Skip to main content

किनवट शहराअंतर्गत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळया जवळचे देशी दारूचे दुकान त्वरीत हटवा

 


(किनवट  प्रतिनिधी)-

किनवट शहराअंतर्गत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याजवळ मुख्य बाजारपेठेच्या ठिकाणी सुरू केलेले देशी दारूचे दुकान त्वरीत हे तरत्र हलवून अनुज्ञप्तीधारक नितीन कन्नलवार, राजु ऊर्फ बालु मुरगुलवार व बळीराम मुरगुलवार याचेवर कठोर कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली.


किनवट शहाअंतर्गत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा तसेच मुख्य बाजारपेठ असलेल्या ठिकाणी नितीन कन्नलवार, राजु ऊर्फ बालु मुरगुलवार व बळीराम मुरगुलवार बाद या व्यक्तीचे काहि दिवसापूर्वी देशी दारू विक्रिचे दुकान सुरू केले आहे. अण्णाभाऊ साठे पुतळ्यापासुन या देशी दारू दुकानाचे अंतर केवळ २० फूट आहे तर याच ठिकाणी उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय व हु. गोडराजे मैदान आहे या ठिकाणी दिवसभर नागरिकासह


वाहनांची वरदल असते तर गोंडराजे मैदान व अण्णाभाऊ साठे पुतळा असल्याने विविध राजकिय व सामाजिक कार्यक्रम आयोजित केले जातात. सदर क्षेत्र हे संवेदनशिल असतांनाही नितीन कन्नलवार या व्यक्तीचे मुख्य रस्तालगत देशी दारूचे दुकान सुरू केले आहे. या दुकानामुळे दिवसभर मद्यपी वावरत असल्याने अण्णाभाऊ साठे पुतळ्याची विटंबना


होण्याचा धोका निर्माण होत असून गोंडराने सभा मैदानात असल्यास मद्यपिकडून कायदा व सुव्यवस्था बाधित होण्याची भिती निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे हे ठिकाण मुख्य बाजारपेठेचे असल्याने बाजाराच्या दिवशी महिला व नागरिकांची वर्दर असते गदर्दीच्या वेळी मद्यपीकडून महिला वर्गाची छेडछाड होण्याची शक्यता आहे. या देशी दारू दुकानाला नागरिकांनी


विरोध करून सुध्दा अनुज्ञ जातीधारक राजु ऊर्फ बालू मुरगुलवार व बळीराम गुलवार यांनी नगरपालिका प्रशासन व राज्य उत्पादनशुल्क कार्यालयातील अधिका- यांना हाताशी धरू संवेदनशील क्षेत्रात देशीदारू विक्री परवाना मंजूर करून घेतला. या देशीदारूच्या दुकानामुळे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याची विटंबना होण्याचा धोका लक्षात घेऊन कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने येथील देशी दारूचे दुकान त्वरीत हे इतरत्र हलवावे अशी या भागातील नागरिकांची मागणी असुन या गंभीर बाबीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास तिव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे नांदेड व राज्य उत्पादन शुल्क कार्यकारी किनवत. व आदी कार्यालयाला देण्यात आले. असे निवेदनकरते सुगत गौतम नगराळे यानी सागितले.

Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...