Skip to main content

युवा पँथर संघटने तर्फे महामानव डॉ. बाबासाहेबांना १०१ जणांचे रक्तदान करून अभिवादन शिबीरास अनेक मान्यवरांच्या भेटी

 



किनवट/प्रतिनिधी दि.6 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त (ता.6) रविवारी रोजी सकाळी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ अभिवादन करण्यात आले.




    प्रारंभी भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष अभियंता प्रशांत ठमके, आमदार भीमराव केराम, नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, संदीप केंद्रे तालुका अध्यक्ष, माजी उपाध्यक्ष श्रीनिवास नेम्मानीवार, अनिल तिरमनवार, पोलीस निरीक्षक मारोती थोरात, सपोनि विजय कांबळे, रिपाइंचे मराठवाडा प्रदेश उपाध्यक्ष दादाराव कयापाक, माजी नगराध्यक्ष अरूण आळणे, प्रा.डॉ.अंबादास कांबळे, पीरिपचे जिल्हाध्यक्ष विनोद भरणे, विवेक ओंकार, अॅड.मिलिंद सर्पे, गोकुळ भवरे, प्रा.पंजाब शेरे, रमेश मुनेश्वर, मिलिंद धावारे, प्रकाश नगराळे, प्रा.रविकांत सर्पे, अॅड.सुनील येरेकार, मारोती मुनेश्वर, दशरथ पवार, सुरेश कावळे, उमाकांत कराळे, संतोष मरस्कोल्हे, सुरेश जाधव, दशरथ पवार, किशन परेकार, शंकर नगराळे, गौतम पाटील, पवन सर्पे, सम्यक सर्पे, रवी कांबळे, प्रशिक मुनेश्वर, शुभम भवरे, आकाश सर्पे, विशाल गिमेकार, आनंद कावळे, यांनी डॉ.आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.या प्रसंगी महेंद्र नरवाडे यांनी सामुहिक वंदना घेतली. उत्तम कानिंदे यांनी सूत्रसंचालन केले

यावेळी समाजबांधव, प्रतिष्ठित नागरीक, पत्रकार उपस्थित होते. अभिवादन दिनानिमित्त आयोजक अॅड.सम्राट सर्पे, निखिल कावळे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा पँथर किनवट शाखेच्या वतीने रक्तदान शिबीर घेण्यात आले. यावेळी 101 च्या वर रक्तदात्यांनी रक्तदान करून रक्तदानाचे तिसरे वर्ष यशस्वी केले. यावेळी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष दत्ता कोकाटे, ज्योतीबादादा खराटे, तालुकाप्रमुख बालाजी मुरकूटे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून 







रक्तदान शिबीरास भेट दिली. शिबीरास नांदेड येथील गुरूगोविंदसिंघजी ब्लड बँकेचे डॉ.कनकदंडे व राहूल वाघमारे यांनी सहकार्य केले.




Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...