Skip to main content

तुम्हाला संविधानाने दिलेल्या संधीचे सोनं करा -प्रा. विठ्ठल कांगणे

 


तालुका प्रतिनिधी घोटी/किनवट:-

तुम्हाला संविधानाने दिलेल्या संधीचे सोने करा तुम्हाला शिक्षण  मिळत  आहे त्यांचा फायदा घ्या आणि आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करा असे प्रतिपादन क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती निमित्त घेण्यात आलेल्या समाज प्रबोधन कार्यक्रमात ते बोलत होते कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी आनंदरावजी वाढे (सेवानिवृत्त शिक्षण अधिकारी नांदेड ) होते तर कार्यक्रमाचे उद्घाटक अभियंता प्रशांत ठमके (भारतीय बौद्ध महासभा किनवट) हे होते  स्वागताध्यक्ष अशोक कोसले यांनी सर्वांचे स्वागत केले 

 प्रमुख अतिथी म्हणून ॲड. प्रकाशजी गेडाम  (अध्यक्ष आढावा समिती आदिवासी प्रकल्प किनवट ),

सुकुमार पेटकुले (अखिल भारतीय माळी महासंघ तेलंगणा ) हे मंचावर होते  प्रमुख पाहुणे म्हणून सुनील बेहरे, प्राचार्या शुभांगीताई ठमके, सौ.निर्मलाबाई मेश्राम (सरपंच) राजू सुरोशे (उपसरपंच), ॲड सुनिल येरेकार, विकास कुडमेते, दत्ता कसबे ,जीवन कोटरंगे , प्रा. दगडू भरकड,अरविंद आत्राम ,लक्ष्मण भवरे ,बालाजी आत्राम, संदीप पेटकुले, अनुसया गरड, दीपिका येरमे, सुलोचना भवरे, बेबी मेश्राम ,शकुंतला राठोड ,बालाजी पावडे ,तुळशीराम गुरूनुले ,भारत सोनुले ,शशिकांत लढे , नूर सेठ आदी मान्यवर उपस्थित होते पुढे बोलताना प्राध्यापक कांगणे सर म्हणाले की प्रत्येकाला संविधानाने मूलभूत अधिकार कर्तव्य दिली आहे त्यामुळेच आपला भारत एक संघ  सशक्त  बनला आहे म्हणून संविधानाचे वाचन करा व संविधानाने दिलेल्या अधिकाराचा वापर करा तसेच नवयुवकांनी मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे मतदानाचा टक्का वाढवला पाहिजे असे त्यांनी सांगितले. तसेच दुसऱ्यांचं स्टेटस बघत बसण्यापेक्षा स्वतःच स्टेटस बनवा जेणेकरून लोक तुमचा स्टेटस ठेवतील यानंतर त्यांनी महात्मा फुले यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला व त्यांचे मौलिक समाजकार्य सांगितले या कार्यक्रमास असंख्य युवक युवती विद्यार्थी पालक वर्ग , पत्रकार बांधव, गावकरी उपस्थित होते  कार्यक्रमाचे आयोजन अखिल भारतीय माळी महासंघ शाखा घोटी तालुका किनवट यांनी केले होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्तम कानिंदे यांनी केले तर आभार वाढे यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे आणण

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे माजी ता

.. महाराष्ट्रातील निवडणुका बॅलेट पेपरवर होणार; निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची माहिती

 महाराष्ट्र:- देशातील लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे जाहीर करण्यात आला असून महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे या कालावधीत एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता शनिवारपासून लागू झाली आहे. महाराष्ट्रात यंदाची निवडणूक विविध मुद्द्यांनी गाजणार आहे. यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दाही महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. राजकीय नेत्यांना आपली ताकद दाखवून देण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील सर्व ४८ मतदारसंघांत समाजातील तरुणांनी शेकडो उमेदवारी अर्ज दाखल करावेत, असं आवाहन केलं आहे. उमेदवारांची संख्या प्रचंड प्रमाणात असेल तर ईव्हीएमवर निवडणुका घेणं कठीण होणार आहे. अशातच आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ईव्हीएमच्या क्षमतेबाबत माहिती दिली आहे. ईव्हीएमसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना एस. चोक्कलिंगम म्हणाले की, "एका मतदारसंघात ४०० उमेदवारांहून अधिक उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यास आपल्याला बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी ला