Skip to main content

प्रा. नितेश कराळे यांच्या मारेगाव येथील कार्यक्रमाला प्रचंड गर्दी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ आणि मारेगाव कॉलेजच्या वतीने केले होते आयोजन

 


मारेगाव, यवतमाळ : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघांचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे यांच्या प्रेरणेतून तालुका मारेगाव येथील प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ आणि मराठी विभाग कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने दि.२५ डिसेंबर २०२२रोजी खद खद मास्तर प्रा. नितेश कराळे यांचे विध्यार्थ्यांना मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

   यावेळी मंचावर या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. नितेश कराळे सर होते. तर अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अविनाश घरडे होते. कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष म्हणून रंगनाथ पतसंस्थेचे अध्यक्ष देविदास काळे, डॉ. महेंद्र लोढा होते. प्रमुख अतिथी म्हणून केशवजी सवळकर (विदर्भ प्रदेश अध्यक्ष प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महा. राज्य ) अनिलभाऊ राठोड (जिल्हाध्यक्ष प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, महा. राज्य ) शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जीवन कापसे, सामाजिक कार्यकर्ते विजय बोथले, अविनाश लांबट, ठाणेदार राजेश पुरी यांची मंचावर उपस्थिती होती.

   या कार्यक्रमांची सुरुवात मंचावरील मान्यवरांच्या हस्ते संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून, पुष्प हार अर्पित करून व दीप प्रज्वलीत करून करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक प्रा. नितेश कराळे यांचे स्वागत प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या सर्व पत्रकारांच्या हस्ते पुष्प व हार घालून करण्यात आले. तर मराठी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने प्रा. नितेश कराळे यांचा सत्कार प्राचार्य डॉ. अविनाश घरडे यांच्या हस्ते शाल व पुष्प गुच्छ देऊन करण्यात आला. मंचावरील सर्व मान्यवरांचे पुष्प गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

   सर्वांचे लोकप्रिय खद खद मास्तर म्हणून ओळख असणारे प्रा. नितेश कराळे आपले मार्गदर्शन करण्यासाठी माईक जवळ उभे होताच उपस्थित सर्वानी टाळ्याच्या गजरात उत्साहित होऊन सरांचे स्वागत केले. उपस्थित लोकांची गर्दी पाहून लोकांचे प्रेम पाहून मनातील आनंद लपवू शकले नाहीत. हास्याचे फवारे उडवीत त्यांनी आपल्या अस्सल वऱ्हाडी भाषेतून उपस्थित हजारो विध्यार्थी तथा जनसंमुदायास वर्तमान परिस्थिच्या वेगवेगळ्या पैलूवर भाष्य करीत गंभीरतेने व विनोदाने उपस्थिताचे मने जिंकली. विध्यार्थी दसेपासून उच्चंपदस्त समाजपयोगी माणूस घडविण्यासाठी नियमित अभ्यासाची जोड प्रतिपादन करीत प्रा. नितेश कराळे यांनी वाढत्या महागाईचा आलेख, बेरोजगारी, भरकटत असलेला विध्यार्थी, शेतकरी आत्महत्या या गंभीर बाबीवर चिंता व्यक्त करीत कार्यक्रमात विनोदाचे फवारे उडवीत अभ्यासक्रम, मुळाक्षरे, व्यंजने आदिवर अभ्यासपूर्ण विवेचन करीत विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेत. विध्यार्थ्यांच्या मनातील खद खद दुर करीत आपल्या आगळ्यावेगळ्या शैलीची चुणूक दाखवीत उपस्थिताच्या मनावर भुरळ पाडली.

     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. राजेश चवरे यांनी केले तर प्रास्ताविक प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे पत्रकार रोहन आदेवार यांनी केले. व प्रा. गजानन सोडणर यांनी आभार मानले. कार्यक्रमांची सांगता होताच प्रा. कराळे सर विध्यार्थ्यांमध्ये कैद झाले.

     महाराष्ट्रातील जनतेच्या मनात भुरळ पाडणारे खद खद मास्तर प्रा. नितेश कराळे यांची एन्ट्री मारेगावात पर्वणी ठरली. कार्यक्रमांची सांगता होताच विध्यार्थ्यांनी प्रा. कराळे यांचे सोबत फोटोसेशन साठी गराडा घातला. शेकडो विध्यार्थी, नागरिक व प्राध्यापकांनी आपल्या मोबाईल मध्ये खद खद मास्तरला कैद केलेत. या वेळी फोटोसेशन साठी चांगलीच झुंबळ उडाली होती.

Comments

Popular posts from this blog

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे आणण

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे माजी ता

.. महाराष्ट्रातील निवडणुका बॅलेट पेपरवर होणार; निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची माहिती

 महाराष्ट्र:- देशातील लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे जाहीर करण्यात आला असून महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे या कालावधीत एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता शनिवारपासून लागू झाली आहे. महाराष्ट्रात यंदाची निवडणूक विविध मुद्द्यांनी गाजणार आहे. यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दाही महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. राजकीय नेत्यांना आपली ताकद दाखवून देण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील सर्व ४८ मतदारसंघांत समाजातील तरुणांनी शेकडो उमेदवारी अर्ज दाखल करावेत, असं आवाहन केलं आहे. उमेदवारांची संख्या प्रचंड प्रमाणात असेल तर ईव्हीएमवर निवडणुका घेणं कठीण होणार आहे. अशातच आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ईव्हीएमच्या क्षमतेबाबत माहिती दिली आहे. ईव्हीएमसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना एस. चोक्कलिंगम म्हणाले की, "एका मतदारसंघात ४०० उमेदवारांहून अधिक उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यास आपल्याला बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी ला