Skip to main content

महात्मा जोतीराव फुले व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जंयती निमित्त विविध शैक्षणिक उपक्रम




(तालुका प्रतिनिधी किनवट )


किनवट येथे होऊ घातलेल्या दि. ११ एप्रिल ते १४ एप्रिल क्रांतिसुर्य महात्मा जोतीराव फुले व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयती सोहळ्या निमित्त रमामात मित्र मंडळ तर्फे विविध शैक्षणिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.


दिनांक ११ रोजी ठिक ९ वाजता महात्मा फुले चौक येथे अभिवादनचा कार्यक्रम होईल नंतर संत गाडगेबाबा उद्यानसकाळी ६ ते रात्री १२ वाजे पर्यंत १८ तास अभ्यास अभियान राबविण्यात येणार आहे.

कार्यक्रम सुत्रसंचालन मा. उत्तम कानिंदे व प्रा. सुबोध सर्पे करणार आहे

दिनांक १२ एप्रि रोजी सकाळी ९ वाजता संत गाडगेबाबा उद्यान व्हि आय पी कॉलनी येथे रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली असून कार्यक्रमाचे परिक्षण जयश्री भरणे, प्रीती  मुनेश्वर हे करणार आहे.


तर दुपारी १२ वाजता विद्यार्थी, व्यावसायिकांना शैक्षणिक व व्यावसायिक मार्गदर्शन मा. सुनिल बिर्ला पोलिस निरीक्षक किनवट व प्रा. सुभाष परघने गो. श. र. शासकीय औद्योगिक  प्रशिक्षण संस्था किनवट हे करणार आहेत .

दिनांक १३ एप्रिल रोजी रमेश मुनेश्वर व सिद्धार्थ खोब्रागडे यांच्या परिक्षणाखाली निबंध स्पर्धा होणार आहे.

दिनांक १४ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे सामुहिक धम्म वंदना होईल व अभिवादन कार्यक्रम होईल तर रमामाता चौक येथे  सकाळी १० वाजता मा. बेबीताई स्व.प्रदिपजी नाईक यांच्या हस्ते  पंचशिल धम्म ध्वजारोहण होणार आहे तसेच रमामाता चौक ते शहराच्या प्रमुख मार्गाने  मोटार सायकल रॅली आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाचे आयोजन निखिल सर्पे राहणा आहे.

तर ११ ते ३ वाजे पर्यंत आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले असून या शिबिरात  डॉ. मनोज घडसिंग, डॉ. सुनंदा भालेराव, डॉ. प्रकाश रायघोळ, डॉ. धनंजय कावळे, डॉ. सुरज वाकोडे,डॉ. प्रियंका राठोड, डॉ. अनिल राठोड हे मोफत वैद्यकीय तपासणी करणार आहेत.

या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून स्वागताध्यक्ष विद्यमान आमदार भीमराव  केराम हे लाभणार आहे तर  या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा. बेबीताई स्व. प्रदीप नाईक  ह लाभणार आहे तर मार्गदर्शक म्हणून भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष अभियंता प्रशांतजी ठमके हे राहणार आहेत .

तर प्रमुख पाहुणे म्हणून सहायक जिल्हाधिकारी मा.झेनिथ चंद्र दोन्थुला, मा.सुनिल बिर्ला पो. नि. किनवट, मा. डॉ. शारदा चौंडेकर तहसिलदार किनवट, अजय कुरवाडे मुख्याधिकारी किनवट हे उपस्थित राहणार आहेत तर या कार्यक्रमाला असंख्य भीम अनुयायांनी उपस्थित राहावे असे आवाहन संयुक्त जंयती सोहळ्याचे आयोजन समितीचे अध्यक्ष आकाश वी. आळणे, सचिव दिपक ओंकार, उपाध्यक्ष अनिल कांबळे, संघर्ष घुले, सहसचिव गणेश आमले, कोषाध्यक्ष शरण लोखंडे, निवेदक कानिंदे, सहकोषाध्यक्ष कपिल बलखंडे, कार्याध्यक्ष प्रतिकेश ओंकार आदींनी केले आहे

दिनांक १४ एप्रिल रोजी स्पर्धेतिल विजेत्यांना रोख पारितोषिक सन्मान चिन्ह सहभागी प्रमाणपत्र देण्यात येईल असे आयोजकांनी कळवीले आहे.

Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...