Skip to main content

बेलखेड येथे महाकवी वामनदादा कर्डक यांची जयंती उत्साहात

 


उमरखेड ता. प्रतिनिधी( सुमेध घुगरे):-

भारतीय बौद्धमहासभा ता.उमरखेड व अक्षरोदय साहित्य मंडळ शाखा उमरखेड यांच्या वतीने कविसंमेलन प्रश्नमंजुषा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे दि.29/08/2021रोजी बेलखेड येथे आयोजन करण्यात आले. 

कार्यक्रमाचे उदघाटन मा.अतुल पाटिल उपसरपंच बेलखेड यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष -धम्मदिप काळबांडे तालुका अध्यक्ष भा. बौ. म.उमरखेड तर कविसंमेलनाध्यक्ष नरेंद्र धोंगडे सुप्रसिद्ध साहित्यिक नांदेड हे होते.प्रमुख पाहुणे  प्रज्ञानंद खडसे सभापती पं. स. उमरखेड, राहुल कऱ्हाळे प्रकल्प अधिकारी यवतमाळ, चिमणाजी काळबांडे बौद्धाचार्य ,सुधाकर लोमटे साहित्यिक उमरखेड ,एल. एस. काळबांडे कवी गीतकार,हे उपस्थित होते.


कविसंमेलनात 

सहभागी कवी  

दगडू घुगरे,मारोती काळबांडे, यशवंत काळबांडे, डी. बी. शिंगणकर, पंडित काळबांडे, प्रा.गजानन दामोधर,सुधाकर लोमटे, एल.एस.काळबांडे,सुमेध घुगरे, सुभाष शिंगणकर, सज्जन बरडे यांनी बहारदार रचना सादर केल्या.


सांस्कृतिक गायनाच्या कार्यक्रमात 

प्रबोधनकार कैलास राऊत आणि संच हदगाव व गायिका वर्षाताई काळबांडे उमरखेड ,किसन मनवर,सहदेव शिंगणकर,पंडित काळबांडे,नारायण पाटील,मूकींदा शिंगणकर यांनी गायन केले.  कवि व कलावंतांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. भारतीय बौध्द महासभेचे सर्व पदाधिकारी व गांवकरी कार्यक्रमास उपस्थित होते.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक कैलास घुगरे यांनी तर सूत्रसंचालन सुमेध घुगरे आणि सज्जन बरडे यांनी केले.  आभार आयोजक कवी सुभाष शिंगणकर यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तथागत यंग युनियन मित्र मंडळ बेलखेड यांनी मेहनत घेतली.

Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...