(तालुका प्रतिनीधी किनवट):- ८ मार्च
पाळी ही विटाळ नाही ती नैसर्गिक देणगी आहे त्या बद्दल समाजात असलेले गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न या कार्यक्रमात केला गेला व जनजागृती करण्यात आली.
या कार्यक्रमाचे उद्घाटन माहुरच्या लोकप्रीय मा. नगराध्यक्षा शितल जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमात सहभागी वक्त्या अॅड प्रियंका सुनिल कैवारे पाटील आणि सहभागी वक्ते युवा प्रबोधनकार अतुलराज बेळीकर ह्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले..
ॲड दिपा सोनकांबळे,ॲड सुनयना गेडाम यांनी कायद्याची माहिती तसेच महिला सांठीचे कलमे संविधानातील तरतुदी आदींची सविस्तर दिली.
कार्यक्रमाचा समारोप स्मिता पहुरकर यांच्या अध्यक्षीय भाषणाने करण्यात आला..
आदरणीय बळीराम पाटील महाविद्यालयाचे निवृत्त व माजी मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.रामप्रसाद तौर सर हे कार्यक्रमास आवर्जून उपस्थित होते..
सर्व मान्यवरांचे स्वागत मा.करुणा आळणे आणि मा. अरुण आळणे यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमात सुमतीबाई हेमसिंग नाईक कन्या शाळेच्या विद्यार्थ्यीनी उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे आयोजन संथागार वृध्दाश्रमाच्या अधिक्षक आकांक्षा आळणे ह्यांनी केले होते..
Comments
Post a Comment