Skip to main content

यंदा गुलाल महाविकास आघाडीच उधळणार -प्रदिप नाईक

 



किनवट/प्रतिनिधी-

महायुतीचे उमेदवार भीमराव केराम आणि सचिन नाईक मित्रमंडळाचे उमेदवार सचिन नाईकांनी सोमवारी उमेदवारी भरतांना केलेल्या जनशकी प्रदर्शनाला तोडीस तोड असे आज नामांकनपत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी महाआघाडीचे उमेदवार प्रदीप नाईकांनी सुद्धा जनशक्ती प्रदर्शन करीत दुपारी नामांकनपत्र दाखल केले. उमेदवारी दाखल केल्यानंतर उपस्थित कार्यकर्त्यांना त्यांनी मताधिक्याने विजय मिळवण्यासाठी घराघरापर्यंत तुतारी पोहोचविण्याचे आवाहन केले.



उमेदवारी भरण्याचा मंगळवार हा शेवटचा दिवस असल्याने खा. नागेश पाटील आष्टीकरांच्या बदल्यात त्यांचे चिरंजीव कृष्णा पाटील आष्टीकरांनी किनवट विधानसभेची प्रदीप नाईकांची उमेदवारी दाखल करण्यासाठी हजेरी लावली. रॅलीचे सभेत रुपांतर झाल्यानंतर अनेक मान्यवर सभामंचावर उपस्थिती दिसून आली.

यावेळी प्रदिप नाईक यांनी यंदा महाविकास आघाडीच गुलाल उधळूनार असा ठाम विश्वास माजी आमदार प्रदिप नाईक यांनी व्यक्त केला.

या वेळी  सौ.बेबी ताई प्रदीप नाईक सौ. डॉ.सुप्रियाताई कपिल , अरुण आळणे, मा. रेड्डी , के.मुर्ती, साजीद खान , प्रवीण राठोड, गिरीश नेमान्निवार, राहुल नाईक,  लक्ष्मीपती दोनपेल्लीवार, आशाताई कदम , प्रिती मुनेश्वर, शेख परवीन,फारूख चव्हाण, केशवे,

यांच्या सह शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस, उबाठा

शिवसेना आणि काँग्रेसच्या पदाधिकारी कार्यकर्ते , असंख्य किनवट माहुरच्या गावकरी नागरीकांची उपस्थीती होती.

Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रका...