Skip to main content

पत्रकारांच्या सहकार्यामुळे जनसेवा करण्याचे बळ मिळते सौ. बेबीताई नाईक किनवट तालुका पत्रकार संघटनेची दहेलीतांडा येथे सांत्वनपर भेट

 


किनवट प्रतिनिधी:-

किनवट विधानसभेचे लाडके माजी आमदार लोकनेते दिवंगत प्रदीप नाईक यांच्या दुःखद निधनाबद्दल किनवट तालुका पत्रकार संघटनेचे पदाधिकारी व सदस्यांनी दि 28 जानेवारी रोजी दहेलीतांडा येथे जाऊन नाईक कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. जनतेप्रमाणेच पत्रकारांचेही अतोनात प्रेम आणि सहकार्य प्रदीप नाईक यांना लाभले आहे.यापुढेही पत्रकार बांधवांचे असेच सहकार्य लाभावे अशा अपेक्षा  बेबीताई प्रदीप नाईक यांनी व्यक्त केल्या आहेत.


जलक्रांतीचे प्रणेते किनवट माहूर विधानसभेचे लाडके माजी आमदार प्रदीप हेमसिंग जाधव नाईक यांचे 1 जानेवारी 2025 रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास हैदराबाद येथे हृदयविकाराच्या  झटक्याने दुःखद निधन झाले त्यांच्या निधनामुळे राजकीय व सामाजिक क्षेत्रात  शोककळा पसरली असून  नेतेमंडळी व विविध क्षेत्रातील मान्यवर दहेलीतांडा येथे भेट देत आहेत.राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह प्रमुख नेत्यांनी सांत्वन पर भेटी दिल्या दरम्यान 28 जानेवारी रोजी किनवट तालुक्यातील पत्रकार संघटनेचे पदाधिकारी व पत्रकार सदस्यांनी दहिली तांडा येथे जाऊन नाही कुटुंबीयांची भेट घेतली यावेळी प्रदीप नाईक यांच्या सुविद्य पत्नी बेबीताई प्रदीप, भाचा अँड राहुल नाईक, बबलू नाईक, अनुषा डॉ. सुप्रिया कपिल नाईक,मोहनीश नाईक यांची पत्रकारांनी आस्थेवाईकपणे विचारपूस करून धीर दिला आहे. पत्रकारांशी संवाद साधताना बेबीताई नाईक अत्यंत भावुक झाल्या.प्रदीप नाईक आणि पत्रकारांच्या आठवणी सांगताना त्यांचा कंठ दाटून आला एक सर्वसमावेशक नेता म्हणून माझ्या पतीला पत्रकारांनी मोलाचे सहकार्य केले पत्रकारांच्या सकारात्मक बातम्यामुळे आम्हाला जनसेवा करण्याचे बळ मिळाले. पत्रकारांचे हे प्रेम आणि सहकार्य आमच्या कायम स्मरणात राहील. नाईक साहेब गेले म्हणुन आम्हाला परकं करू नका हा जिव्हाळा, प्रेम असच कायम असुद्या अशा भावना बेबीताई नाईक यांनी व्यक्त केल्या आहेत.

याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य बंडू नाईक, धनलाल पवार, अरुण राठोड, उमेश राठोड, के. मूर्ती, अँड.मिलीद.सरपे,प्रमोद पोहरकर, फुलाजी गरड पाटील, गोकुळ भवरे, दुर्गादास राठोड ,अनिल भंडारे,किरण ठाकरे, मलिक चव्हाण, वसंत राठोड उपस्थित होते.


नेता निवडी बैठकी संदर्भात:

--------------------------------


पक्षाची पुढील राजकीय दिशा व नेतृत्वाबद्दल पत्रकारांनी प्रश्न उपस्थित केला असता येत्या 31 जानेवारी रोजी एन के गार्डन येथे सकाळी 11 वाजता पक्षाची महत्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत सर्वाशी चर्चा करून नेता निवड केली जाणार असल्याची माहिती त्यांनी पत्रकारांना दिली.


Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...