बळीराम पाटील महाविद्यालयाने सामाजिक बांधिलकी जपली संपावर असलेल्या एसटी महामंडळाच्या कुटुंबीयाना अन्नधान्याचे किट केले वाटप
(शहर प्रतिनिधी किनवट:)
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे कर्मचारी गेल्या तीन ते चार महिन्यांपासून संपावर असल्याने त्यांच्यावर व त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे एक सामाजिक बांधिलकी म्हणून किनवट शिक्षण संस्था व बळीराम पाटील महाविद्यालयाच्या वतीने त्यांना अन्नधान्याचे किट वाटप करण्यात आले
शिक्षण संस्था किनवटचे अध्यक्ष प्रफुल्ल राठोड , नारायण सिडाम ,संध्याताई राठोड , सचिव अजय चाडावार, जसवंतसिंग सोखी,प्राचार्य डॉ. शिवराज बेंबरेकर,संतोष चनमनवार, चंद्रकांत नेमानीवार, भावना दीक्षित यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये अन्नधान्याचा किट वाटप करण्यात आला. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये समाविष्ट करण्यात यावे महागाई भत्ता, घरभाडे, पगार वाढ आदी मागण्या घेऊन एसटी महामंडळाचे कर्मचारी गेल्या अनेक दिवसांपासून संपावर असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आर्थिक संकटामुळे अनेक कर्मचारी आत्महत्या केले त्या अनुषंगाने सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून किनवट शिक्षण संस्थेच्या वतीने अन्नधान्याचे किट वाटप करण्यात आले याप्रसंगी महाविद्यालयाचे प्रा. राजकुमार नेमानीवार,उपप्राचार्य डॉ गजानन वानखेडे, कार्यालयीन अधीक्षक राजेंद्र धात्रक, पर्यवेक्षक प्रा.अनिल पाटील, कार्यक्रमाधिकारी प्रा पुरुषोत्तम येरडलावार ,गोवर्धन लांब, श्रीनिवास रेड्डी, प्रा. लता पेंडलवाड,प्रा काझी,प्रा ज्ञानेश्वर चाटे,प्रा प्रल्हाद जाधव आदि उपस्तीत होते.
Comments
Post a Comment