Skip to main content

शिक्षक सतत गैरहजर राहत असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान शिक्षण विभागाने लक्ष देण्याची गरज

 चिखलीच्या माणिक विद्यालयाच्या शिक्षकांना गरज नाही शाळेत हजर राहण्याची,महीण्यातुन एक दोनदा सह्या मारुन पगार उचलतात मात्र महीण्याची..... चिखली येथील चित्र

 


किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट तालुक्यातील माणिक विद्यालय चिखली (बु) येथे संस्थाचालक यांचे भाऊ माधव माणिकराव बसवदे हे गेल्या अनेक दिवसापासून आजारी असल्या कारणाने महिन्यातून दोनच वेळा शाळेवर येऊन हजेरीपटावर उपस्थित असल्याचे स्वाक्षरी करून शासनाचे पगार उचलत असल्याचा प्रकार काही दिवसापुर्वीच उघडकीस आला होता त्याचीच प्रचिती दि 14 नोवव्हेंबर रोजी दै.नांदेड चाैफेर चे तालुका प्रतीनीधी लक्ष्मीकांत मुंडे यांना आली.

  किनवट पासून 12 किलोमीटर अंतरावर चिखली (बु) येथे माणिक विद्यालय अंतर्गत पाचवी ते दहावीपर्यंत माध्यमिक शाळा कार्यरत असून सदर शाळेवर मुख्याध्यापकासह 14 कर्मचारी कार्यरत आहेत दिनांक 29/06/2022 रोजी गावकऱ्यांच्या सांगण्यावरून काही पत्रकारांनी प्रत्यक्ष शाळेवर भेट दिली असता संस्था चालकाचे भाऊ माधव माणिकराव बसवदे हे शिक्षक पदावर कार्यरत आहेत परंतु सदर शिक्षक अनेक महिन्यापासून आजारी असल्याचे शाळेवरील कर्मचाऱ्यांनी सांगितले सदर शिक्षक महिन्यातून दोन वेळा पंधरा दिवसाला एकदा शाळेवर येऊन स्वाक्षरी करतात व फक्त नावाला रजेचा अर्ज शाळेवर ठेवतात यांच्या अशा बेजबाबदारपणाच्या वागण्यामुळे त्याचा परिणाम शाळेवर होत असून सर्व वर्गाची विद्यार्थी पटसंख्या फक्त 220 असल्याचे शाळेवरील कर्मचाऱ्याकडून कळाले. संबंधित शिक्षकास त्यावेळी मोबाईल वरून संपर्क केला असता माधव बसवदे सर असे म्हणाले होते की मी बरेच दिवसापासून विविध आजाराने ग्रस्त असल्याकारणाने मी नियमित शाळेवर हजर राहू शकत नाही. शाळेवरील मुख्याध्यापक श्री तीगोटे यांच्याशी पत्रकारांनी मोबाईल वरून संपर्क केला असता त्यांनी सदर बाबतीत मौन बाळगळ्याने एक प्रकारे सदर बाब सत्य असल्याचेच उघडकीस होते.दि.14 नोव्हेंबर रोजी देै.नांदेड चाैफेर चे तालुका प्रतीनीधी हे अचानक शाळेवर गेले असता संबंधीत शिक्षक व ईतर एक दोन जण शाळेत हजर नसल्याचे दिसुन आले त्यांना मोबाईलवर संपर्क केला असता मी दुपारीच नंदीग्रामने निघालोय आणि मी आज शाळेवर आलो होतो असे सांगीतले उद्या येणार का विचारल्यावर माझी रजा आहे अस बोलले लगेच शाळेच्या मुख्याध्यापकास याबाबतीत रजा आहे का किंवा,ते कसे परत गेले विचारले असता नेहमीप्रमाणेच माैन बाळगुन राहीले रजा दाखवाच म्हटल्यावर चला चहाघेऊ अस म्हणत काढता पाय घेतला.या बाबतीत शिक्षण विभागाने वेळीच लक्ष देण्याची गरज आहे अन्यथा गावकऱ्यांच्या वतीने शिक्षण विभागाकडे तक्रारी अर्ज देणार असल्याचे सुद्धा गावकऱ्यांनी बोलून दाखविले

Comments

Popular posts from this blog

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे आणण

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे माजी ता

.. महाराष्ट्रातील निवडणुका बॅलेट पेपरवर होणार; निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची माहिती

 महाराष्ट्र:- देशातील लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे जाहीर करण्यात आला असून महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे या कालावधीत एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता शनिवारपासून लागू झाली आहे. महाराष्ट्रात यंदाची निवडणूक विविध मुद्द्यांनी गाजणार आहे. यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दाही महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. राजकीय नेत्यांना आपली ताकद दाखवून देण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील सर्व ४८ मतदारसंघांत समाजातील तरुणांनी शेकडो उमेदवारी अर्ज दाखल करावेत, असं आवाहन केलं आहे. उमेदवारांची संख्या प्रचंड प्रमाणात असेल तर ईव्हीएमवर निवडणुका घेणं कठीण होणार आहे. अशातच आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ईव्हीएमच्या क्षमतेबाबत माहिती दिली आहे. ईव्हीएमसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना एस. चोक्कलिंगम म्हणाले की, "एका मतदारसंघात ४०० उमेदवारांहून अधिक उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यास आपल्याला बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी ला