Skip to main content

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त बळीराम पाटील महाविद्यालयात विविध कार्यक्रम



किनवट: प्रतिनिधी

 बळीराम पाटील कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय किनवट येथे मराठी भागाच्या वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. कल्लोळकार डॉ. वसंत राठोड यांचे 'बोलीभाषा व सद्यस्थिती'  या विषयावर तर प्रज्ञा घोडवाडीकर यांचे' किनवट परिसरातील बोलीचा वापर' या विषयावर व्याख्यानाचे आयोजन केलेले आहे.

प्रा. डॉ. सूर्यप्रकाश जाधव,माजी संचालक विद्यार्थी कल्याण विभाग, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड 

 यांचे' मराठी भाषा व लेखन कौशल्य'या विषयावर प्रा. डॉ.राजू मोतेराव यांचे आदिवासी लोककला व बोली या विषयाच्या अनुषंगाने  व्याख्यानाचे आयोजन करण्यात आलेले आहे. मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्ताने कविवर्य कुसुमाग्रज  यांच्या साहित्य संपदेवर आधारित 'जाणीव' भितीपत्रकाचे उद्घाटन करण्यात येणार आहे.  विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी 'कथाकथन' या सदराखाली विद्यार्थ्यांनी रचलेल्या कथेचा आस्वाद आपल्याला घेता येणार आहे. सामाजिक जाणिवेचे कवी संमेलन आयोजित करण्यात आलेले आहे. या कवी संमेलनामध्ये महाविद्यालयातील कवी विद्यार्थी आपल्या रचना सादर करणार आहेत. याबरोबरच या कवी संमेलनात अध्यक्ष म्हणून प्रसिद्ध कवी सांगावाकार महेंद्र नरवाडे प्रा. गजानन सोनोने ,रामस्वरूप मडावी, रमेश मुनेश्वर,रूपेश मुनेश्वर, दीपक खंदारे,अविनाश शेरे,राजेश पाटील यासह अनेक कवी  संमेलनामध्ये सहभागी होणार आहे. मराठी भाषा ,बोली, परिसरातील बोली ,यांचे संवर्धन करण्यासाठी मराठी विभागाच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.के.बेंबरेकर, उपप्राचार्य तथा मराठी विभागप्रमुख डॉ.पंजाब शेरे यांनी कळविले आहे.  कार्यक्रमाचे पूर्व नियोजन मराठी विभागाने केले आहे.

Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...