Skip to main content

इस्लाम समाजाच्या कुराण धर्मग्रंथाबद्दल अपशब्द काढणाऱ्या रिजवी वर कार्यवाहीची मागणी : टिपू सुलतान ब्रिगेड किनवट



ता. प्र.किनवट:

देश आधीच कोरोना महामारीत आरोग्य, बेरोजगारी, उपासमारी आणि  अर्थिक संकटांचा सामना करीत असताना जाणीव पूर्वक देशात अशांतता निर्माण करण्याच्या उद्देशाने धार्मिक द्वेष पसरवणारे कृत्य करणाऱ्या वसीम रिजवी या समाज कंटका विरूद्ध राष्ट्रीय सुरक्षा कायद्या अंतर्गत कठोर कारवाई करण्यात यावी अशी तक्रार टिपू सुलतान ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष डाॅ. ज़हीरूद्दिन पठान यांच्या मार्गदर्शनानुसार टिपू सुलतान ब्रिगेड किनवट तालुका शाखेच्यावतीने उप विभागीय अधिकारी, किनवट आणि कदीम पोलीस ठाणे, किनवट अशा दोन ठिकाणी दाखल करण्यात आली. वसीम रिजवी या समाज कंटकाने इस्लामी धर्मग्रंथ कुराणातील 26 आयाती कमी करण्यात यावे अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे, तसेच इंडिया टि. व्ही.  ला मुलाखत देताना कुराणाचा संबंध आतंकवादाशी जोडून कुराणामुळे मुस्लिम युवक आतंकवादाकडे वळत आहेत अशा बिन बुडाचे आरोप केले आहेत. यामुळे समस्त भारतीय मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. तसेच मुस्लिमेत्तर समाज बांधवांमध्ये गैरसमज पसरविण्याचे कार्य जाणीवपूर्वक करण्यात आले आहे.

         टिपू सुलतान ब्रिगेड तर्फे जनतेला आवाहन करण्यात आले की आपण संयम बाळगावा व देशात, समाजात शांतता अबाधित ठेवण्यासाठी संविधानिक आणि कायदेशीर पद्धतीने व ज्येष्ठांच्या संमतीने प्रकरण हाताळावे. वसीम रिजवी व त्या विचारधारेचा समूह आधी पासूनच श्रद्धावंत नाही. परंतु काही लोकं वसीम रिजवी यांना‌ बहिष्कृत केल्याचे प्रसारीत करत आहेत. तो स्वत: स्वीकार करतो की तो श्रद्धावंत नाही आणि तो अबु बक्र रजि., उमर रजि., उस्मान रजि., आई आयेशा रजि.,ई. चा तिरस्कार आणि शत्रूत्व करतो म्हणून मुस्लिम समाजाने  या समूहाच्या नाटकी प्रचाराला बळी पडू नये. वसीम रिजवी हा वंशवादाचा पुरस्कर्ता आहे. म्हणून वसीम रिजवीवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.

       याप्रसंगी टिपू सुलतान ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष सय्यद नदीम,  तालुका अध्यक्ष शेख शाकीर, युवा तालुका अध्यक्ष शेख समीर, जमीयते उलेमा हिंदचे मौलाना करीमोद्दिन, मौलाना सुलेमान, सामाजिक कार्यकर्ते शादाब सिद्दिकी इ. उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

आदिवासी विकास समिती मराठवाडा अध्यक्ष पदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती

 किनवट: राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती, आज दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी किनवट येथील गोकुंदा शासकीय विश्रामगृह येथे दैनिक वीर शिरोमणी वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे राज्य कार्याध्यक्ष शंकरसिंह ठाकुर सर तसेच दैनिक सा.नंदगिरीचा कानोसा या वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे मराठवाडा अध्यक्ष मारोती शिकारे सर नांदेड जिल्हाअध्यक्ष विनायक कामठेकर सर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक घेऊन राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली यावेळी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय जी सूर्यवंशी सर यांनी निवड जाहीर झाल्याबरोबर फोन वर अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या शुभेच्छांचा स्वीकार करत ट्रायबल सेवा न्यूज चॅनेल चे संपादक प्रणय कोवे  यांनी नांदेड जिल्हाअध्यक्ष पदावरून मराठवाडा अध्यक्ष या पदावर नियुक्ती केल्याबद्दल सरांचे मनःपूर्वक आभार मानले  प्रणय कोवे हे गेल्या अनेक वर्षापासू...

१० वर्षीय अरफात मलीक चव्हाण ने ठेवला आयुष्यातील पहिला रोजा

  किनवट प्रतिनिधि : इस्लाम धर्मात पवित्र रमजान या महिन्याला अनन्य महत्व प्राप्त आहेया महिन्यात सर्वच मुस्लिम बांधव यांच्यावर वयाच्या दहाव्या वर्षा पासून रोजा (उपवास) फर्ज (सक्तीचें) असतात.लहानपासून मोठ्यापर्यत या महिन्यांमध्ये 30 दिवस रोजा धरत असतात. पालकांचे पाहून लहान मुलांनाही रोजा धरण्याची लालसा निर्माण होते. त्यामुळे लहान चिमुकले ही मोठ्यांचे अनुकरण करीत रोजा (उपवास) धरतात.अशाच प्रकारे किनवट येथील मलीक चव्हाण यांचा 10 वर्षाचा मुलगा अरफात चव्हाण यांनी आपल्या जीवनातील पहिला रोजा सोमवारी 10 मार्च रोजी पूर्ण केला.मुस्लिम समाजात पवित्र असणाऱ्या या महिन्यात संपूर्ण महिनाभर दिवसभर पाणी न पिता उपवास ठेवला जातो.यावर्षी रोजा (उपवास) सकाळी 5.10 वाजता सुरू होत असून संध्याकाळी 6.28 ला रोजा सोडण्याची वेळ आहे.13 तासा पेक्षा जास्त वेळचा उपवास असल्याने या उष्णतेचा मोठ्या माणसांनादेखील खूप त्रस होतो.त्यात या चिमुकल्याने पहिला रौजा ठैवून आपल्या आयुष्याची सुरुवात एक चांगल्या प्रकारे व्हावी या हेतूने उपवास ठैेवला.त्यामुळे अरफात मलिक चव्हाण यांचे सर्व्र कौतुक होत आहे.