गांधी नगर पुनर्वसनाची न्यायिक मागणी, निवाराशोध आंदोलन - एक दृष्टीक्षेप ॲड. सचिन दारवंडे यांचा विशेष लेख
गांधी नगर पुनर्वसनाची न्यायिक मागणी, निवाराशोध आंदोलन - एक दृष्टीक्षेप
"The hottest place in Hell is reserved for those who remain neutral in times of great moral conflict.
Dr. Martin Luther King, Jr.
किनवट प्रशासनाने स्मशानाच्या भिंतीचे स्वरक्षण करून, तेथील मुडद्याना शांत झोपी देऊन, जिवंत हाड- मास असलेल्या गांधी नगर येथील माणसाच्या घरावर कडाक्याच्या थंडीत अन महामारीच्या काळात बुलडोझर फिरवून किनवट प्रशासनाने त्यांना अन्यायकारकपणे बेघर केले आहे.
आज गांधी नगरच्या लोकांना बेघर करून दोन महिने होत आहेत. मागील दोन महिन्यात त्या लोकांचे काय हाल झालेत यांचा आढावा घेणे गरजेचे आहे.
निसर्ग माणसांवर कोपतो हे सर्वज्ञात आहे,परंतु निसर्गाने मागील दोन महिने त्या लोकांचा छळ केला आहे. भर दिवसा नभात ढग आणि घराचे दरवाजे बंद करून अंथरून घेऊन बसावे अशी रक्त गोठवणारी थंडी. प्रश्न असे आहेत या लोकांनी दोन महिने कसे काढले असेल? घरात लाईट गेली तर रात्र भर मानस जागून काढतात ही लोक अंधारात कसे राहत असतील? T. V वर साप दिसला तर ते साप रात्री स्वप्नात येतात, त्याच्या अंथरुणात रोज साप निघत आहेत त्याचं जगणे कसे असेल ? एका स्त्री चा गर्भपात झाला तो कुणामुळे ?. त्या स्त्री ची काय मानसिक स्थिती असेल? लहान मुले देशाचे भविष्य आहेत त्याची मुले त्या मोकळ्या मांडवात अभ्यास करत असतील का? तेथील काही लोकांची मुले अपंग आहेत त्याचा श्वास तपासून बघण्याची गरज आहे का? शेवट चा प्रश्न असा आहे ही मानस आहे कि जनावर ?
मोकाट फिरणाऱ्या जनावरना ठेवण्यासाठी कोडवाडा असतो परंतु जिवंत माणसाला ठेवण्यासाठी किनवट प्रशासनाकडे जागा नाही !
प्रशासन निष्ठुर झाले आहे, खरं पहिले तर किनवट प्रशासनाच्या मानवी संवेदना तपासून पाहण्याची गरज आहे, तिथं माणसंच बसली आहेत.... ना?
गांधी नगरच्या लोकांनी स्वतःला बेघर समजून मोकळ्या मांडवात संसार सुरु केला, प्रशासनाला सुद्धा माहित होते दोन वेळच्या जेवणाने मारलेली माणसे काय विरोध करणार ?. निराश, हतबल , आणि शोषित लोकांसाठी आकांक्षा आळणे आशेचा किरण म्हणून समोर आली आहे. तिने प्रशासनाच्या विरोधात सुरु केलेले चक्री उपोषण व मंत्रालयात जाऊन तिथे या लोकांच्या समस्या मांडल्यामुळे तिचं नेतृत्व करण्याची क्षमता पुढे आली आहे. संघर्षातून नेतृत्वाला झळाळी मिळते, हा संघर्ष तिचा किनवट च्या राजकीय पटलावर उदय म्हणावा लागेल.
गांधीनगरच्या लोकांची लढाई ही नैतिक व न्यायिक आहे. या लढाई मुळे त्या लोकांना स्वतःच्या हक्काच्या घराची स्वप्न पडत आहेत. आज गांधी नगर च्या लोकांना बेघर केले आहे उद्या तेच बुलडोजर कुणाचेही घर उध्वस्त करण्यासाठी येऊ शकते कारण Injustice anywhere is a threat to justice everywhere ( कोठेही अन्याय सर्वत्र न्यायाला धोका आहे). मशीन आणि शासकीय प्रशासनाला मानवी संवेदना नसतात. परंतु किनवट च्या लोकांनी स्वतःच्या धार्मिक सामाजिक संवेदनेला जागून गांधी नगरच्या आंदोलनास समर्थन दिले पाहिजे
Without any political stand i support Akanksh Alane and her team.I does not want to reserve my place in hell ✊️
Adv S. B. Darwande
Distinct & Session Court
( Nanaded )
9011671567
Nice thinking about that people, also need to provide that people's/ societies rights by Kinwat Muncipal Corporations. Jaybhim
ReplyDeleteThank you
Delete