Skip to main content

हिंगोली लोकसभा मतदारसंघातील १० हजार ५७४ घरकुलांना मंजूरी


 हिंगोली:-

हिंगोली लोकसभा मतदारसंघातील १० हजार ५७४ घरकुलांना मंजूरी देशात सर्वत्र प्रधानमंत्री आवास योजना  राबविण्यात आली मात्र एक वर्षापेक्षा जास्त कालावधी लोटूनही अनेक लाभार्थ्यांना अद्याप त्यांचे निम्मे हप्ते न मिळाल्याने त्यांची घरे अर्धवट राहिली होती, केंद्राच्या निधी अभावी हिंगोली लोकसभा मतदारसंघात ही योजना रखडली होती. त्याची तात्काळ दखल घेऊन मतदार संघातील ६ नगरपालिका व ५ नगरपंचायतीच्या अंतर्गत पंतप्रधान आवास योजनेतील रखडलेला निधी तात्काळ मंजूर करण्यात यावा, यासाठी केंद्रीय गृहनिर्माण मंत्री हरदीप सिंग पुरी Hardeep Singh Puri  यांची भेट घेऊन मतदार संघासाठी एकूण  १० हजार ५७४ घरकुलांसाठी १५८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे. त्यापैकी ५० कोटी रुपयांचा लाभार्थ्यांना वितरित करण्यात आला आहे. त्यात हिमायतनगर तालुक्यासाठी सर्वाधिक ६ कोटी ६१ लक्ष रुपयाचा सर्वाधिक निधी मंजूर झाला आहे. यामुळे  सर्वसामान्य नागरिकांचे घराचे स्वप्न साकार होणार आहे.


हिमायतनगर ६ कोटी ६१ लक्ष,

हिंगोली ६ कोटी ४३ लक्ष, 

वसमत ४ कोटी १८ लक्ष, 

कळमनुरी २ कोटी ४२ लक्ष, 

उमरखेड ३ कोटी ८८ लक्ष,  

हदगाव ५ कोटी २१ लक्ष, 

किनवट ४ कोटी १० लक्ष,

माहूर ५ कोटी ०२ लक्ष,  

औंढा नागनाथ ४ कोटी ७२ लक्ष, 

महागाव ३ कोटी ७१ लक्ष आणि  

सेनगाव साठी २ कोटी ९८ लक्ष आहेत. 


आपले घर असावे हे सर्व सामान्य जनतेचे स्वप्न असते आणि ते त्यांना मिळायलाच पाहिजे, त्यासाठी सदैव प्रयत्नशील राहील.


   *खासदार हेमंत पाटील*

      हिंगोली लोकसभा

Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...