Skip to main content

रमेश मुनेश्वर यांची अखिल भारतीय शिक्षक साहित्य, कला व क्रीडा मंडळाच्या औरंगाबाद विभागीय अध्यक्षपदी निवड..




नांदेड ( प्रतिनिधी ) :


अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला व क्रीडा मंडळ या नोंदणीकृत संस्थेच्या औरंगाबाद विभागीय अध्यक्षपदी रमेश यादवराव मुनेश्वर यांची निवड करण्यात आली.


अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला व क्रीडा मंडळ शिक्षकांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व प्रसिद्धी देण्यासाठी असून या मंडळाद्वारे आजपर्यंत अनेक उपक्रम राबविण्यात आले आहेत. जिल्हा व राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. 


रमेश मुनेश्वर यांच्या सामाजिक, साहित्यिक, शैक्षणिक उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन अध्यक्षपदी निवड करण्यात आली. रमेश मुनेश्वर हे जिल्हा परिषद नांदेड येथे प्राथमिक शिक्षक असून उत्तम कवी, लेखक, समिक्षक, नाटय कलावंत म्हणून प्रसिद्ध आहेत. सोबतच उपक्रमशील शिक्षक व शालेयवृत्त या वेब न्यूज पोर्टलचे संपादक आहेत. मासिक दिवाळी अंक ,साप्ताहिक दैनिकात त्यांचे अनेक साहित्य प्रकाशित झालेले आहे. नांदेड जिल्हाध्यक्ष म्हणून ते चांगले काम केले.


त्यांच्या या निवडीबदल संस्थापक राज्याध्यक्ष नटराज मोरे, राज्य कार्यकारणीचे विजय जोगमार्ग, सचिन कुसनाळे, अलंकार वारघडे, नांदेड कार्यकारणीचे मिलिंद जाधव, विरभद्र मिरेवाड, रणजीत वर्मा, नासा येवतीकर, रुपेश मुनेश्वर, महेंद्र नरवाडे, राणी नेम्मानिवार, राजश्री विभुते, माधुरी काकडे, शितल भालेकर, अर्चना गरुड, उर्मिला परभणकर, विजया तारु, सागर चेके, मिलिंद कंधारे, शेषेराव पाटील, आनंद गायकवाड,  विजय वाठारे, प्रल्हाद जोंधळे, पांडूरंग कोुकलवार, सूर्यभान खंदारे, सोनबा दवणे, भूमय्या इंदूरवार, रामस्वरुप मडावी, राजू भगत, आदिनी अभिनंदन केले आहे.

Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...