Skip to main content

गांधी नगर वासीयांचे शोध निवारा आदोंलनाने किनवट न. प. प्रशासन नरमले

 




किनवट शहर प्रतिनिधी:-

ॲड. आकांक्षा आळणे व विस्थापित गांधी नगर वासींयाकडुन ४ जानेवारी पासुन साखळी उपोषण सुरु आहे या उपोषणास आज २२ दिवस झाले त्याच आदोंलना अंतर्गत आज दिनांक २४ रोजी निवारा शोध आदोंलन करण्यात आले .

३० नोव्हेंबर२१ रोजी झालेल्या घरावर हातोडा पडला होता तेंव्हा पासुन गांधी नगरचे नागरिक निवारा शोधत आहे.  न.प. प्रशासनाने पिडितांना ६०० स्केअर फुट जागा देऊन त्वरीत घरे बांधुन द्यावी अशी मागणी आहे 




या आदोंलनाचे नेतृत्व समाज सेविका तथा रॉ. कॉ. युवती तालुका अध्यक्ष ॲड. आकांक्षा आळणे करीत आहे या वेळी माजी नगराध्यक्ष अरुण आळणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जहीर खान, सुरेश मुनेश्वर, निखील वाघमारे, जीवन लाठे आदी उपस्थित होते यावेळी नगर परिषद किनवटचे नगराध्यक्ष आनंद मच्छेवार यांनी गांधी नगर वासीयांना लवकरच जागा उपलब्ध करून देऊ व घरे बांधुन देवु त्यासाठी आम्ही बांधील आहोत या करिता नगर परिषद प्रशासनास दोन महिन्याचा कालावधी द्या असे आश्वासन दिले .

या आदोंलनात २६ कुंटुबासह गांधी नगरवासी महिला पुरुष, बालके  सहभागी होते.

या वेळी पोलिस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता.

Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रका...