Skip to main content

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक 2020 करिता किनवट तालुक्यात 67. 25 टक्के मतदान झाले 🔹अनेक नव मतदार युवक युवतींनी पहील्यांदाच बजावला मतदानाचा हक्क 🔹 मतदाना केल्यांचा आनंद त्यांच्या चेहर्‍यावर ओसंडुन वाहत होता



 



किनवट / तालुका प्रतिनिधी  : औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक 2020 अंतर्गत किनवट तालुक्यात एकूण दहा मतदान केंद्रावर 67.25 टक्के मतदान झाले असून ही निवडणूक पारदर्शी, शांततेत, निरपेक्षपणे, सुरळीतपणे पार पडली असल्याची माहिती सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी कीर्तिकिरण एच. पूजार, भाप्रसे, यांनी दिली.

        किनवट तालुक्यात  2447 पुरुष, 689 स्त्री असे एकूण 3136 मतदार आहेत. यापैकी 1734 पुरुष, 375 स्त्री व एकूण 2109 पदवीधर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. 

मतदान केंद्र निहाय झालेले मतदान कंसात एकूण मतदार :

मतदान केंद्र क्रमांक 411 किनवट शहर -1 : पुरुष  448(624), स्त्री 120 (225 ) व एकूण 568 (849) टक्के 66. 90,  म.कें क्र.412 किनवट ग्रामीण) : पुरुष 472 ( 647), स्त्री 128 (248) व एकूण 600 (895), म. कें.क्र.413 इस्लापूर : पुरुष 155 (241), स्त्री 21 (35), एकूण 176 (276) टक्के 63.77, म.कें. क्र.414 मांडवी : पुरुष 119 (154), स्त्री 20(27) व एकूण 139 (181) टक्के 76.80, म.कें. क्र. 415 बोधडी (बु ) : पुरुष 209 (294), स्त्री 33 ( 64) व एकूण 242 (358 ) टक्के 67.60, म. कें. क्र. 416 सिंदगी (मो ) : पुरुष 50 (90), स्त्री 14 (18) व एकूण 64 (108 ) टक्के 59.26, म. कें. क्र. 417 दहेली : पुरुष 84 (111), स्त्री 13 (19) व एकूण 97 (130 ) टक्के 74.62, म. कें. क्र. 418 उमरी (बा ): पुरुष 47 (66), स्त्री 8 (18) व एकूण 55 (84 ) टक्के 65.48, म. कें. क्र. 419 जलधरा : पुरुष 104 (149), स्त्री 12 (24) व एकूण 73 (116)  टक्के 67.05, म. कें. क्र. 420 शिवणी : पुरुष 46 (71), स्त्री 6(11) व एकूण 52 (82 ) टक्के 63.41,

            10 मतदान केंद्रासाठी 12 मतदान केंद्राध्यक्ष, 36 मतदान अधिकारी आणि 14 पोलीस कर्मचारी व 4 क्षेत्रिय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली होती .

     तहसीलदार उत्तम कागणे, नायब तहसीलदार सर्वेश मेश्राम, मोहम्मद रफीक, अनिता कोलगणे, मास्टर ट्रेनर उत्तम कानिंदे,  स्वामी मल्लिकार्जुन, राम बुसमवार यांनी मतदान प्रक्रिया यशस्वी करण्याचे सुव्यवस्थित नियोजन केले होते.

             उप विभागीय पोलिस अधिकारी मंदार नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मारुती थोरात यांच्या नेतृत्वात सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. निवडणूक प्रक्रिया यशस्वी  करण्यासाठी मनोहर पाटील, पी.पी. सूर्यवंशी, एस.बी.सरनाईक, गोविंद पांपटवार, एम. एम. कांबळे, टोम्पे, नितीन शिंदे आदि तहसिल कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...