Skip to main content

तुम्हाला संविधानाने दिलेल्या संधीचे सोनं करा -प्रा. विठ्ठल कांगणे

 


तालुका प्रतिनिधी घोटी/किनवट:-

तुम्हाला संविधानाने दिलेल्या संधीचे सोने करा तुम्हाला शिक्षण  मिळत  आहे त्यांचा फायदा घ्या आणि आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करा असे प्रतिपादन क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती निमित्त घेण्यात आलेल्या समाज प्रबोधन कार्यक्रमात ते बोलत होते कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी आनंदरावजी वाढे (सेवानिवृत्त शिक्षण अधिकारी नांदेड ) होते तर कार्यक्रमाचे उद्घाटक अभियंता प्रशांत ठमके (भारतीय बौद्ध महासभा किनवट) हे होते  स्वागताध्यक्ष अशोक कोसले यांनी सर्वांचे स्वागत केले 

 प्रमुख अतिथी म्हणून ॲड. प्रकाशजी गेडाम  (अध्यक्ष आढावा समिती आदिवासी प्रकल्प किनवट ),

सुकुमार पेटकुले (अखिल भारतीय माळी महासंघ तेलंगणा ) हे मंचावर होते  प्रमुख पाहुणे म्हणून सुनील बेहरे, प्राचार्या शुभांगीताई ठमके, सौ.निर्मलाबाई मेश्राम (सरपंच) राजू सुरोशे (उपसरपंच), ॲड सुनिल येरेकार, विकास कुडमेते, दत्ता कसबे ,जीवन कोटरंगे , प्रा. दगडू भरकड,अरविंद आत्राम ,लक्ष्मण भवरे ,बालाजी आत्राम, संदीप पेटकुले, अनुसया गरड, दीपिका येरमे, सुलोचना भवरे, बेबी मेश्राम ,शकुंतला राठोड ,बालाजी पावडे ,तुळशीराम गुरूनुले ,भारत सोनुले ,शशिकांत लढे , नूर सेठ आदी मान्यवर उपस्थित होते पुढे बोलताना प्राध्यापक कांगणे सर म्हणाले की प्रत्येकाला संविधानाने मूलभूत अधिकार कर्तव्य दिली आहे त्यामुळेच आपला भारत एक संघ  सशक्त  बनला आहे म्हणून संविधानाचे वाचन करा व संविधानाने दिलेल्या अधिकाराचा वापर करा तसेच नवयुवकांनी मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे मतदानाचा टक्का वाढवला पाहिजे असे त्यांनी सांगितले. तसेच दुसऱ्यांचं स्टेटस बघत बसण्यापेक्षा स्वतःच स्टेटस बनवा जेणेकरून लोक तुमचा स्टेटस ठेवतील यानंतर त्यांनी महात्मा फुले यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला व त्यांचे मौलिक समाजकार्य सांगितले या कार्यक्रमास असंख्य युवक युवती विद्यार्थी पालक वर्ग , पत्रकार बांधव, गावकरी उपस्थित होते  कार्यक्रमाचे आयोजन अखिल भारतीय माळी महासंघ शाखा घोटी तालुका किनवट यांनी केले होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्तम कानिंदे यांनी केले तर आभार वाढे यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

आदिवासी विकास समिती मराठवाडा अध्यक्ष पदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती

 किनवट: राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती, आज दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी किनवट येथील गोकुंदा शासकीय विश्रामगृह येथे दैनिक वीर शिरोमणी वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे राज्य कार्याध्यक्ष शंकरसिंह ठाकुर सर तसेच दैनिक सा.नंदगिरीचा कानोसा या वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे मराठवाडा अध्यक्ष मारोती शिकारे सर नांदेड जिल्हाअध्यक्ष विनायक कामठेकर सर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक घेऊन राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली यावेळी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय जी सूर्यवंशी सर यांनी निवड जाहीर झाल्याबरोबर फोन वर अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या शुभेच्छांचा स्वीकार करत ट्रायबल सेवा न्यूज चॅनेल चे संपादक प्रणय कोवे  यांनी नांदेड जिल्हाअध्यक्ष पदावरून मराठवाडा अध्यक्ष या पदावर नियुक्ती केल्याबद्दल सरांचे मनःपूर्वक आभार मानले  प्रणय कोवे हे गेल्या अनेक वर्षापासू...

१० वर्षीय अरफात मलीक चव्हाण ने ठेवला आयुष्यातील पहिला रोजा

  किनवट प्रतिनिधि : इस्लाम धर्मात पवित्र रमजान या महिन्याला अनन्य महत्व प्राप्त आहेया महिन्यात सर्वच मुस्लिम बांधव यांच्यावर वयाच्या दहाव्या वर्षा पासून रोजा (उपवास) फर्ज (सक्तीचें) असतात.लहानपासून मोठ्यापर्यत या महिन्यांमध्ये 30 दिवस रोजा धरत असतात. पालकांचे पाहून लहान मुलांनाही रोजा धरण्याची लालसा निर्माण होते. त्यामुळे लहान चिमुकले ही मोठ्यांचे अनुकरण करीत रोजा (उपवास) धरतात.अशाच प्रकारे किनवट येथील मलीक चव्हाण यांचा 10 वर्षाचा मुलगा अरफात चव्हाण यांनी आपल्या जीवनातील पहिला रोजा सोमवारी 10 मार्च रोजी पूर्ण केला.मुस्लिम समाजात पवित्र असणाऱ्या या महिन्यात संपूर्ण महिनाभर दिवसभर पाणी न पिता उपवास ठेवला जातो.यावर्षी रोजा (उपवास) सकाळी 5.10 वाजता सुरू होत असून संध्याकाळी 6.28 ला रोजा सोडण्याची वेळ आहे.13 तासा पेक्षा जास्त वेळचा उपवास असल्याने या उष्णतेचा मोठ्या माणसांनादेखील खूप त्रस होतो.त्यात या चिमुकल्याने पहिला रौजा ठैवून आपल्या आयुष्याची सुरुवात एक चांगल्या प्रकारे व्हावी या हेतूने उपवास ठैेवला.त्यामुळे अरफात मलिक चव्हाण यांचे सर्व्र कौतुक होत आहे.