Skip to main content

दाढी करण्यासाठी माझा नंबर का लावत नाही म्हणून दोन सलून कारगीरावर प्राणघातकी हल्ला

 


( तालुका प्रतिनिधी किनवट) 

किनवट शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील चिन्नावार कॉम्पलेक्स येथे

दिनांक १८ मे २०२५ रोजी रविवारी  रात्री ९.३० च्या दरम्यान अतुल हळदकर किनवट येथे यांच्या दुकानातील दोन कारागिरावर दाढी करण्यासाठी माझा नंबर का लावीत नाही म्हणून कारागीर१)हम्मनलू खासे व २)राजू सुरजवाड यांच्यावर प्राणघातकी हल्ला केला आहे.

त्या पैकी हम्मनलू दिगंबर खासे ह्याची प्रकृती चिंताजनक आहे.

आरोपीवर गुन्हा दाखल होत नाही तो पर्यंत समस्त समाज बांधव पोलिस स्टेशन किनवट येथे तळ ठोकून होते.

आरोपी वर गुन्हा दाखल झाला परंतु आरोपी सध्या फरार आहे.

आरोपी संदीप जाधव रा. गंगानगर किनवट येथील असून त्यास तात्काळ अटक करण्याचे पोलिसांनी आश्वासन दिले. लवकर अटक न झाल्यास महाराष्ट्र नाभिक महामंडळ, किनवट द्वारा आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे 

 शिष्टमंडळाद्वारे भेट देऊन पोलिसांना सांगण्यात आले.

यावेळी नाभीक महामंडळाचे अध्यक्ष सिताराम राचटकर, शहराध्यक्ष अतुल हळदकर, वरिष्ठ नेते विजय पोलासवार  व समस्त नाभीक महामंडळाचे पदधिकारी  आदी उपस्थित होते.

सदरील घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. उपनिरीक्षक सुभाष झाडे हे करीत आहेत.

Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

सेवा फाऊंडेशन तर्फे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात 70 रक्तदात्यांनी केले रक्तदान

  अदिलाबाद:- सेवा फाऊंडेशन यांच्या तर्फे ता.१ ऑक्टोबर रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आयोजक सिराज भाई आदिलाबाद कर यांच्यातर्फे आयोजन करण्यात आले होते यावेळी टिपू सुलतान ब्रिगेडचे नांदेड जिल्हा अध्यक्ष सय्यद नदीम आसिफ भाई लाईफ सेल क्लिनिकल लॅब किनवट यांचे स्वागत करण्यात आले यावेळी सेवा फाऊंडेशन आदिलाबाद जिल्हा टीमनी उत्कृष्ट असे रक्तदान शिबिराचे कार्यक्रम आयोजन केले यावेळी 70 रक्तदात्यांनी रक्तदान केले यावेळी  जिल्हाध्यक्ष सय्यद नदिम यांनी स्वतः रक्तदान केले व युवकांना प्रोत्साहन दिले यावेळी  रिम्स डायरेक्टर डॉक्टर जयसिंग राठोड,डॉक्टर नरेंद्र राठोड ऍडिशनल डी एम एच ओ डॉक्टर गजानंद लॅब,मेडिकल ऑफिसर डॉक्टर पारसनाथ सेवा फाऊंडेशन प्रेसिडेंट खाजा सिराजुद्दीन ,शफिक अहमद ,अथेर इमरान , असलम खान शेख इस्माईल ,तबरेज खान , अहमद हाफिज समीर मोहम्मद नावेद रिजवान खॉन, मो. समीर खॉन मोहमद सलीम, खान मोहमद, असीफ इच्चोडा, सामाजिक कार्यकर्ता इकबाल पटेल, अबु तल्हा, शेख मशीर, शेख मेहबूब तसेच सेवा फाऊंडेशनचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते