Skip to main content

शिक्षक सतत गैरहजर राहत असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान शिक्षण विभागाने लक्ष देण्याची गरज

 चिखलीच्या माणिक विद्यालयाच्या शिक्षकांना गरज नाही शाळेत हजर राहण्याची,महीण्यातुन एक दोनदा सह्या मारुन पगार उचलतात मात्र महीण्याची..... चिखली येथील चित्र

 


किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट तालुक्यातील माणिक विद्यालय चिखली (बु) येथे संस्थाचालक यांचे भाऊ माधव माणिकराव बसवदे हे गेल्या अनेक दिवसापासून आजारी असल्या कारणाने महिन्यातून दोनच वेळा शाळेवर येऊन हजेरीपटावर उपस्थित असल्याचे स्वाक्षरी करून शासनाचे पगार उचलत असल्याचा प्रकार काही दिवसापुर्वीच उघडकीस आला होता त्याचीच प्रचिती दि 14 नोवव्हेंबर रोजी दै.नांदेड चाैफेर चे तालुका प्रतीनीधी लक्ष्मीकांत मुंडे यांना आली.

  किनवट पासून 12 किलोमीटर अंतरावर चिखली (बु) येथे माणिक विद्यालय अंतर्गत पाचवी ते दहावीपर्यंत माध्यमिक शाळा कार्यरत असून सदर शाळेवर मुख्याध्यापकासह 14 कर्मचारी कार्यरत आहेत दिनांक 29/06/2022 रोजी गावकऱ्यांच्या सांगण्यावरून काही पत्रकारांनी प्रत्यक्ष शाळेवर भेट दिली असता संस्था चालकाचे भाऊ माधव माणिकराव बसवदे हे शिक्षक पदावर कार्यरत आहेत परंतु सदर शिक्षक अनेक महिन्यापासून आजारी असल्याचे शाळेवरील कर्मचाऱ्यांनी सांगितले सदर शिक्षक महिन्यातून दोन वेळा पंधरा दिवसाला एकदा शाळेवर येऊन स्वाक्षरी करतात व फक्त नावाला रजेचा अर्ज शाळेवर ठेवतात यांच्या अशा बेजबाबदारपणाच्या वागण्यामुळे त्याचा परिणाम शाळेवर होत असून सर्व वर्गाची विद्यार्थी पटसंख्या फक्त 220 असल्याचे शाळेवरील कर्मचाऱ्याकडून कळाले. संबंधित शिक्षकास त्यावेळी मोबाईल वरून संपर्क केला असता माधव बसवदे सर असे म्हणाले होते की मी बरेच दिवसापासून विविध आजाराने ग्रस्त असल्याकारणाने मी नियमित शाळेवर हजर राहू शकत नाही. शाळेवरील मुख्याध्यापक श्री तीगोटे यांच्याशी पत्रकारांनी मोबाईल वरून संपर्क केला असता त्यांनी सदर बाबतीत मौन बाळगळ्याने एक प्रकारे सदर बाब सत्य असल्याचेच उघडकीस होते.दि.14 नोव्हेंबर रोजी देै.नांदेड चाैफेर चे तालुका प्रतीनीधी हे अचानक शाळेवर गेले असता संबंधीत शिक्षक व ईतर एक दोन जण शाळेत हजर नसल्याचे दिसुन आले त्यांना मोबाईलवर संपर्क केला असता मी दुपारीच नंदीग्रामने निघालोय आणि मी आज शाळेवर आलो होतो असे सांगीतले उद्या येणार का विचारल्यावर माझी रजा आहे अस बोलले लगेच शाळेच्या मुख्याध्यापकास याबाबतीत रजा आहे का किंवा,ते कसे परत गेले विचारले असता नेहमीप्रमाणेच माैन बाळगुन राहीले रजा दाखवाच म्हटल्यावर चला चहाघेऊ अस म्हणत काढता पाय घेतला.या बाबतीत शिक्षण विभागाने वेळीच लक्ष देण्याची गरज आहे अन्यथा गावकऱ्यांच्या वतीने शिक्षण विभागाकडे तक्रारी अर्ज देणार असल्याचे सुद्धा गावकऱ्यांनी बोलून दाखविले

Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...