Skip to main content

नवपरिर्वतन कविस्वर कलामंच - महाराष्ट्र राज्य हे नवोदीत कलाकारांसाठी नव संजिवनी- (किशन ठमके)

 


(किनवट प्रतिनिधी)

दि.२१ रोजी किनवट तालुक्यातील कलाकारांची बैठक श्री जेष्ठ शाहीर किसन ठमके यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन चर्चा करण्यांत आली.

ज्या खऱ्या कलाकारांना आणि कविंना त्यांच्या कलेला योग्य व्यासपीठ मिळाले नाही जे वंचित राहीले त्यांना आवाज देणे

खऱ्या सुरांना सुरेल लेखनाला आणि भावपूर्ण कवितेला हक्काचे स्थान मिळवून देण्यासाठी सर्वांच्या वतिने नवपरिर्वतन कविस्वर कला मंच महाराष्ट्र राज्य या ग्रुपची स्थापना करण्यांत आली .

आजच्या या निमित्ताने या ग्रुपची संघटन रचना पुढील प्रमाणे घोषीत करण्यांत येत आहे.

  महाराष्ट्र राज्य पातळीवर शाहीर किसन ठमके प्रदेश अध्यक्ष ,श्री साहेबराव वाढवे प्रदेश उपाध्यक्ष ,कवि गितकार सुरेश शेंडे महासचिव ) पदी 

तर नांदेड जिल्हा पातळीवर गायक विवेक ओंकार जिल्हाध्यक्ष ,गायक कामराज माडपेलीवार जिल्हा उपाध्यक्ष ,कवि गितकार बौद्धाचार्य महेंद्र नरवाडे (महासचिव ) पदी.

किनवट तालुका पातळीवर 

गायक आत्मानंद सत्यवंश अध्यक्ष ,उपाध्यक्ष शाहीर केशव महाराज ,

श्री राजेश ,घोडाम महासचिव ,श्री संघपाल कांबळे कोषाध्यक्ष ,संचालक सचिव सुनील उईके,

मार्गदर्शक  गायक मारोती सुंकलवाड ,गायक राजेश पाटील, श्री दत्ता राठोड 

श्री रमेश भवरे , गायक तुळशिराम गेडाम, गायक बोलेवार ,श्री लक्ष्मण कुंडगीर बॅन्जोमास्टर, श्री कांबळे बॅन्जोमास्टर ,श्री गायकवाड हार्मोनियम मास्टर, गायक मुनेश्वर मुंबई, गायक येरकाडे सर

या सर्व पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.   वरील पदाधिकाऱ्यांची एक वर्षाच्या कालावधीसाठी निवड करण्यात आली आहे.

श्री किशन ठमके यांनी आपल्या भावना व्यक्त करतांना म्हटले आहे की

आपला ठामविश्वास आहे की नवपरिर्वतन कविस्वर कलामंच - महाराष्ट्र राज्य हे व्यासपीठ खऱ्या कलाकारांना नवा आत्मविश्वास नवसंजीवनी व नवा आशेचा किरण देईल.

Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

आदिवासी विकास समिती मराठवाडा अध्यक्ष पदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती

 किनवट: राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती, आज दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी किनवट येथील गोकुंदा शासकीय विश्रामगृह येथे दैनिक वीर शिरोमणी वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे राज्य कार्याध्यक्ष शंकरसिंह ठाकुर सर तसेच दैनिक सा.नंदगिरीचा कानोसा या वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे मराठवाडा अध्यक्ष मारोती शिकारे सर नांदेड जिल्हाअध्यक्ष विनायक कामठेकर सर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक घेऊन राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली यावेळी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय जी सूर्यवंशी सर यांनी निवड जाहीर झाल्याबरोबर फोन वर अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या शुभेच्छांचा स्वीकार करत ट्रायबल सेवा न्यूज चॅनेल चे संपादक प्रणय कोवे  यांनी नांदेड जिल्हाअध्यक्ष पदावरून मराठवाडा अध्यक्ष या पदावर नियुक्ती केल्याबद्दल सरांचे मनःपूर्वक आभार मानले  प्रणय कोवे हे गेल्या अनेक वर्षापासू...

१० वर्षीय अरफात मलीक चव्हाण ने ठेवला आयुष्यातील पहिला रोजा

  किनवट प्रतिनिधि : इस्लाम धर्मात पवित्र रमजान या महिन्याला अनन्य महत्व प्राप्त आहेया महिन्यात सर्वच मुस्लिम बांधव यांच्यावर वयाच्या दहाव्या वर्षा पासून रोजा (उपवास) फर्ज (सक्तीचें) असतात.लहानपासून मोठ्यापर्यत या महिन्यांमध्ये 30 दिवस रोजा धरत असतात. पालकांचे पाहून लहान मुलांनाही रोजा धरण्याची लालसा निर्माण होते. त्यामुळे लहान चिमुकले ही मोठ्यांचे अनुकरण करीत रोजा (उपवास) धरतात.अशाच प्रकारे किनवट येथील मलीक चव्हाण यांचा 10 वर्षाचा मुलगा अरफात चव्हाण यांनी आपल्या जीवनातील पहिला रोजा सोमवारी 10 मार्च रोजी पूर्ण केला.मुस्लिम समाजात पवित्र असणाऱ्या या महिन्यात संपूर्ण महिनाभर दिवसभर पाणी न पिता उपवास ठेवला जातो.यावर्षी रोजा (उपवास) सकाळी 5.10 वाजता सुरू होत असून संध्याकाळी 6.28 ला रोजा सोडण्याची वेळ आहे.13 तासा पेक्षा जास्त वेळचा उपवास असल्याने या उष्णतेचा मोठ्या माणसांनादेखील खूप त्रस होतो.त्यात या चिमुकल्याने पहिला रौजा ठैवून आपल्या आयुष्याची सुरुवात एक चांगल्या प्रकारे व्हावी या हेतूने उपवास ठैेवला.त्यामुळे अरफात मलिक चव्हाण यांचे सर्व्र कौतुक होत आहे.