे सर्व्र कौतुक होत आहे.