Skip to main content

गांधी नगर पुनर्वसनाची न्यायिक मागणी, निवाराशोध आंदोलन - एक दृष्टीक्षेप ॲड. सचिन दारवंडे यांचा विशेष लेख

गांधी नगर पुनर्वसनाची न्यायिक मागणी, निवाराशोध आंदोलन -  एक दृष्टीक्षेप 



"The hottest place in Hell is reserved for those who remain neutral in times of great moral conflict.

                        Dr. Martin Luther King, Jr.



किनवट प्रशासनाने स्मशानाच्या भिंतीचे स्वरक्षण करून, तेथील मुडद्याना शांत झोपी देऊन, जिवंत हाड- मास असलेल्या गांधी नगर येथील माणसाच्या घरावर कडाक्याच्या थंडीत अन महामारीच्या काळात  बुलडोझर फिरवून किनवट प्रशासनाने त्यांना अन्यायकारकपणे बेघर केले आहे. 


आज गांधी नगरच्या लोकांना बेघर करून दोन महिने होत आहेत. मागील दोन महिन्यात त्या लोकांचे काय हाल झालेत यांचा आढावा घेणे गरजेचे आहे.



निसर्ग माणसांवर कोपतो हे सर्वज्ञात आहे,परंतु निसर्गाने मागील दोन महिने त्या लोकांचा छळ केला आहे. भर दिवसा नभात ढग आणि घराचे दरवाजे बंद करून अंथरून घेऊन बसावे अशी रक्त गोठवणारी थंडी. प्रश्न असे आहेत या लोकांनी दोन महिने कसे काढले असेल? घरात लाईट गेली तर रात्र भर मानस जागून काढतात ही लोक अंधारात कसे राहत असतील? T. V वर साप दिसला तर ते साप रात्री स्वप्नात येतात, त्याच्या अंथरुणात रोज साप निघत आहेत त्याचं जगणे कसे असेल ? एका स्त्री चा गर्भपात झाला तो कुणामुळे ?. त्या स्त्री ची काय मानसिक स्थिती असेल? लहान मुले देशाचे भविष्य आहेत त्याची मुले त्या  मोकळ्या मांडवात अभ्यास करत असतील का? तेथील काही लोकांची मुले अपंग आहेत त्याचा श्वास तपासून बघण्याची गरज आहे का? शेवट चा प्रश्न असा आहे ही मानस आहे कि जनावर ?



मोकाट फिरणाऱ्या जनावरना ठेवण्यासाठी कोडवाडा असतो परंतु जिवंत माणसाला ठेवण्यासाठी किनवट प्रशासनाकडे जागा नाही ! 

प्रशासन निष्ठुर झाले आहे, खरं पहिले तर किनवट प्रशासनाच्या मानवी संवेदना तपासून पाहण्याची गरज आहे, तिथं माणसंच बसली आहेत.... ना?


गांधी नगरच्या लोकांनी स्वतःला बेघर समजून मोकळ्या मांडवात संसार सुरु केला, प्रशासनाला सुद्धा माहित होते दोन वेळच्या जेवणाने मारलेली माणसे काय विरोध करणार ?. निराश, हतबल , आणि शोषित लोकांसाठी आकांक्षा आळणे आशेचा किरण म्हणून समोर आली आहे. तिने प्रशासनाच्या विरोधात सुरु केलेले चक्री उपोषण व मंत्रालयात जाऊन तिथे या लोकांच्या समस्या मांडल्यामुळे तिचं नेतृत्व करण्याची क्षमता पुढे आली आहे. संघर्षातून नेतृत्वाला झळाळी मिळते, हा संघर्ष तिचा किनवट च्या राजकीय पटलावर उदय म्हणावा लागेल.



गांधीनगरच्या लोकांची लढाई ही नैतिक व न्यायिक आहे. या लढाई मुळे त्या लोकांना स्वतःच्या हक्काच्या घराची स्वप्न पडत आहेत. आज गांधी नगर च्या लोकांना बेघर केले आहे उद्या तेच बुलडोजर कुणाचेही घर उध्वस्त करण्यासाठी येऊ शकते  कारण Injustice anywhere is a threat to justice everywhere ( कोठेही अन्याय सर्वत्र न्यायाला धोका आहे). मशीन आणि शासकीय प्रशासनाला मानवी संवेदना नसतात. परंतु किनवट च्या लोकांनी स्वतःच्या धार्मिक सामाजिक संवेदनेला जागून गांधी नगरच्या आंदोलनास समर्थन दिले पाहिजे 


Without any political stand i support Akanksh Alane and her team.I does not want to reserve my place in hell ✊️



Adv S. B. Darwande

Distinct & Session Court

( Nanaded )

9011671567

Comments

  1. Nice thinking about that people, also need to provide that people's/ societies rights by Kinwat Muncipal Corporations. Jaybhim

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

आदिवासी विकास समिती मराठवाडा अध्यक्ष पदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती

 किनवट: राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती, आज दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी किनवट येथील गोकुंदा शासकीय विश्रामगृह येथे दैनिक वीर शिरोमणी वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे राज्य कार्याध्यक्ष शंकरसिंह ठाकुर सर तसेच दैनिक सा.नंदगिरीचा कानोसा या वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे मराठवाडा अध्यक्ष मारोती शिकारे सर नांदेड जिल्हाअध्यक्ष विनायक कामठेकर सर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक घेऊन राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली यावेळी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय जी सूर्यवंशी सर यांनी निवड जाहीर झाल्याबरोबर फोन वर अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या शुभेच्छांचा स्वीकार करत ट्रायबल सेवा न्यूज चॅनेल चे संपादक प्रणय कोवे  यांनी नांदेड जिल्हाअध्यक्ष पदावरून मराठवाडा अध्यक्ष या पदावर नियुक्ती केल्याबद्दल सरांचे मनःपूर्वक आभार मानले  प्रणय कोवे हे गेल्या अनेक वर्षापासू...

१० वर्षीय अरफात मलीक चव्हाण ने ठेवला आयुष्यातील पहिला रोजा

  किनवट प्रतिनिधि : इस्लाम धर्मात पवित्र रमजान या महिन्याला अनन्य महत्व प्राप्त आहेया महिन्यात सर्वच मुस्लिम बांधव यांच्यावर वयाच्या दहाव्या वर्षा पासून रोजा (उपवास) फर्ज (सक्तीचें) असतात.लहानपासून मोठ्यापर्यत या महिन्यांमध्ये 30 दिवस रोजा धरत असतात. पालकांचे पाहून लहान मुलांनाही रोजा धरण्याची लालसा निर्माण होते. त्यामुळे लहान चिमुकले ही मोठ्यांचे अनुकरण करीत रोजा (उपवास) धरतात.अशाच प्रकारे किनवट येथील मलीक चव्हाण यांचा 10 वर्षाचा मुलगा अरफात चव्हाण यांनी आपल्या जीवनातील पहिला रोजा सोमवारी 10 मार्च रोजी पूर्ण केला.मुस्लिम समाजात पवित्र असणाऱ्या या महिन्यात संपूर्ण महिनाभर दिवसभर पाणी न पिता उपवास ठेवला जातो.यावर्षी रोजा (उपवास) सकाळी 5.10 वाजता सुरू होत असून संध्याकाळी 6.28 ला रोजा सोडण्याची वेळ आहे.13 तासा पेक्षा जास्त वेळचा उपवास असल्याने या उष्णतेचा मोठ्या माणसांनादेखील खूप त्रस होतो.त्यात या चिमुकल्याने पहिला रौजा ठैवून आपल्या आयुष्याची सुरुवात एक चांगल्या प्रकारे व्हावी या हेतूने उपवास ठैेवला.त्यामुळे अरफात मलिक चव्हाण यांचे सर्व्र कौतुक होत आहे.