Skip to main content

किनवटमध्ये १२ वीच्या परीक्षेस प्रारंभ, तालुका प्रशासन सज्ज

 


किनवट तालुका प्रतिनिधी-


(दि.११) किनवट तालुक्यातील सात परीक्षा केंद्रांवर कॉपीमुक्त वातावरणात इयत्ता बारावीच्या परीक्षांना प्रारंभ झाला. यातील इस्लापूर येथील दोन कनिष्ठ महाविद्यालय आणि शासकीय आश्रम शाळा सहस्त्रकुंड ही तीन परीक्षा केंद्रे वाहतुकीच्या दृष्टीने सुलभ नियोजन म्हणून हिमायतनगर येथील परिरक्षक कार्यालयास (कस्टडी) जोडण्यात आली आहेत.

तालुक्यातील दहा परीक्षा केंद्रांवर ३ हजार ३१३ विद्यार्थ्यांनी परीक्षा फॉर्म भरले होते. त्यापैकी आज मंगळवारी इंग्रजीचा पेपर देण्यासाठी प्रत्यक्षात ३ हजार २४५ विद्यार्थी उपस्थित होते तर ६८ विद्यार्थ्यांनी अनुपस्थिती दर्शविली. आज प्रारंभीच्या इंग्रजीच्या पेपरला किनवट येथील सरस्वती विद्यामंदिर या परीक्षा केंद्रावर ५४३, बळीराम पाटील महाविद्यालय ५८०, महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय ४१०, संगीतादेवी विद्यालय दहेली तांडा २४३, संत फुलाजी बाबा परीक्षा केंद्र, उमरी बाजार १७०, शासकीय आश्रम शाळा पाटोदा केंद्र २८६, सुधाकरराव नाईक विद्यालय, पळशी २५९, वसंतराव नाईक कनिष्ठ महाविद्यालय, इस्लापूर २४६, संत ज्ञानेश्वर कनिष्ठ महाविद्यालय, इस्लापूर २८५ आणि शासकीय आश्रम शाळा सहस्त्रकुंड २२३ अशा एकूण दहा केंद्रांवर ३ हजार २४५ विद्यार्थी परीक्षेसाठी उपस्थित होते. सरस्वती विद्यामंदिर विद्यालय किनवट परीक्षा केंद्रावर वी.एस मुंडे, बळीराम पाटील महाविद्यालय केंद्रावर प्रा. विजय खुपसे, महात्मा ज्योतिबा फुले कनिष्ठ महाविद्यालय गोकुंदा येथे ए. बी. होनराव, संगीता देवी विद्यालय दहेली तांडा येथे अनिल जाधव, संत फुलाजी बाबा कनिष्ठ महाविद्यालय येथे बी.पी केंद्रे, शासकीय आश्रम शाळा पाटोदा येथे एम.एस. आडे, सुधाकरराव नाईक विद्यालय पळशी येथे आर. व्ही. चौधरी, संत ज्ञानेश्वर कनिष्ठ महाविद्यालय इस्लापूर येथे काळेवाड सर, वसंतराव नाईक कनिष्ठ महाविद्यालय इस्लापूर येथे दिलीप राख तर शासकीय आश्रमशाळा सहस्त्रकुंड येथे पंढरीनाथ बुरकुले हे परीक्षा केंद्र अधिकारी म्हणून काम पाहात आहेत.

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा पहिला दिवस मात्र कॉपीमुक्त वातावरणात शांततेत पार पडला. संपूर्ण परीक्षेचा कालावधी कॉपीमुक्त वातावरणात पार पडण्यासाठी चोख पोलिस बंदोबस्त व परीक्षा नियंत्रण करणाऱ्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असल्याचे गटशिक्षणाधिकारी गंगाधर राठोड यांनी सांगितले.

Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...