Skip to main content

किनवट पालिका मतदार यादी आक्षेपादरम्यान राडा, काँग्रेसच्या माजी उपनगराध्यक्षाने कार्यकर्त्याचे डोके फोडले



किनवट : किनवट नगर पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रसिद्ध झालेल्या मतदार प्रारूप यादीवर हरकत घेत मुख्याधिकाऱ्यांशी चर्चा करणाऱ्या एका काँग्रेस कार्यकर्त्यांशी वाद घालत काँग्रेसच्याच माजी उपनगराध्यक्षांनी डोक्यात पेपरवेट घालून त्या कार्यकर्त्यांचे डोके फोडल्याची घटना शुक्रवारी दि. १० सायंकाळी मुख्याधिकाऱ्यांच्या दालनातच घडली.

@याप्रकरणी परस्परविरोधी तक्रारी देण्यात आल्या आहेत.

किनवट पालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने नगराध्यक्ष, प्रभार्गाच्या आरक्षणानंतर मतदारांची प्रारूप यादी प्रसिद्ध केली. सदर यादीवर शुक्रवारी हरकती मागविण्यात आल्या होत्या. कोण्या प्रभागात लोकसंख्या अधिक तर मतदार कमी, कुठे मतदार जास्त तर लोकसंख्या कमी अशा बाबींवर विविध पक्षाच्या इच्छुकांकडून मुख्याधिकाऱ्यांकडे हरकती घेत चर्चा सुरु होती. दरम्यान शहराच्या सरदारनगर, नेहरुनगर या प्रभाग १० मधील शेकडो


मतदारांची नावे मतदार यादीत नसल्याची बाब काँग्रेस कार्यकर्ता वसंत राठोड यांनी प्रभारी मुख्याधिकारी विवेक कांदे यांच्या निदर्शनास आणून देत यावर


चर्चा करीत असताना काँग्रेस कार्यकर्ते तथा माजी उपनगराध्यक्ष अभय महाजन यांनी मुख्याधिकारी व विविध पक्षांच्या कार्यकत्यदिखत वसंत राठोड यांच्याशी वाद वाद घातला. या वादानंतर रागाच्या भरात त्यांनी मुख्याधिकाऱ्यांच्या टेबलावर असलेला पेपरवेट वसंत राठोड यांच्या डोक्यात घातला. या हल्ल्यात वसंत राठोड यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होवून रक्तस्त्राव सुरू झाला. पालिका कर्मचारी व उपस्थित कार्यकत्यांनी परिस्थिती हाताळल्याने अनर्थ टळला. दरम्यान स्फोटक परिस्थिती पाहून मुख्याधिकारी


विवेक कांदे यांनी तातडीने पोलिसांना पाचारण केले. राड्याप्रकरणी परस्परविरोधी तक्रारीनंतर रात्री उशिरापर्यंत गुन्हे नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक देविदास चोपडे यांनी दिली. राड्यानंतर पालिका कार्यालय व पोलीस ठाण्यात मोठा जमाव जमला होता. निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच किनवटमध्ये निवडणूकपूर्व हिंसाचार सुरू झाल्याने निवडणुकीदरम्यान जोरदार राडे होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...