Skip to main content

किनवट येथे १५ आणि १६ फेब्रुवारी रोजी जागतिक बौद्ध धम्म परिषद भीमराव आंबेडकर, मंत्री संजय सिरसाठ, जिग्नेश मेवानी यांची उपस्थिती

 


किनवट प्रतिनिधी:

 दरवर्षीप्रमाणे याही वर्षी समता नगर येथील बौद्धमूर्ती परिसरात दि १५ व १६ असे दोन दिवस १४ व्या जागतिक बौद्ध धम्म परिषदेचे भव्य स्वस्मात आयोजन केले असून या परिषदेला देश विदेशातील भन्ते, भाबौमसचे कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर, सामाजिक न्यायमंत्री संजय सिरसाठ, आ. भीमराव केराम आमदार हेमंत पाटील, मंत्री इंद्रनील नाईक उपस्थित राहणार आहेत. यानिमित्त रात्री ९ वा. ख्यातनाम गायक अजय देहाडे मंजुषा शिंदे भाग्यश्री इंगळे संविधान मनोहरे रेश्मा सोनवणे यांचा बुद्ध भीम गीतांचा


प्रबोधनात्मक कार्यक्रम होणार आहे या धम्म परिषदेला पंचक्रोशीतील नागरिकांनी हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संयोजक दया भाऊ पाटील, निमंत्रक विशाल हलवले यांनी केले आहे. दिनांक १५ फेब्रुवारी रोजी दु.४ वा. भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन होईल राष्ट्रीय अध्यक्ष जोगेंद्र कवाडे, प्रा डॉ मोहन मोरे दराटीकर, बापूराव गजभारे, विनोद भरणे मिलिंद धुळे मारोती भगत हे उपस्थिती राहतील. सायं ६ते रात्री ८ वाजेपर्यंत धम्मदेशना,

धम्मकवी संमेलन व धम्म संवाद कार्यक्रम संपन्न होतील रात्री ९ वा धम्म संस्कृतिक संध्या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या नामांकित गायिका रेश्मा सोनवणे


संविधान मनोहरे व दामोदर यांचा बुद्ध गीतांचा दणदणीत

कार्यक्रम होईल. १६ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ११ वा. धम्म सवाल, १२ वा भदंत संघरत्न महाथेरो हे धम्मदेशनात्त देतील. त्यानंतर धम्मसंगती प्रबोधन स्पर्धा होणार असून यात १२ ते २० वर्षे वयोगटातील मुला मुलींना सहभागी होता येईल सायं ५ः३० वा आंबेडकरी कार्यकर्त्यांचा अनन्य सन्मान व सत्कार कार्यक्रमात राज्याचे सामाजिक न्यायमंत्री ना. संजय शिरसाठ आमदार भीमराव केराम व मेहकर विधानसभेचे आमदार सिद्धार्थ खरात, गुजरात येथील वडगाम विधानसभेचे आमदार जिग्नेश मेवाणी पद्मश्री


कल्पना सरोज लघु विकास महामंडळाचे उपाध्यक्ष जयदीप जोगेंद्र कवाडे यांचा यथोचित सत्कार होईल सायं ७:३० वा. समारोपीय सत्रात उमरखेडचे माजी आमदार विजयराव खडसे विधान परिषदेचे अध्यक्ष हेमंतभाऊ पाटील, राज्यमंत्री इंद्रनील नाईक माजी ऊर्जामंत्री नितीन राऊत आमदार प्रताप पाटील चिखलीकर कळमनुरीचे आमदार संतोष बांगर आमदार राजू तोडसाम आमदार बालाजी कल्याणकर आमदार श्रीजया चव्हाण आमदार बाबुराव कदम कोहळीकर तेलंगणाचे आमदार आमशा पाडवी, विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी डॉ.अंकुश देवसरकर शिवसेनेचे ज्योतिबा खराटे माजी नगराध्यक्ष अरुण आळणे, स्वागत आयनेनीवार यांची उपस्थिती राहणार आहे. रात्री ९ वा धम्म संस्कृतिक संध्या कार्यक्रमात मंजुषा शिंदे अजय देहाडे भाग्यश्री इंगळे यांचा बुद्ध भीम गीताचा प्रबोधनात्मक कार्यक्रम होईल. या धम्म परिषदेत हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संयोजन समितीचे दयाभाऊ पाटील, विशाल हलवले, निखिल कावळे राहुल सर्पे, दीपकदादा ओंकार सुनील भरणे, दिलीप मुनेश्वर, गोलू आढागळे, संदीप दोराटे, अरुण शेंद्रे, निवेदक कानींदे आदींनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...