Skip to main content

आज किनवट येथे जागर संविधानाच महोत्सव कार्यक्रम

 



( किनवट)

हुतात्मा गोंडराजे शंकरशहा रघुनाथशहा विचारमंच , शहीद विजय वाकोडे नगरी किनवट येथे संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून राष्ट्रपिता महात्मा जोतीबा फुले व राष्ट्र निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमीत्त जागर संविधानाचा महोत्सव २०२५ चे दि.३० ठिक ६.३० वा. रोजी आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पिपल्स रिपब्लीकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.प्रा.जोगेंद्र कवाडे हे लाभणार आहे तर उद्घाटक म्हणून कॅबीनेट मंत्री दर्जा प्राप्त हरिद्रा, विधीमंडळ अंदाज समिती  मा. हेमंत पाटील हे उपस्थित राहणार आहेत तर प्रमुख  अतिथी म्हणून राज्यमंत्री दर्जा प्राप्त लघु उद्योग विकास महामंडळाचे मा. जयदिप कवाडे, अदिलाबादचे खासदार नागेश घोडाम, आर्णीचे आमदार राजु तोडसाम, पिरिपी एकतावादी युवा नेते भैयासाहेब इंदिसे, प्रदेश महासचिव पिरिपी बापुराव गजभारे तर स्वागताध्यक्ष म्हणून किनवट माहुरचे आमदार भीमरावजी केराम हे लाभणार आहेत.

या कार्यक्रमात सामाजिक शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात कार्य करणाऱ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे

या मध्ये आमदार बाबुराव कदम कोहळीकर, उपायुक्त संजय गायकवाड, कार्यकारी संचालक गोदावरी खोरे स. नगर संतोष तिरमनवार , सहायक आयुक्त शिवानंद मिनगिरे, मुख्याधिकारी विजय कावळे, दादाराव कयापाक जेष्ठनेते रिपाई, अभियंता प्रशांत ठमके भा. बौ. महासभा, प्रभु सावंत अ. म.शिक्षक संघ, ॲड प्रतीक केराम, डॉ. विजय कांबळे यांचा सन्मान होणार आहे .

या कार्यक्रमानंतर राजाभाऊ शिरसाठ, नागसेनदादा सावदेकर, अविनाश नाईक या महाराष्ट्रतिल प्रसिद्ध गायक कलावंताचा बुद्ध भीम गितावरील कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्तम कनिंदे हे करणार आहेत तर या कार्यक्रमास उपासक उपासिका ,युवक, पत्रकार बांधव महिला भिम अनुयायांनी  हजारोच्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन संयुक्त जयंती अध्यक्ष /आयोजक विनोद भरणे व आयोजन समिती शंकर नगराळे, ज्ञानेश्वर मुनेश्वर, प्रसेनजीत कावळे, निखील कावळे, गौतम पाटील, निखिल सर्पे अनिकेत भरणे यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...