Skip to main content

किनवट नगर परिषदेने विस्थापित केलेल्या दिव्यांग कुटुंबाचे पुनर्वसन करावे

 



किनवट शहर प्रतिनिधी (राज माहुरकर)

किनवट नगरपरिषद हद्दीतील विस्थापित झालेल्या कुटुंबापैकी एक कुटुंब किनवट सहाय्यक जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला.

अखिल भारतीय अपंग कामगार संघटनेचे शहराध्यक्ष सलाम अब्दुल रहमान हे स्वतः दोन्ही पायाने दिव्यांग असून विस्थापित झालेल्या कुटुंबासह त्यांनी आजपर्यंत न्याय मिळविण्यासाठी अनेक प्रयत्न सामूहिक रीत्या केले होते परंतु विस्थापित झालेल्या कुटुंबामध्ये एक मत नसल्याने शहराध्यक्ष सलाम अब्दुल रहमान यांनी संघटनेचे सचिव राज माहुरकर यांच्याकडे न्याय मिळून देण्याबाबत विनंती केल्यानुसार सदर निवेदन देऊन उपोषणास बसणार आहे गांधीनगर येथील 25 कुटुंबांना अतिक्रमित घोषित करून नगरपरिषदेने कोणताच सक्षम आदेश नसताना बळाचा वापर करून गांधिनगर वासियांना विस्थापित केले असल्याचे चर्चा शहरात जोर धरत आहे विस्थापित झालेले कुटुंब योग्य पद्धतीने शासन प्रशासनाकडे आंदोलन करत नसल्याने सलाम अब्दुल रहमान यांनी संघटनेच्यावतीने न्याय मिळवण्यासाठी 10/01/2022 रोजी सहाय्यक जिल्हाधिकारी किनवट यांच्याकडे निवेदन सादर करून निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी नांदेड, तहसीलदार किनवट, मुख्याधिकारी नगर परिषद किनवट व पोलिस ठाणे यांना दिले आहे निवेदनात त्यांनी मूलभूत सुविधेसह पुनर्वसनाची मागणी करत नगर परिषद हद्दीतील जागेवर पुनर्वसन करण्यात यावे अन्यथा 25/01/2022 पासून कुटुंबासह आमरण उपोषणास बसणार आहेत

Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...