Skip to main content

मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत रिपब्लिकन सेनेकडून - सचिन निकम.

 


ॲड.अतुल राजेंद्र कांबळे हे विधानपरिषद निवडणुकीची वयोमर्यादा पूर्ण करू न शकल्याने त्यांचा अर्ज रद्द...


मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत आंबेडकरी मतदार हा महत्वपूर्ण भूमिकेत असल्याने आंबेडकरी मतदारात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.

पहिल्यांदाच रिपब्लिकन सेनेने ह्या निवडणुकीत उडी घेतल्याने ह्या निवडणुकीत आंबेडकरी जनतेचा कौल कुणाकडे राहील हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

रिपब्लिकन सेनेच्या वतीने सर्वात अगोदर उमेदवार जाहीर केल्याने ह्या निवडणुकीत रिपब्लिकन सेना चर्चेत आली आहे.

रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष

ॲड.अतुल राजेंद्र कांबळे यांची उमेदवारी पक्षाने घोषित केल्याने विद्यार्थी कार्यकर्त्यांमध्ये मोठी चर्चा घडून आली होती.

परंतु ॲड.अतुल कांबळे हे विधानपरिषद उमेदवारी साठीची वयोमर्यादा पूर्ण करू शकत नसल्याने

तात्काळ मराठवाड्यातील विद्यार्थ्यांचे नेतृत्व रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे मराठवाडा अध्यक्ष सचिन निकम यांना पक्षाने निवडणुकीच्या रिंगणात उतरविल्याने ही निवडणूक चुरशीची ठरली आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व मराठवाडा विभागातील विद्यार्थी चळवळीतील आंबेडकरी नेतृत्व म्हणून सचिन निकम यांच्या कडे पाहिले जाते.

आंबेडकरी चळवळीतील निष्ठावान सक्रिय युवा नेतृत्व, म्हणून त्यांची ओळख आहे औरंगाबाद सह मराठवाड्यातील सर्व आंबेडकरी युवा नेते-कार्यकर्ते,पक्ष संघटना ह्यांचा मोठा पाठिंबा त्यांच्या मागे आहे.

Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...