Skip to main content

मांडवी येथे अवैध धंदे विरुद्ध धडक कारवाई



 इंद्रपाल कांबळे प्रतिनिधी मांडवी:-


  दी.13/01/022 रोजी अन्न व औषध प्रशासन विभाग नांदेड यांच्या  कार्यालय द्वारे गुप्त माहितीच्या आधारे मांडवी येथील पवन गणेश राठोड यांच्या दुकानात रेडटाकून केलेल्या कारवाई मधे मुद्देमालासह  आरोपीसअटक करण्यात आली आहे.

 महाराष्ट्र शासनास प्रतिबंधित केलेल्या अन्नपदार्थ पानमसाला सुगंधित तंबाखू गुटखा एकूण रुपये 38,600 चा मुद्देमाल जप्त केला. सदर दुकान पुढील आदेशापर्यंत शील करण्यात आले आहे याप्रकरणी विक्रेता पवन गणेश राठोड राहणार मांडवी .  शमी  अल्ला खान. साजित अल्हाखान, अस्लम खान  ,व अक्रम भटी सर्व राहणार आदिलाबाद यांच्याविरुद्ध भादवि कलम मांडवी येथे 188 .272. 273. 328 व अन्न सुरक्षा अधिकारी सतीश हाके यांच्या फिर्यादीवरून  गुन्हे दाखल करण्यात आली आहे.

 सदर कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी सतीश हाके,अन्न सुरक्षा अधिकारी श्री ऋषिकेश मरेवार यांनी प्रभारी सहाय्यक आयुक्त श्री रमेश कावळे यांच्या मार्गदर्शन केले.

 मांडवी परिसरात अनेक खेडेगावांमध्ये गुटखा घरपोच बाईकवरून पुरवठा केला जातो हा लाखोचा गुटका व्यवसाय किराणा दुकानातून राजरोसपणे सुरू असून याकडे संबंधित प्रशासकीय  विभाग लक्ष देणार का असा प्रश्न निर्माण होत आहे किनवट तालुक्यातील तेलंगणा राज्याच्या सीमेलगत असून या  मुळे गुटका हा व्यापार मोठ्या प्रमाणात होत असून यामुळे त्याचा व्यवसाय यात तरुण पिढी गुतत्त जात आहे.  मटका, गुटखा,दारू अशा अवैध धंद्यांना या परिसरात खेड्यापाड्यात चांगला जम बसविला असून नवीन तरुण मुलाकडून घरोघरी जाऊन मटक्याची पट्टी  घेतले जात आहे तर  हे असेच चालू राहिले तर गेल्या वर्षी पिंपळगाव फाटा येथे गावकऱ्यांनीच अवैध धंदा विरुद्ध मोर्चा काडून रास्ता रोको केला त्याची पुनरावृत्ती केल्याशिवाय राहणार नाही अशी गावकऱ्यंकडून  बोलले जात असून प्रशासनाने वेळी  कारवाई करून हे अवैध  व्यवसाय  बंद करावा असे सुजाण नागरिकांकरून बोलले जात आहे.



Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...