Skip to main content

आदिवासी समाजाची कुलस्वामिनी माता जंगोरायताड चित्रपटचा उदघाटन सोहळा


 असिफाबाद:

आदिवासी समाजाची कुलस्वामिनी माता जंगोरायताड, चित्रपटचा उदघाटन सोहळा  तेलंगाना राज्यातील कोटा परंदोली भीडवार गोंदी कुमराम भीम केरामिरी जिल्हा आसिफाबाद या ठिकाणी मोठया उत्साही वातावरणात पार पडला तसेच या कार्यक्रमाला

प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्यातून ट्रायबल सेवा न्युज चॅनल चे संपादक प्रणय कोवे होते .तर चित्रपटाचे उदघाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष सुभाषजी कनाके यांच्या हास्ते करण्यात आले. ट्रायबल सेवा न्युज चॅनल चे स्वीय सहायक रमेश परचाके सर्व संगाजनाच्या च्या उपस्थितीत हा नयनरम्य उदघाटन सोहळा उत्साही वातावरणात पाडला. 

चार हजार वर्षापूर्वीचा माता जंगोरायताड चा इतिहास प्रथमच मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कुमराम भीम आर्ट्स या फाउंडेशन तर्फे या चित्रपटाची निर्मिती केली जाणार आहे. हा चित्रपट सलग अडीज तासाचा असणार आहे व हा चित्रपट तेलुगु, गोंडी, हिंदी 

या तीन भाषेत प्रदर्शित केला जाणार आहे 

चित्रपटाच नाव आगीनधुड जंगोरायताड आहे. 


या चित्रपटाचा निर्माता व्यंकटेश कुमरे, चित्रपट लेखिका हेमलता कुमरे,

संगीतकार ,वेठ्ठी योदन, गायक केशव नैताम,जंगो कनाके ,कुमराम भीम आर्ट्स  युनीट ची संपुर्ण टीम रमेश घोडाम, वेठ्ठी देवीदास, तुकाराम वेठ्ठी 

लक्ष्मण घोडाम ,कॅमेरामॅन राकेश, जयश्री घोडाम, वैष्णवी वेठ्ठी, निरंजन वेठ्ठी, 

शुकलाल वेठ्ठी, गणेश वेठ्ठी, नामदेव नैताम, राजकुमार, विष्णु कुमरे, 

या सर्वाच्या सहकार्याने हा चित्रपट साकारला जाणार आहे हा चित्रपट निर्माण करण्यासाठी 

विशेष निधी समाज बांधवान तर्फे मिळाला त्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत, रामकृष्ण मेश्राम मुंबई, रमेश कोवे ,राजु सिडाम, गणेशजी डोंगरे, मारोती कन्नाके, कैलास पंधरे, मोहन कोवे, प्रतिक केराम,मुरहारी कन्नाके, 

सुभाष कन्नाके 

या सर्वाच योगदान मोलाच आहे. 

या ही पुढे समाजातील लोकांच योगदान मिळेल अशी आशा सुभाषजी कनाके यांनी आमच्या चॅनल ला बोलावून दाखवली . या वेळी साईकिरण वेठ्ठी,गजानन आरके, गणेश वेठ्ठी, संतोष पहुरकर, जितेंद्र कुलसंगे, संतोष कन्नाके, गणेश आरके, शंशाक कन्नाके

सौरभ कन्नाके आदींची उपस्थिती होती.

Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...