Skip to main content

आदिवासी समाजाची कुलस्वामिनी माता जंगोरायताड चित्रपटचा उदघाटन सोहळा


 असिफाबाद:

आदिवासी समाजाची कुलस्वामिनी माता जंगोरायताड, चित्रपटचा उदघाटन सोहळा  तेलंगाना राज्यातील कोटा परंदोली भीडवार गोंदी कुमराम भीम केरामिरी जिल्हा आसिफाबाद या ठिकाणी मोठया उत्साही वातावरणात पार पडला तसेच या कार्यक्रमाला

प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्यातून ट्रायबल सेवा न्युज चॅनल चे संपादक प्रणय कोवे होते .तर चित्रपटाचे उदघाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष सुभाषजी कनाके यांच्या हास्ते करण्यात आले. ट्रायबल सेवा न्युज चॅनल चे स्वीय सहायक रमेश परचाके सर्व संगाजनाच्या च्या उपस्थितीत हा नयनरम्य उदघाटन सोहळा उत्साही वातावरणात पाडला. 

चार हजार वर्षापूर्वीचा माता जंगोरायताड चा इतिहास प्रथमच मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कुमराम भीम आर्ट्स या फाउंडेशन तर्फे या चित्रपटाची निर्मिती केली जाणार आहे. हा चित्रपट सलग अडीज तासाचा असणार आहे व हा चित्रपट तेलुगु, गोंडी, हिंदी 

या तीन भाषेत प्रदर्शित केला जाणार आहे 

चित्रपटाच नाव आगीनधुड जंगोरायताड आहे. 


या चित्रपटाचा निर्माता व्यंकटेश कुमरे, चित्रपट लेखिका हेमलता कुमरे,

संगीतकार ,वेठ्ठी योदन, गायक केशव नैताम,जंगो कनाके ,कुमराम भीम आर्ट्स  युनीट ची संपुर्ण टीम रमेश घोडाम, वेठ्ठी देवीदास, तुकाराम वेठ्ठी 

लक्ष्मण घोडाम ,कॅमेरामॅन राकेश, जयश्री घोडाम, वैष्णवी वेठ्ठी, निरंजन वेठ्ठी, 

शुकलाल वेठ्ठी, गणेश वेठ्ठी, नामदेव नैताम, राजकुमार, विष्णु कुमरे, 

या सर्वाच्या सहकार्याने हा चित्रपट साकारला जाणार आहे हा चित्रपट निर्माण करण्यासाठी 

विशेष निधी समाज बांधवान तर्फे मिळाला त्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत, रामकृष्ण मेश्राम मुंबई, रमेश कोवे ,राजु सिडाम, गणेशजी डोंगरे, मारोती कन्नाके, कैलास पंधरे, मोहन कोवे, प्रतिक केराम,मुरहारी कन्नाके, 

सुभाष कन्नाके 

या सर्वाच योगदान मोलाच आहे. 

या ही पुढे समाजातील लोकांच योगदान मिळेल अशी आशा सुभाषजी कनाके यांनी आमच्या चॅनल ला बोलावून दाखवली . या वेळी साईकिरण वेठ्ठी,गजानन आरके, गणेश वेठ्ठी, संतोष पहुरकर, जितेंद्र कुलसंगे, संतोष कन्नाके, गणेश आरके, शंशाक कन्नाके

सौरभ कन्नाके आदींची उपस्थिती होती.

Comments

Popular posts from this blog

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे आणण

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे माजी ता

.. महाराष्ट्रातील निवडणुका बॅलेट पेपरवर होणार; निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची माहिती

 महाराष्ट्र:- देशातील लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे जाहीर करण्यात आला असून महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे या कालावधीत एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता शनिवारपासून लागू झाली आहे. महाराष्ट्रात यंदाची निवडणूक विविध मुद्द्यांनी गाजणार आहे. यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दाही महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. राजकीय नेत्यांना आपली ताकद दाखवून देण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील सर्व ४८ मतदारसंघांत समाजातील तरुणांनी शेकडो उमेदवारी अर्ज दाखल करावेत, असं आवाहन केलं आहे. उमेदवारांची संख्या प्रचंड प्रमाणात असेल तर ईव्हीएमवर निवडणुका घेणं कठीण होणार आहे. अशातच आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ईव्हीएमच्या क्षमतेबाबत माहिती दिली आहे. ईव्हीएमसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना एस. चोक्कलिंगम म्हणाले की, "एका मतदारसंघात ४०० उमेदवारांहून अधिक उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यास आपल्याला बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी ला