Skip to main content

सध्याच्या किनवट तालुक्या पेक्षा चांगले किनवट येणाऱ्या पिढीला द्यावे-अँड विलास सूर्यवंशी

 



किनवट (तालुका प्रतिनिधी) पोलीस अधीक्षक नांदेड यांच्या आदेशाने पोलीस स्टेशन किनवट येथे दिनांक 22 /1 /2025 रोजी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती त्या कार्यशाळेला पोलीस निरीक्षक ओम बिर्ला साहेब, अँड विलास सूर्यवंशी  अँड एस. एम सरपे व किनवट तालुक्यातील पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष आदी उपस्थित होते.. या कार्यक्रमांमध्ये भारतीय दंड संहिता व भारतीय न्याय संहिता तसेच फौजदारी प्रक्रिया संहिता व भारतीय नागरिक सुरक्षा संहिता तसेच भारतीय साक्ष पुरावा कायदा व भारतीय साक्ष अधिनियम या प्रमुख कायद्याच्या बदलाची उद्देश व त्याची अंमलबजावणी या संदर्भात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमांमध्ये अँड सूर्यवंशी यांनी या तिन्ही कायद्या चा फरक सांगितला व सध्याच्या किनवट मध्ये होणारे सायबर क्राईम कमी करन्या साठी या तिन्ही कायद्याची उपयुक्तता सांगितली  झालेल्या तीन कायद्यामधील शब्दाच्या सहजते मध्ये बदल व सुलभते बदल आपल्या अद्वितीय शैलीमध्ये श्रोत्यांना सांगून श्रोत्याच्या जीवनामध्ये अमुलाग्र बदल घडवून श्रोत्याने सध्याच्या किनवट पेक्षा शांततापूर्ण किनवट येणाऱ्या पिढीला द्यावे असे आवाहन केले..पोलीस पाटलानी आपले कार्यालयीन अभिलेखे तयार करावे त्यामुळे शांतता निर्माण होण्यास मदत होते 

किनवट तालुक्यात शांतता निर्माण करणे ही जबाबदारी पोलीस पाटलांचीच..

असे सांगितले..

सदर कार्यशाळे चे नियोजन पो. हे. का.सुभाष दोनकलवार व पो. हे. का बोधमवाड यांनी उत्कृष्ट रित्या केले तसेच  किनवट तालुक्यातील अनेक तंटामुक्ती आदेक्ष सामाजिक कार्यकर्ते 

आदी उपस्थित होते...

Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...