Skip to main content

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक 2020 करिता किनवट तालुक्यात 67. 25 टक्के मतदान झाले 🔹अनेक नव मतदार युवक युवतींनी पहील्यांदाच बजावला मतदानाचा हक्क 🔹 मतदाना केल्यांचा आनंद त्यांच्या चेहर्‍यावर ओसंडुन वाहत होता



 



किनवट / तालुका प्रतिनिधी  : औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक 2020 अंतर्गत किनवट तालुक्यात एकूण दहा मतदान केंद्रावर 67.25 टक्के मतदान झाले असून ही निवडणूक पारदर्शी, शांततेत, निरपेक्षपणे, सुरळीतपणे पार पडली असल्याची माहिती सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी कीर्तिकिरण एच. पूजार, भाप्रसे, यांनी दिली.

        किनवट तालुक्यात  2447 पुरुष, 689 स्त्री असे एकूण 3136 मतदार आहेत. यापैकी 1734 पुरुष, 375 स्त्री व एकूण 2109 पदवीधर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. 

मतदान केंद्र निहाय झालेले मतदान कंसात एकूण मतदार :

मतदान केंद्र क्रमांक 411 किनवट शहर -1 : पुरुष  448(624), स्त्री 120 (225 ) व एकूण 568 (849) टक्के 66. 90,  म.कें क्र.412 किनवट ग्रामीण) : पुरुष 472 ( 647), स्त्री 128 (248) व एकूण 600 (895), म. कें.क्र.413 इस्लापूर : पुरुष 155 (241), स्त्री 21 (35), एकूण 176 (276) टक्के 63.77, म.कें. क्र.414 मांडवी : पुरुष 119 (154), स्त्री 20(27) व एकूण 139 (181) टक्के 76.80, म.कें. क्र. 415 बोधडी (बु ) : पुरुष 209 (294), स्त्री 33 ( 64) व एकूण 242 (358 ) टक्के 67.60, म. कें. क्र. 416 सिंदगी (मो ) : पुरुष 50 (90), स्त्री 14 (18) व एकूण 64 (108 ) टक्के 59.26, म. कें. क्र. 417 दहेली : पुरुष 84 (111), स्त्री 13 (19) व एकूण 97 (130 ) टक्के 74.62, म. कें. क्र. 418 उमरी (बा ): पुरुष 47 (66), स्त्री 8 (18) व एकूण 55 (84 ) टक्के 65.48, म. कें. क्र. 419 जलधरा : पुरुष 104 (149), स्त्री 12 (24) व एकूण 73 (116)  टक्के 67.05, म. कें. क्र. 420 शिवणी : पुरुष 46 (71), स्त्री 6(11) व एकूण 52 (82 ) टक्के 63.41,

            10 मतदान केंद्रासाठी 12 मतदान केंद्राध्यक्ष, 36 मतदान अधिकारी आणि 14 पोलीस कर्मचारी व 4 क्षेत्रिय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली होती .

     तहसीलदार उत्तम कागणे, नायब तहसीलदार सर्वेश मेश्राम, मोहम्मद रफीक, अनिता कोलगणे, मास्टर ट्रेनर उत्तम कानिंदे,  स्वामी मल्लिकार्जुन, राम बुसमवार यांनी मतदान प्रक्रिया यशस्वी करण्याचे सुव्यवस्थित नियोजन केले होते.

             उप विभागीय पोलिस अधिकारी मंदार नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मारुती थोरात यांच्या नेतृत्वात सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. निवडणूक प्रक्रिया यशस्वी  करण्यासाठी मनोहर पाटील, पी.पी. सूर्यवंशी, एस.बी.सरनाईक, गोविंद पांपटवार, एम. एम. कांबळे, टोम्पे, नितीन शिंदे आदि तहसिल कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे आणण

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे माजी ता

.. महाराष्ट्रातील निवडणुका बॅलेट पेपरवर होणार; निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची माहिती

 महाराष्ट्र:- देशातील लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे जाहीर करण्यात आला असून महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे या कालावधीत एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता शनिवारपासून लागू झाली आहे. महाराष्ट्रात यंदाची निवडणूक विविध मुद्द्यांनी गाजणार आहे. यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दाही महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. राजकीय नेत्यांना आपली ताकद दाखवून देण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील सर्व ४८ मतदारसंघांत समाजातील तरुणांनी शेकडो उमेदवारी अर्ज दाखल करावेत, असं आवाहन केलं आहे. उमेदवारांची संख्या प्रचंड प्रमाणात असेल तर ईव्हीएमवर निवडणुका घेणं कठीण होणार आहे. अशातच आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ईव्हीएमच्या क्षमतेबाबत माहिती दिली आहे. ईव्हीएमसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना एस. चोक्कलिंगम म्हणाले की, "एका मतदारसंघात ४०० उमेदवारांहून अधिक उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यास आपल्याला बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी ला