Skip to main content

"सखे थोडस समाधानाने जगुया विखुरलेल्या या समाजाकडे डोळसपणे बघुया" ...मार्गशिष पौर्णिमेच्या संध्येला काव्य मैफिल बहरली क्रांतिसूर्य प्रतिष्ठानचा उपक्रम

 




ता. प्र. किनवट :

ता.१९

प्रत्येक पौणिमा काव्य पौर्णिमा उपक्रम अंतर्गत क्रांतिसुर्य प्रतिष्ठान आयोजित  कवि संमेलन श्रावस्ती बुध्द विहार गोकुंदा येथे पार पडले

या कवि संमेलनाच्या अध्यक्षस्थानी सवित्रीबाई फुले विचार मंचाच्या अध्यक्षा प्रा. शुभांगी ठमके ह्या होत्या कार्यक्रमाच्या सुरवातीस आदर्शाची पुजा करण्यात आली . 

या कवि संमेलनास एकाहुन एक सरस कविता सादर करून कविंनी रसिकांची मने जिंकली.

सुरवातीला  कवि सुभाष गडलिंग यांनी 

- आंधळ्या परंपरेचे पिक या देशात काढले जात होते

माणसाचे अवमुल्यंन शासन प्रमाण असुन तु विवेकाने पुकारले बंड 

हि विद्रोही रचना सादर केली.


कवयत्री वंदना तामगाडगे यांनी

केले

- भीमा तुझ्या शब्दांना

भीमा तुझ्या शब्दांना हि वैचारिक मंथन घडवुन आणनारी कविता सादर केली.



कवि (सांगावाकार)महेंद्र नरवाडे यांनी

-हे शांती दुता तुझ्या ज्ञानाचा 

कणातला कण मनातला पुढे रे हाक

चारीत्र्याची खान तु नितीचे भांडार तु

हि काव्य रचना सादर केली व प्रेक्षकांची वाहवा मिळवली.


कवयत्री नंदाताई नगारे यांनी

- उद्घाटक ठरली तु नारी जातीची

माय माऊली सावित्रीमाई फुले अनंत संकटांना तोंड दिले तु ना डगमगले तुझे पाऊल.


कवि पाडुंरंग भालेराव यांनी दररोज घ्या हो वंदना इथे

या बोध विहारी विहारी इथे हि गेय कविता गाऊन सादर केली.


कवयत्री  सिमा नरवाडे यांनी

- चल ग सखे थोडस समाधानाने जगुया 

विखुरलेल्या या समाजाला डोळसपणे बघुया हि रचना सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.


युवाकवी राजेश पाटील यांनी 

- शाळा सुटली पाटी फुटली 

घे शिक्षण तु जगभर

लेक तु सावित्रीची शुर

लेक तु सवित्रीची शुर हि कविता सादर करुन प्रेक्षकांचा उत्साह वाढवला


या नंतर शिला सेलुकर यांनी 

-ये भिमराया तुझ्या पासुनी वेला माझे तरा मानवा घे आमुची वंदना हि सुंदर रचना सादर केली.


विश्वास पाटील या नवोदीत कवींनी 

- जागरे पुन्हा भीवा 

तु धाव घे पुन्हा भीवा

हि काव्य रचना सादर केली व प्रेक्षकांच्या टाळ्या मिळवल्या .


कवी रुपेश मुनेश्वर यांनी 

- झुकला इथेच माथा चरणी तुझ्याच आलो

बुद्घा तुझ्या पायाने जाण्यास मी निघालो हि कविता सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.


कवि अनिल उमरे यांनी

- निवग क्षणास नेहमी पैशाचे

मुल्य नाही

ओटीत घ्या मनाला हा सुखाचा काळ नाही हि जीवनाचा अर्थ सांगणारी कविता सादर केली.


कवयत्री माया सर्पे यांनी शुभेच्छा देतांना वाढदिवसाच्या मन येते गहीवरुन हि छानशी रचना मांडली.


तर कवि समेंलनाच्या अध्यक्षा प्रा. शुभांगी ठमके यांनी  

- सुंदर सृष्टी, सुंदर मानव, सुंदर जीवन सारा

सद्धम्माच्या प्रजन्यांने बहरून टाकु सारा हि मानवी विचार सांगणारी प्रेरणादायी कविता सादर केली.

या कार्यक्रमात कविंना सावित्रीबाई फुले विचार मंचाच्या अध्यक्षा प्रा. शुंभागी ठमके यांच्या वाढदिवसा प्रसंगी त्यांच्या हस्ते क्रांतीसुर्य जोतीबा पुस्तकाचे वाटप करण्यात आले


या कवि संमेलनाचे उत्कृष्ट असे सुत्र संचालन कवी रुपेश मुनेश्वर यांनी केले

या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती संजय सेलुकर, रमेश नगारे, शालीनी दिलीप धोंगडे, द मुमेंट स्टुडीओचे अजिंक्य आळणे, ललिता कयापाक, काजल संभाजी भरणे, अर्चना ठमके, माधुरी मुनेश्वर, अनिता बनसोड, किशन कयापाक, आश्वत घुले यांची उपस्थिती लाभली  हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आंबेडकर नगर येथील श्रावस्ती बुद्ध विहार समितिच्या उपासकांनी अथक परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे आणण

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे माजी ता

.. महाराष्ट्रातील निवडणुका बॅलेट पेपरवर होणार; निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची माहिती

 महाराष्ट्र:- देशातील लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे जाहीर करण्यात आला असून महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे या कालावधीत एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता शनिवारपासून लागू झाली आहे. महाराष्ट्रात यंदाची निवडणूक विविध मुद्द्यांनी गाजणार आहे. यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दाही महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. राजकीय नेत्यांना आपली ताकद दाखवून देण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील सर्व ४८ मतदारसंघांत समाजातील तरुणांनी शेकडो उमेदवारी अर्ज दाखल करावेत, असं आवाहन केलं आहे. उमेदवारांची संख्या प्रचंड प्रमाणात असेल तर ईव्हीएमवर निवडणुका घेणं कठीण होणार आहे. अशातच आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ईव्हीएमच्या क्षमतेबाबत माहिती दिली आहे. ईव्हीएमसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना एस. चोक्कलिंगम म्हणाले की, "एका मतदारसंघात ४०० उमेदवारांहून अधिक उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यास आपल्याला बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी ला