Skip to main content

'बळीराम पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने एक दिवसीय आभासी राष्ट्रीय चर्चासत्र '



ता. प्र. किनवट:-

  स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ ,नांदेड व बळीराम पाटील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,किनवट यांच्या संयुक्त विद्यमाने स्वतंत्र भारताच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मराठी विभागाच्या वतीने 'समकालीन मराठी साहित्य :स्वरूप आणि प्रेरणा 'या विषयावर एकदिवसीय आभासी राष्ट्रीय चर्चासत्र दिनांक 20 जानेवारी 2022रोजी सकाळी ठीक अकरा वाजता आयोजित करण्यात आले आहे. या राष्ट्रीय चर्चासत्राचे अध्यक्ष तथा किनवट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रफुल्ल राठोड,उदघाटक जोगेंद्रसिंह बिसेन प्र-कुलगुरु स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड

बीजभाषण प्रसिद्ध विचारवंत डॉ. केदार काळवणे, कळंब, प्रा. डॉ. पृथ्वीराज तौर, भाषा वाडमय व संस्कृती अभ्यास संकुल तथा सदस्य मराठी भाषा सल्लागार समिती, महाराष्ट्र शासन, प्रसिद्ध विचारवंत डॉ.प्रल्हाद लुलेकर, ,प्रसिद्ध नाट्यलेखक प्रकाश त्रिभुवन,डाॅ.गणेश चंदनशिवे,प्रमुख,लोककला विभाग, मुंबई विद्यापीठ मुंबई ,

प्रा. डॉ.विनोंद कुमरे, डॉ. उर्मिला चाकूरकर, डॉ. गणेश मोहिते, डॉ. अरुण कुलकर्णी, डॉ. शंकर विभुते डॉ. संतोष हंकारे,हे 'समकालीन मराठी साहित्य :स्वरूप आणि प्रेरणा 'या विषयावर मार्गदर्शन करतील.समारोपीय समारोप कार्यक्रमाचे अध्यक्ष नारायणराव सिडाम ,उपाध्यक्ष किशिस, तर प्रमुख उपस्थिती 

गंगारेड्डी बैनमवार, उपाध्यक्ष किशिस, 

शंकरराव चाडावार, सचिव,किशिस, जसवंतसिंग सोखी, कोषाध्यक्ष किशिस या मान्यवरांच्या उपस्थितीत राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. हे चर्चासत्र चारसत्रामध्ये होईल.साहित्यप्रेमी रशिकांनी सहभागी होऊन सहकार्य करावे असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. एस. के. बेंबरेकर, उपप्राचार्य डॉ. गजानन वानखेडे, संस्था समन्वयक प्रा राजकुमार नेम्मानीवार, पर्यवेक्षक प्रा. अनिल पाटील, मराठी विभागप्रमुख तथा राष्ट्रीय चर्चासत्र समन्वय प्रा. डॉ. पंजाब शेरे, तात्रिक सहाय्यक प्रा. डॉ. योगेश सोमवंशी यांनी कळविले आहे.

Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रका...