Skip to main content

किनवटच्या तहसीलदार चौंडेकर यांचा वकील संघाकडून निषेध

 


किनवट (तालुका प्रतिनिधी) न्यायालयीन

कामकाजासाठी तहसील कार्यालयात गेलेल्या वकिलाचा पक्षकारासमोर अवमान केल्याप्रकरणी किनवटच्या वकील संघाने तहसीलदार शारदा चौंडेकर यांचा निषेध करुन त्यांच्यावर कारवाईची मागणी केली.

यासंदर्भात किनवटच्या दिवाणी न्यायाधीशांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, वकील विलास सूर्यवंशी हे दि. ५ फेब्रुवारी रोजी पक्षकारासोबत न्यायालयीन कामकाजासाठी तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी कार्यालयात गेले होते. त्यावेळी आक्षेप क्रता / प्रतिवादी यांचे म्हणणे सादर करण्यासाठी केस मधील वादपत्राच्या / अर्जाच्या व सोबत दिलेल्या कागद पत्राच्या प्रति तहसीलदार शारदा चौंडेकर यांना मागितल्या असता त्यांनी फाईल न बघता तुम्ही कागद सांगा असे उद्धट बोलून पक्षकारासमक्ष "गेट आऊट" असे अँड . सूर्यवंशी यांना उद्देशून पदाला कलंकित करणारी अवमानकारक व वकिली व्यवसायाची अवमूल्यन करणारी भाषा

केली. शिवाय, सूर्यवंशी यांच्या पक्षकाराला 'यांना कशाला वकील म्हणून लावले' असा प्रश्न करत पुन्हा सूर्यवंशी यांचा अवमान केला. तालुका दंडाधिकाऱ्यांच्या या कृतीचा किनवट वकील संघाने निषेध केला. अवमानाच्या निषेधार्थ वकील संघाने सोमवारी दि. १७ रोजी न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार टाकला. वकिलाचा अवमान करणाऱ्या तहसीलदारांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी वकील संघाने केली आहे. दिवाणी न्यायाधीशांना निवेदनावर वकील संघाचे अध्यक्ष अँड . राहुल सोनकांबळे, उपाध्यक्ष एस. एम. राठोड, सचिव अँड एस. पी. शिरपुरे, कोषाध्यक्ष अँड एम. एम. बडगुजर आदींच्या सह्या आहेत.

Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...