Skip to main content

वैधानिक विकास महामंडळाचे माजी सदस्य डॉ. अशोक बेलखोडे यांनी केले पालकमंत्री अशोक चव्हाण यांचे अभिनंदन

 


किनवट श.प्रतिनिधी :-

किनवट तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयात रुग्ण सेवेसाठी सिटी स्कॅन मशीन उपलब्ध होणार असल्याने व किनवट शहराच्या विकासासाठी जातीने लक्ष दिल्या बद्दल नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा कॅबीनेट मंत्री अशोक चव्हाण यांचे  किनवटचे वैधानिक विकास महामंडळाचे  माजी सदस्य तथा साने गुरुजी रूग्णालय परिवाराचे प्रमुख डॉ. अशोक बेलखोडे यांनी एका पत्रकाद्वारे त्यांचे अभिनंदन केले आहे कारण किनवट हे आदीवासी  तसेच प्रगति च्या दिशेने वाटचाल करणारा तालुका आहे किनवटचा परिपुर्ण विकास व्हावा अशी अपेक्षा डॉ. बेलखोडे यांनी केली आहे तसेच किनवट शहराच्या विकासासाठी प्रलंबीत प्रकल्पाची आवश्यकता आहे या मध्ये 

१) सत्र न्यायालयाची स्थापना

२) मंजुर झालेले कृषी महाविद्यालय

३) मागा स्वर्गीय व इतर मागा स्वर्गीय विद्यार्थ्यासाठी १०० क्षमतेच ४वस्तीगृह

४) नर्सिंग स्कूल

५)सिंचन प्रकल्प

६) रोजगार निर्मिती करीता एम .आय. डी .सी. विकास प्रकल्प


याची मागणी त्यांनी केली आहे व उपजिल्हा रुग्णालयास पुर्णवेळ भुलतज्ञ, स्त्रिरोग तज्ञ, सिझेरीयन, रक्त साठा केंद्र, अति दक्षता बाल विभाग, हृदय रुग्णा करीता आय सी यु इत्यादी सुविधा उपचाराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सुचवले आहे

Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रका...