Skip to main content

वाचन प्रेरणा दिना निमित्त बळीराम पाटील महाविद्यालयात एक दिवसीय वेबिनार संपन्न


(किनवट ता . प्रतिनिधी)

 बळीराम पाटील कला ,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व ग्रंथालय विभाग याच्या संयुक्त विद्यमाने देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. वाचन प्रेरणा  दिनाचे औचित्य साधून एकदिवसीय वेबिनारचे आयोजन करण्यात आले. प्रारंभी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस  महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. एस. के. बेंबरेकर, उपप्राचार्य प्रा. राजकुमार नेम्मानीवार, पर्यवेक्षक प्रा. अनिल पाटील यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले .कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचलन रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. सुलोचना जाधव यांनी केले. वेबिनारमध्ये महाराष्ट्रातील प्रसिद्ध कवी, गीतकार प्रा. डॉ. विनायक पवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. महापुरुषांचे विचार आत्मसात करावे. वाचन वाढवावे. वाचनाने जीवनात उभे राहण्यासाठी बळ मिळते. गरिबीवरमात करुन शैक्षणिक विजय मिळवावे. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या कार्यावर सविस्तर मार्गदर्शन करुन वाचन संस्कृतीचे महत्त्व विशद केले. वाचन संस्कृती व कवितेतील संवेदना या विषयच्या अनुषंगाने बहारदार रचना सादर करुन मंने जिंकले. रासेयोमध्ये सहभागी होऊन राष्ट्रीय सेवा करण्यासाठी युवकांनी पुढे यावे असे सांगितले. 

     प्रा. डॉ. शिवराज बोडके, संचालक ,रासेयो विभाग, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ ,नांदेड यांनी रासेयोचे कार्य या विषयावर रासेयो स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. एस. के. बेंबरेकर यांनी अध्यक्षीय समारोप केला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रंथपाल मंदाकिनी राठोड, प्रा. डॉ. सुरेंद्र शिंदे, प्रा. विजय खूपसे, प्रा. डॉ. अंबादास कांबळे, प्रा. डॉ. आनंद भालेराव, राजेंद्र धात्रक, मिलिंद लोकडे, यांनी सहकार्य केले.आभार प्रा. सुलोचना जाधव यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...