Skip to main content

किनवटमध्ये १२ वीच्या परीक्षेस प्रारंभ, तालुका प्रशासन सज्ज

 


किनवट तालुका प्रतिनिधी-


(दि.११) किनवट तालुक्यातील सात परीक्षा केंद्रांवर कॉपीमुक्त वातावरणात इयत्ता बारावीच्या परीक्षांना प्रारंभ झाला. यातील इस्लापूर येथील दोन कनिष्ठ महाविद्यालय आणि शासकीय आश्रम शाळा सहस्त्रकुंड ही तीन परीक्षा केंद्रे वाहतुकीच्या दृष्टीने सुलभ नियोजन म्हणून हिमायतनगर येथील परिरक्षक कार्यालयास (कस्टडी) जोडण्यात आली आहेत.

तालुक्यातील दहा परीक्षा केंद्रांवर ३ हजार ३१३ विद्यार्थ्यांनी परीक्षा फॉर्म भरले होते. त्यापैकी आज मंगळवारी इंग्रजीचा पेपर देण्यासाठी प्रत्यक्षात ३ हजार २४५ विद्यार्थी उपस्थित होते तर ६८ विद्यार्थ्यांनी अनुपस्थिती दर्शविली. आज प्रारंभीच्या इंग्रजीच्या पेपरला किनवट येथील सरस्वती विद्यामंदिर या परीक्षा केंद्रावर ५४३, बळीराम पाटील महाविद्यालय ५८०, महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय ४१०, संगीतादेवी विद्यालय दहेली तांडा २४३, संत फुलाजी बाबा परीक्षा केंद्र, उमरी बाजार १७०, शासकीय आश्रम शाळा पाटोदा केंद्र २८६, सुधाकरराव नाईक विद्यालय, पळशी २५९, वसंतराव नाईक कनिष्ठ महाविद्यालय, इस्लापूर २४६, संत ज्ञानेश्वर कनिष्ठ महाविद्यालय, इस्लापूर २८५ आणि शासकीय आश्रम शाळा सहस्त्रकुंड २२३ अशा एकूण दहा केंद्रांवर ३ हजार २४५ विद्यार्थी परीक्षेसाठी उपस्थित होते. सरस्वती विद्यामंदिर विद्यालय किनवट परीक्षा केंद्रावर वी.एस मुंडे, बळीराम पाटील महाविद्यालय केंद्रावर प्रा. विजय खुपसे, महात्मा ज्योतिबा फुले कनिष्ठ महाविद्यालय गोकुंदा येथे ए. बी. होनराव, संगीता देवी विद्यालय दहेली तांडा येथे अनिल जाधव, संत फुलाजी बाबा कनिष्ठ महाविद्यालय येथे बी.पी केंद्रे, शासकीय आश्रम शाळा पाटोदा येथे एम.एस. आडे, सुधाकरराव नाईक विद्यालय पळशी येथे आर. व्ही. चौधरी, संत ज्ञानेश्वर कनिष्ठ महाविद्यालय इस्लापूर येथे काळेवाड सर, वसंतराव नाईक कनिष्ठ महाविद्यालय इस्लापूर येथे दिलीप राख तर शासकीय आश्रमशाळा सहस्त्रकुंड येथे पंढरीनाथ बुरकुले हे परीक्षा केंद्र अधिकारी म्हणून काम पाहात आहेत.

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा पहिला दिवस मात्र कॉपीमुक्त वातावरणात शांततेत पार पडला. संपूर्ण परीक्षेचा कालावधी कॉपीमुक्त वातावरणात पार पडण्यासाठी चोख पोलिस बंदोबस्त व परीक्षा नियंत्रण करणाऱ्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असल्याचे गटशिक्षणाधिकारी गंगाधर राठोड यांनी सांगितले.

Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

आदिवासी विकास समिती मराठवाडा अध्यक्ष पदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती

 किनवट: राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती, आज दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी किनवट येथील गोकुंदा शासकीय विश्रामगृह येथे दैनिक वीर शिरोमणी वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे राज्य कार्याध्यक्ष शंकरसिंह ठाकुर सर तसेच दैनिक सा.नंदगिरीचा कानोसा या वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे मराठवाडा अध्यक्ष मारोती शिकारे सर नांदेड जिल्हाअध्यक्ष विनायक कामठेकर सर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक घेऊन राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली यावेळी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय जी सूर्यवंशी सर यांनी निवड जाहीर झाल्याबरोबर फोन वर अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या शुभेच्छांचा स्वीकार करत ट्रायबल सेवा न्यूज चॅनेल चे संपादक प्रणय कोवे  यांनी नांदेड जिल्हाअध्यक्ष पदावरून मराठवाडा अध्यक्ष या पदावर नियुक्ती केल्याबद्दल सरांचे मनःपूर्वक आभार मानले  प्रणय कोवे हे गेल्या अनेक वर्षापासू...

१० वर्षीय अरफात मलीक चव्हाण ने ठेवला आयुष्यातील पहिला रोजा

  किनवट प्रतिनिधि : इस्लाम धर्मात पवित्र रमजान या महिन्याला अनन्य महत्व प्राप्त आहेया महिन्यात सर्वच मुस्लिम बांधव यांच्यावर वयाच्या दहाव्या वर्षा पासून रोजा (उपवास) फर्ज (सक्तीचें) असतात.लहानपासून मोठ्यापर्यत या महिन्यांमध्ये 30 दिवस रोजा धरत असतात. पालकांचे पाहून लहान मुलांनाही रोजा धरण्याची लालसा निर्माण होते. त्यामुळे लहान चिमुकले ही मोठ्यांचे अनुकरण करीत रोजा (उपवास) धरतात.अशाच प्रकारे किनवट येथील मलीक चव्हाण यांचा 10 वर्षाचा मुलगा अरफात चव्हाण यांनी आपल्या जीवनातील पहिला रोजा सोमवारी 10 मार्च रोजी पूर्ण केला.मुस्लिम समाजात पवित्र असणाऱ्या या महिन्यात संपूर्ण महिनाभर दिवसभर पाणी न पिता उपवास ठेवला जातो.यावर्षी रोजा (उपवास) सकाळी 5.10 वाजता सुरू होत असून संध्याकाळी 6.28 ला रोजा सोडण्याची वेळ आहे.13 तासा पेक्षा जास्त वेळचा उपवास असल्याने या उष्णतेचा मोठ्या माणसांनादेखील खूप त्रस होतो.त्यात या चिमुकल्याने पहिला रौजा ठैवून आपल्या आयुष्याची सुरुवात एक चांगल्या प्रकारे व्हावी या हेतूने उपवास ठैेवला.त्यामुळे अरफात मलिक चव्हाण यांचे सर्व्र कौतुक होत आहे.