Skip to main content

मराठी भाषेचा अभिमान बाळगावा- प्रा. डॉ. मार्तंड कुलकर्णी


किनवट तालुका प्रतिनिधी-

 मराठी भाषेचा अभिमान बाळगावा. रोजच्या व्यवहारात मराठी भाषेचा वापर करावे.मराठी भाषेतील विसरत चाललेल्या बोलीचे संवर्धन व्हावे असे मत बळीराम पाटील महाविद्यालय, किनवट येथे मराठी विभागाच्या वतीने आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरवडा कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य प्रोफेसर डॉ मार्तंड कुलकर्णी यांनी व्यक्त केले.प्रारंभी थोर समाजसुधारक दिवंगत बळीराम पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी विचारमंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. के.बेंबरेकर ,प्रमुख व्याख्याते प्रोफेसर डॉ मार्तंड कुलकर्णी, डॉ.आनंद भालेराव, डॉ. शुभांगी दिवे,मराठी विभागप्रमुख डॉ.पंजाब शेरे उपस्थित होते .प्रास्ताविक डॉ.पंजाब शेरे यांनी केले.

   पुढे बोलतांना कुलकर्णी सर म्हणाले,आपली भाषा ही मातृत्व प्राप्त झालेली भाषा आहे.आपण आज मराठी भाषेतील शब्द विसरत चाललो आहे .आपल्या परिसरातील संस्कृती व लोकजीवनाचा अभ्यास करून लेखन करावे.नियमित वाचन करावे, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. अत्यंत संवेदनशील व वास्तव परिस्थितीचे चित्रण आपण करावे.बोली भाषेतून नवं निर्मिती करावे.भाषेचे संवर्धन करावे असे मत व्यक्त करून पहाडी आवाजात पोवाडे सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

अध्यक्षीय समारोप डॉ.आनंद भालेराव यांनी केले तर

कार्यक्रमाचे आभार व सुत्रसंचालन प्रा प्रल्हाद जाधव यांनी केले.

याप्रसंगी प्रा.ममता जोनपेलीवार, ग्रंथपाल मंदाकिनी राठोड,

डॉ.सुलोचना जाधव, डॉ स्वाती कुरमे,प्रा आम्रपाली हटकर,डॉ.रंचना हिपळगावकर,प्रा योगेश्वरी मुंढे,प्रा.नागनाथ मुकाडे  प्रा.सतीश मिराशे,प्रा.तिडके, सुधीर पाटील व बहुतांश विद्यार्थी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

सेवा फाऊंडेशन तर्फे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात 70 रक्तदात्यांनी केले रक्तदान

  अदिलाबाद:- सेवा फाऊंडेशन यांच्या तर्फे ता.१ ऑक्टोबर रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आयोजक सिराज भाई आदिलाबाद कर यांच्यातर्फे आयोजन करण्यात आले होते यावेळी टिपू सुलतान ब्रिगेडचे नांदेड जिल्हा अध्यक्ष सय्यद नदीम आसिफ भाई लाईफ सेल क्लिनिकल लॅब किनवट यांचे स्वागत करण्यात आले यावेळी सेवा फाऊंडेशन आदिलाबाद जिल्हा टीमनी उत्कृष्ट असे रक्तदान शिबिराचे कार्यक्रम आयोजन केले यावेळी 70 रक्तदात्यांनी रक्तदान केले यावेळी  जिल्हाध्यक्ष सय्यद नदिम यांनी स्वतः रक्तदान केले व युवकांना प्रोत्साहन दिले यावेळी  रिम्स डायरेक्टर डॉक्टर जयसिंग राठोड,डॉक्टर नरेंद्र राठोड ऍडिशनल डी एम एच ओ डॉक्टर गजानंद लॅब,मेडिकल ऑफिसर डॉक्टर पारसनाथ सेवा फाऊंडेशन प्रेसिडेंट खाजा सिराजुद्दीन ,शफिक अहमद ,अथेर इमरान , असलम खान शेख इस्माईल ,तबरेज खान , अहमद हाफिज समीर मोहम्मद नावेद रिजवान खॉन, मो. समीर खॉन मोहमद सलीम, खान मोहमद, असीफ इच्चोडा, सामाजिक कार्यकर्ता इकबाल पटेल, अबु तल्हा, शेख मशीर, शेख मेहबूब तसेच सेवा फाऊंडेशनचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते