Skip to main content

Posts

हेमंत पाटील यांना एका महिन्यात दुसऱ्यांदा लॉटरी

  हिंगोली- बाळासाहेब ठाकरे हळद प्रक्रिया व प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्षपदी राहण्याबरोबरच आता त्यांना आमदार होण्याची संधी मिळाल्याने दुसऱ्यांदा लॉटरी लागली आहे. हिंगोली लोकसभेसाठी त्यांना नाकारताच त्यांच्या पत्नीना राजश्री पाटील यांना वाशीम यवतमाळ लोकसभेची उमेदवारी दिली मात्र त्यात पराभव झाला. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अखेर हेमंत पाटील यांना बाळासाहेब ठाकरे हळद प्रक्रिया व प्रशिक्षण केंद्राच्या अध्यक्षपदावरून पाटील यांना राज्यमंत्रीपद बहाल करण्याचा निर्णय घेण्यात आला. पाटील यांना राज्यमंत्रिपद देऊन मुख्यमंत्री शिंदे यांनी पाटील यांचे राजकीय पुनर्वसन केले. राज्यमंत्री म्हणून जाहीर झाल्यानंतर महिनाभरातच पाटील यांची राज्यपाल नियुक्त विधान परिषदेवर नियुक्ती करण्यात आली आहे. याचाच अर्थ पाटील यांना एका महिन्यात दुहेरी लॉटरी लागली आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत हेमंत पाटील हे हिंगोली लोकसभा मतदारसंघातून प्रचंड मतांनी विजयी झाले. पाटील यांनी आपल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात अनेक विकासकामे केली. त्यांची लोकप्रियता लक्षात घेऊन काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांना शिव
Recent posts

प्रज्ञा काशिनाथ लढे यांचे दुखःद निधन १३ रोजी आज नांदेड येथे अंतीम संस्कार

  निधन वार्ता ( प्रज्ञा काशिनाथ लढे  )मुळगाव अंबाडी ता. किनवट जि. नांदेड ह. मु वैशाली नगर,नांदेड यांचे शनिवार  दि 12/10/2024 रोजी सायंकाळी दुखद निधन झाले आहे त्यांचा अंत्यविधी रविवार दि. 13 /10/ 2024      रोजी दुपारी बारा वाजता गोवर्धन घाट नांदेड येथे होणार आहे.  सिद्धार्थ नगरच्या  वतीने  भावपूर्ण श्रद्धांजली.

अशोक विजया दशमी व धम्मचक्र प्रवर्तन दिवस साजरा

  किनवट प्रतिनिधी:- येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर व जेतवन बुद्ध विहार , सिद्धार्थ नगर , गोकुंदा  अंगणवाडी परीसर आणि विविध ठिकाणी अशोक विजया दशमी व धम्मचक्र प्रवर्तन दिवस हर्षोल्हासात साजरा करण्यात आला . डॉ. आबेंडकर पुतळा परीसर येथे माजी प्राचार्य उपा.राजाराम वाघमारे यांच्या हस्ते पंचशिल ध्वजारोहण तर जेतवन बुद्ध विहार येथे उपासक गंगाधर कावळे यांच्या हस्ते करण्यात आले तर धम्म वंदना बौद्धाचार्य महेंद्र नरवाडे, अनिल उमरे यांनी घेतली सुत्र संचालन उत्तम कानिंदे यांनी केले  . यावेळी अनिल महामुने,यादव नगारे, डॉ. पंजाब शेरे, पंडीत घुले, चांगदेव सोनुले, पाटील सर, साळवे साहेब, किशनराव ठमके, आत्मानंद सत्यवंश, विवेक ओंकार, सुरेश कावळे, आनंद नगारे, शिलरत्न पाटील,मनोहर पाटील, बालकिशन कांबळे, भिमराव गिमेकार, माधव कावळे, माधव नगारे, ॲड. मिलींद सर्पे, राजेश पाटील, रवी कांबळे नवयुवक मंडळाचे निखील कावळे, आकाश सर्पे, आनंद कावळे, रोहीत मुनेश्वर, सुगत नगराळे, प्रसेनजीत कावळे, गौतम पाटील, प्रशिक मुनेश्वर तथा विशाखा महिला मंडळाच्या कौशल्या मुनेश्वर, जयमाला आळणे, मालाबाई नगारे, सागर नगारे, सारजाबाई का

आपट्याची पानं....

  दसरा आला की आपण आपट्याचं पानं सोनं म्हणून एकमेकांना दिल्या घेतल्याशिवाय दसरा साजरा करत नाही. पण ते अनेकदा आपट्याचं पान नसतंच. मुळात शमीच्या पानांला ऑप्शन म्हणून आपटा आलाय. आता सोनं वाटण्याच्या या प्रथेलाच ऑप्शन शोधावा लागणार आहे. वर्षभराच्या सणांमध्ये दसरा हा एक मोठा सण आहे. सण जितका मोठा तितके त्याचे रितीरिवाज जास्त. दसऱ्याच्या दिवशी सरस्वतीची पूजा, हत्यारांची पूजा, देवीचे विसर्जन, रावणाचे दहन,धम्मचक्र परिवर्तन दिन, हल्लाबोल, सीमोल्लंघन म्हणून सैनिकांसाठी महत्त्वाचा... याच दिवशी कुष्मांड दशमीचं व्रतही केलं जातं. अश्या विविध परंपरा-रिती घेऊन हा सण येतो. आता राजेरजवाडे नाहीत त्यामुळे कुणाला दुसऱ्या राज्यावर स्वारी करण्याची गरज उरलेली नाही त्यामुळे सीमोल्लंघनाचा प्रश्न उरत नाही. आपल्याकडे ढाली तलवारी नाहीत त्यामुळे ही ती पुजण्यालाही अर्थ उरलेला नाही. घरातल्या चाकूसुऱ्यांना, मिक्सर, वॉशिंग मशीनना हळदीकुंकू लावून पुजण्यात आपण समाधान मानतो. ऑफिसात कम्प्युटर, लॅपटॉप हत्यारांच्या जागी पुजले जातात. आता पाटीही नाही म्हणून पाटीवर सरस्वती काढून पाटीपूजन करण्याचंही नव्या पिढीला माहीत नाही. कोहळी

आठवणीतलं कोल्हापूर...

  काही.. दिवसांपूर्वी कोल्हापूर शहरात जाण्याचा योग आला कारण, मात्र पुरस्काराचे आयोजन होते. कोल्हापूर शहराविषयी खूप ऐकून असल्यामुळे तेथील मोजकेच पर्यटन ठिकाणे पाहण्याचा मोह अनावर झाला.    कोल्हापूरात म्हटलं की, कोल्हापुरी तांबडा रस्सा-पांढरा रस्सा, कोल्हापुरी मिसळ, कोल्हापुरची भेळ, कोल्हापुरी साज, करकरीत वाजणारी कोल्हापुरी चप्पल, कोल्हापुरी गुळाचा गोडवा, हुपरी येथील चांदीचे कलाकुसरीचे दागिने, कोल्हापुरी फेटा या साऱ्या गोष्टींबरोबरच ‘या पाव्हणं’ असं म्हणणारी कोल्हापुरी माणसं. दक्षिण काशी... म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महालक्ष्मी मातेचे मंदिर रंक असो वा राव साऱ्यांचे हात निस्सीम भक्तीनं जिथं जोडले जातात ती सर्व महाराष्ट्रासाठी आराध्य दैवतं असणारी करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी होय. हेमाडपंथी वास्तूरचनेचे काळ्या दगडातील हे कोरीव मंदीर म्हणजे कोल्हापूर जिल्ह्याचे वैभव आहे. नवरात्रातील रोषणाई या मुळे अप्रतिम सुंदर असणाऱ्या मंदिराचे सौंदर्य अधिकच खुलविते. किरणोत्सव हे या मंदिराचे वैशिष्ट्य मानले जाते. जुना राजवाडा आणि भवानी मंडप हे याठिकाणचे आकर्षण आहे.  नावलौकिक असणारे सर्व महाराष्ट्राचे श्रद्धा

सेवा फाऊंडेशन तर्फे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात 70 रक्तदात्यांनी केले रक्तदान

  अदिलाबाद:- सेवा फाऊंडेशन यांच्या तर्फे ता.१ ऑक्टोबर रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आयोजक सिराज भाई आदिलाबाद कर यांच्यातर्फे आयोजन करण्यात आले होते यावेळी टिपू सुलतान ब्रिगेडचे नांदेड जिल्हा अध्यक्ष सय्यद नदीम आसिफ भाई लाईफ सेल क्लिनिकल लॅब किनवट यांचे स्वागत करण्यात आले यावेळी सेवा फाऊंडेशन आदिलाबाद जिल्हा टीमनी उत्कृष्ट असे रक्तदान शिबिराचे कार्यक्रम आयोजन केले यावेळी 70 रक्तदात्यांनी रक्तदान केले यावेळी  जिल्हाध्यक्ष सय्यद नदिम यांनी स्वतः रक्तदान केले व युवकांना प्रोत्साहन दिले यावेळी  रिम्स डायरेक्टर डॉक्टर जयसिंग राठोड,डॉक्टर नरेंद्र राठोड ऍडिशनल डी एम एच ओ डॉक्टर गजानंद लॅब,मेडिकल ऑफिसर डॉक्टर पारसनाथ सेवा फाऊंडेशन प्रेसिडेंट खाजा सिराजुद्दीन ,शफिक अहमद ,अथेर इमरान , असलम खान शेख इस्माईल ,तबरेज खान , अहमद हाफिज समीर मोहम्मद नावेद रिजवान खॉन, मो. समीर खॉन मोहमद सलीम, खान मोहमद, असीफ इच्चोडा, सामाजिक कार्यकर्ता इकबाल पटेल, अबु तल्हा, शेख मशीर, शेख मेहबूब तसेच सेवा फाऊंडेशनचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते

१९ व्या कोल्हापुर समेंलनात सौ.रुचीरा बेटकर शब्दकुंज प्रेरणा पुरस्काराने सन्मानित

  नांदेड प्रतिनिधी:- नांदेड येथील प्रसिद्ध कवयित्री तथा लेखिका सौ. रुचीरा बेटकर सह शिक्षिके सोबत साहित्य क्षेत्रात सुद्धा काम करतात त्यांच्याच कामाची पोहच पावती म्हणून कोल्हापूर येथील १९ व्या संमेलनात 'शब्दकुंज प्रेरणा पुरस्काराने' सन्मानित करण्यात आले. कवि सरकार स्वाभिमानी वाचनालय इंगळी  आयोजित कोल्हापूर येथे  १९ व्या राज्यस्तरीय मराठी ग्रामीण साहित्य संमेलनात 'शब्दकुंज प्रेरणा पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले.     सदरचा पुरस्कार डॉ. श्रीकांत पाटील प्रसिद्ध कांदबरीकार यांचे  हस्ते आणि संमेलन अध्यक्ष प्रा. पी. एस. पाटील, डॉ रामचंद्र चोथे दादासाहेब शेख ' भाऊसाहेब कांबळे अशोक मोहिते, शैलजा परमणे प्रा. संतोष जोईल, सुशिल डवर आणि संमेलन आयोजक कवि सरकार इंगळी यांच्या उपस्थीत २९ सप्टेंबर २४ रोजी देऊन सन्मानीत करण्यात आले या बद्दल नांदेड येथील साहित्यिक मंडळी कवीकट्टा, अक्षरोदय साहित्य मंडळ, कॉमेडी कट्टा व नांदेड जिल्ह्यातील साहित्यीक मंडळींनी अभिनंदन केले आहे.