Skip to main content

जागतिक महिला दिनानिमित्त संथागार येथे पाळी या विषयावर जनजागृती चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला...



(तालुका प्रतिनीधी किनवट):-                                                        ८ मार्च
जागतिक महिला दिन हा दिवस सर्व जगामध्ये मोठया उत्साहात साजरा केला जातो याच दिनाचे औचित्य साधुन किनवट येथील डॉ. बाबासाहेब आबेंडकर  चौक जवळील संथागार वृध्दाश्रमात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .

पाळी ही विटाळ नाही ती नैसर्गिक देणगी आहे त्या बद्दल समाजात असलेले गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न या कार्यक्रमात केला गेला व जनजागृती करण्यात आली.

या कार्यक्रमाचे उद्घाटन माहुरच्या लोकप्रीय मा. नगराध्यक्षा शितल जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. 

या कार्यक्रमात सहभागी वक्त्या अॅड प्रियंका सुनिल कैवारे पाटील आणि सहभागी वक्ते युवा प्रबोधनकार अतुलराज बेळीकर ह्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.. 

ॲड दिपा सोनकांबळे,ॲड सुनयना गेडाम यांनी कायद्याची माहिती तसेच महिला सांठीचे कलमे संविधानातील तरतुदी आदींची सविस्तर दिली.

कार्यक्रमाचा समारोप स्मिता पहुरकर यांच्या अध्यक्षीय भाषणाने करण्यात आला..


आदरणीय  बळीराम पाटील महाविद्यालयाचे निवृत्त व माजी मराठी विभाग प्रमुख  प्रा.डॉ.रामप्रसाद तौर सर हे कार्यक्रमास आवर्जून उपस्थित होते..


सर्व मान्यवरांचे स्वागत मा.करुणा आळणे आणि मा. अरुण आळणे यांच्या हस्ते करण्यात आले.

आनिकेत कुत्तरमारे यांच्या कडून देण्यात आलेल्या सॅनिटरी नॅपकिनचे वाटप करण्यात आले..

या कार्यक्रमात सुमतीबाई हेमसिंग नाईक कन्या शाळेच्या विद्यार्थ्यीनी उपस्थित होत्या.  या कार्यक्रमाचे आयोजन संथागार वृध्दाश्रमाच्या अधिक्षक आकांक्षा आळणे ह्यांनी केले होते..

Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...