Skip to main content

"सखे थोडस समाधानाने जगुया विखुरलेल्या या समाजाकडे डोळसपणे बघुया" ...मार्गशिष पौर्णिमेच्या संध्येला काव्य मैफिल बहरली क्रांतिसूर्य प्रतिष्ठानचा उपक्रम

 




ता. प्र. किनवट :

ता.१९

प्रत्येक पौणिमा काव्य पौर्णिमा उपक्रम अंतर्गत क्रांतिसुर्य प्रतिष्ठान आयोजित  कवि संमेलन श्रावस्ती बुध्द विहार गोकुंदा येथे पार पडले

या कवि संमेलनाच्या अध्यक्षस्थानी सवित्रीबाई फुले विचार मंचाच्या अध्यक्षा प्रा. शुभांगी ठमके ह्या होत्या कार्यक्रमाच्या सुरवातीस आदर्शाची पुजा करण्यात आली . 

या कवि संमेलनास एकाहुन एक सरस कविता सादर करून कविंनी रसिकांची मने जिंकली.

सुरवातीला  कवि सुभाष गडलिंग यांनी 

- आंधळ्या परंपरेचे पिक या देशात काढले जात होते

माणसाचे अवमुल्यंन शासन प्रमाण असुन तु विवेकाने पुकारले बंड 

हि विद्रोही रचना सादर केली.


कवयत्री वंदना तामगाडगे यांनी

केले

- भीमा तुझ्या शब्दांना

भीमा तुझ्या शब्दांना हि वैचारिक मंथन घडवुन आणनारी कविता सादर केली.



कवि (सांगावाकार)महेंद्र नरवाडे यांनी

-हे शांती दुता तुझ्या ज्ञानाचा 

कणातला कण मनातला पुढे रे हाक

चारीत्र्याची खान तु नितीचे भांडार तु

हि काव्य रचना सादर केली व प्रेक्षकांची वाहवा मिळवली.


कवयत्री नंदाताई नगारे यांनी

- उद्घाटक ठरली तु नारी जातीची

माय माऊली सावित्रीमाई फुले अनंत संकटांना तोंड दिले तु ना डगमगले तुझे पाऊल.


कवि पाडुंरंग भालेराव यांनी दररोज घ्या हो वंदना इथे

या बोध विहारी विहारी इथे हि गेय कविता गाऊन सादर केली.


कवयत्री  सिमा नरवाडे यांनी

- चल ग सखे थोडस समाधानाने जगुया 

विखुरलेल्या या समाजाला डोळसपणे बघुया हि रचना सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.


युवाकवी राजेश पाटील यांनी 

- शाळा सुटली पाटी फुटली 

घे शिक्षण तु जगभर

लेक तु सावित्रीची शुर

लेक तु सवित्रीची शुर हि कविता सादर करुन प्रेक्षकांचा उत्साह वाढवला


या नंतर शिला सेलुकर यांनी 

-ये भिमराया तुझ्या पासुनी वेला माझे तरा मानवा घे आमुची वंदना हि सुंदर रचना सादर केली.


विश्वास पाटील या नवोदीत कवींनी 

- जागरे पुन्हा भीवा 

तु धाव घे पुन्हा भीवा

हि काव्य रचना सादर केली व प्रेक्षकांच्या टाळ्या मिळवल्या .


कवी रुपेश मुनेश्वर यांनी 

- झुकला इथेच माथा चरणी तुझ्याच आलो

बुद्घा तुझ्या पायाने जाण्यास मी निघालो हि कविता सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.


कवि अनिल उमरे यांनी

- निवग क्षणास नेहमी पैशाचे

मुल्य नाही

ओटीत घ्या मनाला हा सुखाचा काळ नाही हि जीवनाचा अर्थ सांगणारी कविता सादर केली.


कवयत्री माया सर्पे यांनी शुभेच्छा देतांना वाढदिवसाच्या मन येते गहीवरुन हि छानशी रचना मांडली.


तर कवि समेंलनाच्या अध्यक्षा प्रा. शुभांगी ठमके यांनी  

- सुंदर सृष्टी, सुंदर मानव, सुंदर जीवन सारा

सद्धम्माच्या प्रजन्यांने बहरून टाकु सारा हि मानवी विचार सांगणारी प्रेरणादायी कविता सादर केली.

या कार्यक्रमात कविंना सावित्रीबाई फुले विचार मंचाच्या अध्यक्षा प्रा. शुंभागी ठमके यांच्या वाढदिवसा प्रसंगी त्यांच्या हस्ते क्रांतीसुर्य जोतीबा पुस्तकाचे वाटप करण्यात आले


या कवि संमेलनाचे उत्कृष्ट असे सुत्र संचालन कवी रुपेश मुनेश्वर यांनी केले

या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती संजय सेलुकर, रमेश नगारे, शालीनी दिलीप धोंगडे, द मुमेंट स्टुडीओचे अजिंक्य आळणे, ललिता कयापाक, काजल संभाजी भरणे, अर्चना ठमके, माधुरी मुनेश्वर, अनिता बनसोड, किशन कयापाक, आश्वत घुले यांची उपस्थिती लाभली  हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आंबेडकर नगर येथील श्रावस्ती बुद्ध विहार समितिच्या उपासकांनी अथक परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...

​किनवट नगर परिषदेच्या स्वीकृत सदस्यपदी प्रशांत कोरडे यांची बिनविरोध निवड.

 जो मै बोलता हू,ओ मै करता हू..!करण एंड्रलवार  यांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया    तालुका प्रतिनिधी ​किनवट : किनवट नगर परिषदेतील महाविकास आघाडीच्या कोट्यातील रिक्त असलेल्या स्वीकृत सदस्य पदासाठी आज अत्यंत उत्साही वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत शिवसेना (उबाठा) गटाचे शहर प्रमुख आणि युवानेते करण एंड्रलवार यांचे खंदे समर्थक प्रशांत सुरेशराव कोरडे यांची स्वीकृत सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. ​जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या आदेशानुसार, आज  किनवट नगर परिषदेच्या सभागृहात ही निवड प्रक्रिया पार पडली. महाविकास आघाडीच्या वतीने प्रशांत कोरडे यांचा एकमेव नामांकन अर्ज दाखल झाल्यामुळे पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्षा सौ. सुजाता विनोद एंड्रलवार यांनी त्यांची अधिकृत निवड झाल्याची घोषणा केली. नगरपरिषदेच्या निवडणुकीवेळी करण एंड्रलवार यांनी प्रशांत कोरडे यांना स्वीकृत नगरसेवकपदाचा शब्द दिला होता. आज तो शब्द पूर्ण  केला असुन 'जे बोलतो, ते  करून दाखवतो', हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे.  प्रशांत कोरडे यांच्या निवडीनंत...